Wednesday 1 October 2014

स्वायत्त VS स्वातंत्र्य

भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे हे मला परवा कळले जेव्हा श्री राज ठाकरे यांनी “स्वायत्त” राज्याची मागणी केली, खरा तर श्री राज ठाकरे यांनी या “स्वायत्त” राज्याच्या मागणी करताना त्यांनी आताचे पंतप्रधान व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांचा दाखला दिला, अर्थात यातून त्यांना काय सूचित करायचे होते ते त्यांनाच माहित आहे. पण एका गोष्टीचा खरच विचार करायला हवा की, आपण (म्हणजे महाराष्ट्र) नव्हे संपूर्ण राष्ट्र “स्वायत्त” होत आहे का? त्याकरता आपण व आपली लोकशाही परिपक्व झाली आहे का? राष्ट्र स्वायत्त करणे म्हणजे काय? राष्ट्र स्वतंत्र आसने म्हणजे काय? राष्ट्र स्वायत्त कसे होते? आणि मुलभूत म्हणजे “स्वायत्त” आणि “स्वातंत्र” यातील फरक काय? या लेखात आपण याचा गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू.
या लेखाच्या सुरुवातीला मी एक गोष्टी स्पष्ट करू इच्छीतो की मी सुध्या या विचाराचे समर्थन करतो व स्वायत्तता या मागणीचे स्वागत करतो.

संविधानाने आपणास संघराज्याचे अधिकार दिले आहेत, आपले संघराज्य संविधानावर चालते व ते लोकान मधून निवडून आलेले लोक (सरकार) चालवतात. त्या संविधानाने आपणास “स्वातंत्र” हा मुलभूत अधिकार किवा fundamental right दिला आहे. आणि आपण स्वातंत्र झालो म्हणजे स्वायत्त झालो आसे नाही.

स्वायत्तता हि स्वातंत्र्या नंतरची पायरी आहे. मला नेहमी हे वाटत राहात की अजून आपण स्वातंत्र या शब्दाचा नीट अर्थ समजून घेतला नाही आणि स्वायत्ते बदल बोलणं घाईचा होईल. आपली लोकशाही तेवढी प्रगल्ब झाली नाही की आपण स्वायत्तेचा विचार करू. आपण स्वायत्तता आणि स्वर्यराचार याच्यात बारीक सीमा रेषा आहे हे लक्षात घ्यायला हवी. स्वायत्ता हि स्वातंत्र्याची प्रगल्ब स्वरूप आहे. व त्याची सुरवात सामाजिक व राजकीय प्रगल्बेतून येते. भारता सारखे खंडप्राय राष्ट्र हे विविध विषयात विभागले गेले असताना हि प्रगल्बता प्रस्तापीत होणे कठीण आहे, व त्याकरिता एक समान धागा आसने गरजेचे आहे आणि तो म्हणजे माझा मते “राष्ट्रधर्म” हाच एक आसू शकतो.
आपण जर जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचा विचार करता(अमेरिका), हे धोरण स्वीकारताना अमेरिका सुद्धा हेच सूत्र वापरले आसे दिसते. आणि “राष्ट्रधर्म” हे सूत्र तयार झाले ते गृह युद्ध(civil war) नंतर, याचा वेळी अमेरिका एका माळेत गुंफाली गेली आणि मानव इतिहासातील सर्वश्रेष्ट राष्ट्र बनण्याकडे वाटचाल केली. आर्थत भारतात सुद्धा हे शक्य आहे व त्याकरता civil war ची गरज नाही. भारत एकसंग आहे व एकसंगच राहील, पण सामाजिक व राजकीय प्रगल्बता निर्माण करण्याकरिता आपण सर्वानीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामाजिक प्रगल्बतेत सर्वात महत्वाचे म्हणजे, जाती व्यवस्थेचे उच्चाटन, आर्थिक समानता, साक्षरता इत्यादी व इतर सामाजिक समस्याचे उच्चाटन होणे गरजेचे आहे. तर राजकीय प्रगल्बतेत सर्वप्रथम व सर्वात महत्वाचे म्हणजे दोन पक्षीय राजकीय प्रणाली संपूर्ण देशात अवलंबणे, ग्रामपंचायती पासून ते लोकसभे पर्यंत दोन पक्षीय राजकारण होणे गरजेचे आहे. व या बदलामुळे राजकीय समतोल निर्माण होऊन विचारांना बांधील राजकीय व्यवस्था निर्माण होईल. राष्ट्राच्या स्वयात्ते करिता हे होणे गरजेचे आहे. तेव्हाच संपूर्ण राष्ट्र स्वायत्त तर होईलच आणि एकसंग हि राहील.
धन्यवाद
वंदे मातरम्                                                         विराज