Wednesday 1 May 2024

बारामती लोकसभा_२०२४

 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

सध्या देशभर निवडणुकीचे वातावरण तापत आहे. पहिल्या दोन टप्प्या मध्ये मतदान झाले आहे, तिसऱ्या टप्प्या चे येत्या ७ तारखेला मतदान होत आहे. सर्वत्र प्रचार आणि राजकारण या विषयी चर्चा होता आहे. महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यात मतदाना ची टक्केवारी पहिली तर ती ६०-६२% आहे, ही मतदाना ची टक्केवारी बदल घडवणारी नाही असा निष्कर्ष काढता येतो. फार अशी चुरशीची निवडणूक या टक्केवारी वरून दिसत नाही. एकूण या टक्केवारीचा कल सत्ताधाऱ्यांकरता सुखावणारा व विरोधकांना विचार करायला लावणारा आहे. पण त्यात काही महत्वाच्या जागां साठी निवडणूक होत आहे ज्यात बारामती मतदार संघाची लढत चुरशीची होणार आहे. अजून सुद्धा काही मतदार संघ जसे की माढा, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, शिरूर, नगर इत्यादी. पण सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेली निवडणूक म्हणजे बारामती ची “वाहिनी विरुद्ध ताई" अशी होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कदाचित पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवत असेल, तेसुद्धा इतक्या त्वेषाने असे दिसते. बारामतीची निवडणूक या पूर्वी एकतर्फी होत असायची, त्यात फार अशी चुरस नसायची, सुप्रिया ताई विरुद्ध कांचन कुल हि मागील निवडणुकीत थोडी चुरस असलेली होती.  ताई लोकसभेला तर दादा विधान सभेला मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे, मात्र या वेळी परिस्थिती वेगळी आहे. दादांनी मागील वर्षी थोरल्या साहेबांच्या विरुद्ध बंड केले व स्वतंत्र गट निर्माण करून भाजपा व शिवसेना (धनुष्यबाण) यांच्या सोबत सत्तेत गेले. दादांना उपमुख्यमंत्री पद मिळाले, सहकाऱ्यानां मंत्री पद मिळाले. दादा पुन्हा एकदा सत्तेत बसले होते पण थोरल्या साहेबांची या बंडाला संमती होती का नाही हे अजून सुद्धा अनाकलनीय आहे. सध्या तो मुद्दा बाजूला ठेऊ. बारामतीची या वेळची निवडणूक अजित दादांसाठी प्रचंड महत्वाची आणि प्रतिष्ठेची होणार आहे. अजित दादांच्या राजकीय भवितव्यासाठी हि निवडणूक फार म्हत्वाची ठरणार आहे. थोरले साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या साठी सुद्धा हि निवडणूक तेवढीच महत्वाची नक्कीच आहे. 

पहिल्यांदी अजित दादांची बाजू पहिली तर लक्षात येईल. अजित दादांचे मागील वर्षातील बंड हे काही पहिले राजकीय बंड नव्हते, या पूर्वी सुद्धा त्यांना राजकीय नाराजी किंवा रुसवा होताच पण ते पवार साहेबांनी बंद दाराआड घालवला त्यामुळे कुटुंबातील व पक्षातील फूट टाळली होती. मात्र मागील वर्षी दादा राष्ट्रवादी(घड्याळ) पक्षा सहित वेगळे झाले व या परिवारीक  राजकीय नाट्याला सुरवात झाली. २०१९ च्या सार्वत्रिक  निवडणुकीत सुद्धा थोरल्या साहेबांच्या मता विरुद्ध मावळ मधून अजित दादांनी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा व त्यांच्या नावाने मागितलेल्या मता मुळे शिवसेना (धनुष्यबाण) चे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला आणि अजित दादांच्या राजकारणाला धक्का बसला. त्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत स्थान सुद्धा डळमळीत झाले होते. त्या नंतर दादांचा भाजपा सोबत सकाळचा शपथविधी झाला (त्या शपथविधीला थोरल्या साहेबांची संमती होती असे दादा आता प्रचारा दरम्यान सांगत आहेत) पण तेव्हा सुद्धा दादांना माघार घ्यावी लागली. या वेळी सुनेत्रा वाहिनी यांना बारामती लोकसभा मतदार संघातून दादांनी राष्ट्रवादी (घड्याळ) या पक्षातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा वाहिनी विरुद्ध ताई संघर्ष बारामतीत होत आहे. हि निवडणूक जर सुनेत्रा पवार यांनी जिंकली तर दादांची राजकीय भवितव्य बद्दल फार चिंता असणार नाही, कारण भविष्यात दादा भाजपा सोबत च  राहणार आहेत.  राष्ट्रवादी (घड्याळ) पक्ष केंद्रात व राज्यात भाजपा सोबत सत्तेत असेल. सुनेत्रा वाहिनी ना लोकसभेत राष्ट्रवादी (घड्याळ) गटाचे नेते पद व फार झाले तर मोदी सरकार मध्ये मंत्री पद सुद्धा मिळू शकते.  कदाचित दादांना या मुळे भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते. राष्ट्रवादी (घड्याळ) गटात नेत्यांचे इंकमिंग वाढू शकते. मात्र वहिनीचा पराजय  दादांचा पराजय मानला जाईल. दादांच्या राजकीय महत्वकांक्षेला सुरुंग लावणारा पराजय ठरू शकतो. दादांचे पक्षातील विरोधक सक्रिय होतील सोबत दादांचे राष्ट्रवादी (घड्याळ) पक्षातील वजन कमी होईल याचा फायदा सुप्रिया ताई गटाला मिळेल. दादांचे मुख्यमंत्री पदाची इच्छा सुद्धा यामुळे अडचणीत येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाभिमुख चेहरा व नाव वापरून सुद्धा बारामती मधून सुनेत्रा वहिनींचा पराजय झाल्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वा मध्ये अजित दादांचे महत्व कमी होईल. तसेच काही काठावरचे सहकारी सुद्धा राष्ट्रवादी (घड्याळ) गटातून राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस) या गटात जाऊ शकतात. त्यामुळे हि निवडणूक दादांसाठी फार महत्वाची ठरणार आहे.

सुप्रिया ताईंची बाजू पहाता, भाजपा ने बारामती मतदार संघा साठी मोठी मोर्चा बांधणी मागील दोन वर्षा पासून केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वरती बारामती मतदार संघाची जवाबदारी भाजपने सोपवली होती. भाजपाचे या मतदार संघा वरती विशेष लक्ष आहे. बारामती राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस)  कडून हिसकावून घेणे हि तर रणनीती भाजपा ची आहेच. त्यामुळे एक जागा लोकसभेत भाजपा ची वाढणार आहे सोबत त्याद्वारे शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणाला शह देण्याची योजना या रणनीती मधून दिसत आहे. आता सुद्धा या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्याने शरद पवार व राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस) या गटाला पुणे- बारामती पुरते मर्यादीत ठेवण्यात भाजपाला यश आले आहे. सुप्रिया ताईंचा पराभव हा शरद पवार यांचा राजकारणच पराभव असे चित्र या द्वारे उभे राहू शकते. त्याचा फायदा भाजपा ला येणाऱ्या स्थनिक स्वराज्य संस्था व विधानसभे च्या निवडणुकी साठी होऊ शकतो. सुप्रिया ताईंचा पराभव जरी झाला तरी राष्ट्रवादी (तुतारी वाला माणूस) या पक्षातर्फे सुरक्षित मतदार संघातून विधान सभेत पाठवले जाऊ शकते. त्यामुळे या राजकीय नाट्याचा पुढील अंक “दादा विरुद्ध ताई” आपल्याला विधान सभेत पाहायला मिळू शकतो. पवार घराण्यातील ही राजकीय लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात अनेक बदल घडवून आणेल हे नक्की.  हि निवडणूक पवार कुटुंबात वहिनी विरुद्ध ताई यांच्यात असल्यामुळे भाजपाचा कोणताही शिलेदार यात खर्ची पडणार नाही. बारामतीच्या ह्या निवडणूकित वहिनी व ताई यांच्या पैकी  कोणीही निवडून येवो त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. भाजपच्या या रणनीती मुळे देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील स्थान पक्के तर होणारच आहे पण पवार परिवाराला शह दिल्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा शांत होतील. महाराष्ट्रतील अनेक मराठा राजघराणे भाजपाच्या वाटेवर विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी दिसू शकतात. देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रीतील सर्वात प्रभावशाली व शक्तिशाली नेता म्हणून दिल्लीत महत्व वाढणार आहे.

 

तूर्त एवढेच

 

 

विराज वि देवडीकर

Sunday 7 January 2024

लक्षद्विप ला आता लक्ष लक्ष नजरा...

 

नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप चा दौरा केला त्याचे काही फोटो समाज माध्यमातून आणि इतर माध्यमातून प्रसारित झाले आणि अनेकांच्या बुडाला आग लागली. अनेकांना या दौऱ्याचा प्रचंड त्रास झाला. अनेकांना लक्षद्वीप हा भारताचा भाग आहे तेच या दौऱ्यामुळे पहिल्यांदा कळले. अनेकांना लक्षद्वीप भारताच्या नेमके कोणत्या किनाऱ्यावर आहे हेच माहित नव्हते, म्हणजे अरबी समुद्रात आहे कि बंगालच्या उपसागरात येथून सुरवात. तर या लक्षद्विप ची गोष्ट मोठी रंजक आहे.

लक्षद्वीप भारताच्या पश्चिम बाजूस म्हणजे अरबी समुद्रात मलबार कॉस्ट (केरळ) च्या किनाऱ्या पासून २२० किमी अंतरावर ३६ छोट्या छोट्या बेटांचा समूह आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौरस किमी इतके आहे. लक्षद्विप मध्ये एक जिल्हा, १० पंचायत आहेत. एकूण लोकसंख्या २०११ प्रमाणे  ६४४७३ आहे तर बहुतांश मुस्लिम धर्मीय लोक वस्ती येथे आहे. साक्षरतेचे प्रमाण ९१% इतके आहे. लक्षद्वीप भारताच्या केंद्र शासित प्रदेशा पैकी एक आहेत. कवरत्ती हे राजधानीचे ठिकाण आहे. १७व्या लोकसभेत मोहम्मद फैझल हे लक्षद्वीप चे प्रतिनिधी होते. ते महाराष्ट्रतील चार खासदार असलेल्या पक्षाचे सदस्य आहेत व २००९ मधील एका हिंसाचाराच्या खटल्यात जानेवारी २०२३ पासून शिक्षा भोगत आहेत, या शिक्षेमुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे.  भारताच्या नकाशावर लक्षद्वीप मालदीव व भारताच्या मध्ये येते. मालदीव इतकाच किंबहुना त्याहून सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा आणि निसर्ग लक्षद्वीप ला लाभले आहे. पर्यटन करता प्रचंड वाव आणि कमी खर्चात लक्षद्वीप मध्ये शक्य आहे. या पूर्वी सुद्धा भारताचे पंतप्रधान लक्षद्वीप ला गेले होते. १९८७ ला भारताचे त्यावेळेस चे पंतप्रधान स्वा. राजीव गांधी १० दिवसाच्या कौटुंबिक सहली साठी INS विक्रांत वरून लक्षद्वीप ला गेले होते. कवरत्ती येथे पोहांचून छोट्या हेलिकॅप्टर ने ३६किमी अंतरावरील वैयक्तिक बेटावर गेले होते. अर्थात ती कौटुंबिक आणि वैयक्तिक सहल असल्यामुळे माध्यमांना प्रवेश नव्हता आणि तेव्हा समाज माध्यम नव्हती त्यामुळे फक्त त्याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्या. नाही म्हणायला R K LAXMAN यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर भाष्य तेव्हा केले होते. मात्र पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लक्षद्वीप ला भेट दिली तेव्हा पासून भारतातील आणि भारताच्या शेजारील देशातून अनेकांना त्रास सुरु झाला आहे. पंतप्रधानांच्या या भेटीचा राजकीय व पर्यटन दोन स्पष्ट अर्थ निघतात.



मागील वर्षी मालदीव मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीत मोहम्मद मुइझ्झू हे निवडून आले त्यांनी इब्राहिम मोहम्मद सोलीही यांचा पराभव केला. मालदीव च्या अर्थ व्यवस्थेवरती चीनच्या कर्जाचा भार आहे व मोहम्मद मुइझ्झू हे तसे चीन समर्थक उमेदवार सध्या अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सत्तेवर येताच भारताला सदिच्छा भेट दिली. मात्र त्यांच्या भारत विरोधी कारवाया सुरूच आहेत. त्यांच्या या भारत विरोधी कारवायांना चीन चे पाठबळ आहे असा आरोप केला जातो. त्या दृष्टिकोनातून सुद्धा मा पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी कडे पाहिले जात आहे. मालदीव ला चीन आर्मी बेस बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अरब समुद्रात चीनचे नाविक दल कार्यरत होऊ शकेल. व ते भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे.


दुसरे म्हणजे पर्यटन, समुद्र किनारा लाभलेल्या  सर्व देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असते. श्रीलंका किंवा मालदीव यांच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा हातभार आहे. या दोन्ही देशांच्या शेजारी भारता सारखा खंडप्राय देश आहे. भारत जगातील प्रभावशाली अर्थव्यवस्था बनत आहेत. अशावेळी भारतातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक या


देशांना भेट देत असतात आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात. पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी मुळे आणि तेथील समुद्र किनाऱ्या वरील व निसर्गाच्या फोटो मुळे अनेक भारतीय येणाऱ्या काळात मालदीव ला भेट देणार होते त्यांचे लक्ष लक्षद्वीप कडे वळले आहे. आर्थिक दृष्ट्या सुद्धा लक्षद्वीप भेट भारतीयांना परवडणारी आहे. त्यामुळेच आज मालदीव चे मंत्री झाहिद रमीझ यांनी पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर टीका केली आणि "भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आहे." असे म्हटले त्यामुळे त्यांना मालदीव सरकारने  निलंबित केले आहे पण पंतप्रधानाच्या भेटीचा योग्य तो संदेश मालदीव सरकारला मिळाला आहे असे म्हणावे लागले.

तूर्त एवढेच

धन्यवाद

विराज वि देवडीकर

 

https://www.newindianexpress.com/galleries/nation/2019/may/10/from-our-archives-rajiv-gandhis-lakshadweep-holiday-guess-who-else-was-there-102271--4.html