Sunday 20 October 2019

विधान सभा २०१९ चा Google Trends


आज महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकी करिता मतदान झाले आहे, येत्या २४ तारखेला मतमोजणी होईल व नक्की कोणाच्या बाजूने महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे ते कळेल. महाराष्ट्रातील जनतेने कोणाला स्वीकारले आणि कोणाला नाकारले हे २४ ला स्पष्ट होईल.  कोणत्या उमेदवार जिंकला कोणता पराभूत झाला, कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ असेल, नवीन विधान सभा पूर्ण बहुमतातली असेल की त्रिशंकू असेल, कोणाच्या पाठिंब्या वरती नवीन सरकार निर्माण होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील एक दोन आठवड्यात आपल्याला मिळून जातील. दिवाळी नंतर स्थापन निर्मितीच्या हालचाली सुरु होतील, आणि कदाचित १ नोव्हेबर पर्यंत महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपत विधी झाला असेल.
मार्केट रिसर्च आणि psephology या विषयांचा अभ्यास करताना मागील काही महिन्यात पासून या विधान सभा २०१९ च्या निवडणुकीचा आणि मतदारांच्या कलांचा (trends) चा अभ्यास करायचा ठरवले आणि त्याकरिता माध्यम निवडले "Google". साधारणपणे दोन तीन महिन्याखाली लोकसत्ता या नियतकालिकात एका आर्टिकल वाचण्यात आले. लोकसभा २०१९ च्या मतदारांच्या ट्रेंड्स चा अभ्यास केलेला लेख आला होता, त्या लेखा मुळे google trends या टूल विषयी माहिती कळली, विधानसभा २०१९ चा अभ्यास करताना Google Trends चा वापर करायचे ठरवले. Google Trends हे google नी मोफत उपलब्ध करून दिलेले टूल आहे त्याच्या वापर करून आपण ठराविक काळातील व ठराविक भौगोलिक परिसरातील लोकांच्या आवडी निवडी जाणून घेऊ शकतोत. अर्थात हे फक्त search engine वर केलेला search आहे, व त्या द्वारे आपल्याला हे जाणून घेता येते की ठराविक काळात व ठराविक भौगोलिक परिसरातील लोकांनी कोणत्या शब्दा चा Google वर सर्वात जास्त वेळा वापर केला किंवा त्याचा शोध घेतला. या टूल चा वापर करून महाराष्ट्रातल्या विधान सभा निवडणुकीचा चेहरा निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तो आज आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या आभ्यासासाठीच्या नोंदी २०/१०/२०१९ ला १६.०० ते १८.०० या वेळेत घेतल्या आहेत, तर या अभ्यासाचा कालावधी मागील ३० दिवसांचा आहे. याकरिता महाराष्ट्र हा भौगोलिक परिसराची निवड केली आहे. 


प्रश्न १:- मागील ३० दिवसात सर्वात जास्त google वर शोध (Search) झालेले पक्ष (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)
भारतीय जनता पक्ष या शब्दाचा शोध मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने google घेतला आहे, असे दिसते. 
प्रश्न :- मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त google वर शोध (Search) केलेले राष्ट्रीय नेतृत्व (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)
या प्रश्नात अर्थात नरेंद्र मोदी यांच्या नावाने सर्वात जास्त वेळा search झालेले आपल्याला दिसेल, अमेरिकेचा दौरा व तेथील माननीय पंतप्रधानांचे भाषण याच काळातले, त्यामुळे त्याचा या search वर परिणाम नक्की झाला आहे. त्या नंतर शरद पवार यांचे नाव आहे, कारण ते महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण नेते आहेत व एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण या काळात राहुल गांधी यांच्या नावाचा शोध महाराष्ट्राच्या जनतेने खूप कमी केलेला दिसत आहे. 

प्रश्न ३ :- मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त google वर शोध (Search) केलेले राज्य पातळीवरील नेतृत्व (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)

या मध्ये प्रमुख राजकीय पक्षातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार यांची नावे घेतली आहेत. राज्यस्थरावरील नेतृत्व थोड्याफार फरकाने एकमेकांना समांतर आहे, भारतीय जनता पक्षातून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांच्या नावाचा search गूगल वर जास्त झालेला दिसतो. २८ सप्टेंबरला अजित पवारांनी दिलेला  विधानसभेचा राजीनामा यामुळे त्यांचे नाव त्यादिवशी सर्वात जास्त वेळा शोधले गेले होते.


प्रश्न :-  मागील ३० दिवसात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त google वर शोध (Search) केलेले निवडणुकीतील मुद्दे (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)

महाराष्ट्रातील जनतेने जम्मू आणि काश्मीर या शब्दाचा शोध सर्वात जास्त वेळा घेतलेला दिसत आहे. त्यानंतर आर्टिकल ३७० आणि वीर सावरकर या शब्दांचा शोध गूगल वर घेतलेला दिसत आहे. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या या शब्दांचा शोध या काळात महाराष्ट्रातील जनतेने कमी घेतलेला दिसत आहे.




प्रश्न ५ :-मागील ७ दिवसात महाराष्ट्रातील जनतेने भारतरत्न आणि वीर सावरकर या शब्दांचा घेतलेला शोध  (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)

महाराष्ट्रातील जनतेने मागील ७ दिवसात या शब्दांचा शोध घेतला आहे त्यात १५ ऑक्टोबर नंतर या शब्दांच्या शोधाचे प्रमाण जास्त दिसत आहे. कारण याच दिवशी भाजपा च्या जाहीरनाम्यात वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.







प्रश्न ६ :- ED प्रकरणा पूर्वी व नंतर शरद पवार या शब्दाचा शोध मोठ्या प्रमानावर झालेला आहे. तसेच  साताऱ्यातील १८ ऑक्टोबर च्या सभेनंतर शरद पवार यांच्या नावाचा शोध वाढलेला आहे, संध्याकाळी २०.०० नंतर या शब्दाचा शोध खूप वाढलेला दिसत आहे. या निवडणुकीत शरद पवार हे खूप परिणाम कारक व्यक्तिमत्व आहेत, पण त्याचे मतात रूपांतर कसे  झाले २४ तारखे नंतरच कळेल. (यात १०० हे फक्त एकक असून ते कोणत्याही प्रकारे मोजमापाचे प्रमाण नाही)


यामधून कोणताही निष्कर्ष किंवा अनुमान सांगणे हे योग्य होणार नाही पण या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात, ज्याद्वारे महाराष्ट्रातील जनतेचा कौल आपल्या समजायला मदत होईल. Google Trends या टूल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचा कौल भारतीय जनता  पार्टी आणि महायुतीच्या बाजूने दिसत आहे. येणाऱ्या २४ तारखेला निवडणुकीच्या निकालात हे स्पष्ट होईल Google Trends ने दिलेला कौल किती प्रमाणात योग्य होता.

धन्यवाद

वंदे मातरम                                                                                                  विराज

Tuesday 15 October 2019

निवडणूक प्रचार


२००४ च्या निवडणुका प्रत्यक्ष अनुभवायची संधी मला मिळाली, बीडला ऍग्रीकल्चर ला फर्स्ट इयर ला असताना निवडणुकीचा प्रचार प्रत्यक्ष पाहता आला. सोशल मीडिया त्यावेळी नव्हता त्यामुळे निवडणूक प्रचार ऑन फील्ड जास्त असायचा. अशा प्रचाराची एक वेगळीच मज्जा आणि वातावरण निर्मिती असायची, चहा पेक्षा किटली गरम तसे नेत्या पेक्षा कार्यकर्तेच अतिउत्साही असायचे. डिजिटल मीडिया, इव्हेंट मॅनॅजमेण्ट, PR agent, मीडिया प्लांनिंग या सारख्या प्रपोगंडा टेकनॉलॉजि वापर नसलेली निवडणूक २००४ ची असेल. तस नाही म्हणायला भाजपाने त्यावेळी ऑर्कुट च्या वापर निवडणुकीच्या प्रचारा करिता सुरु केला होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे दोनच प्रभावी माध्यमे त्यावेळी जनसंपर्कां साठी होती आणि सर्व पक्ष व उमेदवार त्याचा वापर प्रभावी पणे करत होती. त्यापेक्षही महत्वाचे ठरत होते ते म्हणजे "मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट" वैयक्तिक गाठी भेटी फार महत्वच्या ठरत होत्या, प्रचार सभा आणि वैयक्तिक गाठी भेटी यामुळेच मोठया प्रमाणावर वातावरण निर्मिती होत होती, यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवीन प्रकारे प्रचार करण्यास सुरवात केली, "रोड शो" हा खूप प्रभावी प्रचार प्रकार ठरला आणि त्यामुळे मोठया प्रमाणावर जनसंपर्क होऊ लागलं. रामजन्मभूमी च्या विषयावरून काढलेली लाला कृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा आणि सोनिया गांधी यांनी काढलेला रोड शो प्रभावी जनसंपर्क प्रकार त्यावेळी होते. रथ यात्रा प्रकार लाला कृष्ण अडवाणी/भाजपा ने  १९८९ पासून च्या सर्व पुढच्या निवडणुकीत या तंत्राचा वापर केला. रोड शो आणि रथ यात्रा हे तंत्र आजच्या निवडणुकीत सुद्धा प्रभावी माध्यम ठरत आहे. सर्वच पक्ष या दोन्ही तंत्राचा वापर करताना आपण पाहत आहोत. या दोन्ही तंत्रा मुळे प्रचंड वातावरण निर्मिती आणि प्रत्यक्ष जनसंपर्क साधता येतो. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाला प्रत्यक्ष पाहण्याची आणि भेटण्याची संधी सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून मिळते, सोबत इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया असल्यावर अजून प्रभाव वाढतो.


तस पाहता निवडणुकीचा प्रचार म्हणजे ग्रामीण भागात एक उत्सवच असतो. लग्ना कार्यात ज्याप्रमाणे लगबग असते त्या प्रमाणे निवडणुकीच्या प्रचार असतो. निवडणुका जाहिर होण्याच्या दोन ते तीन महिने आधी पासून ते मतदानाच्या दिवशी पर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचणे त्यांना आपल्या उमेदवार बद्दल माहिती देणे आणि आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यास प्रवृत्त करणे हे काम कार्यकर्ते करता असतात. वेगवेगळ्या माध्यमातून पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवत असतो, ग्रामीण भागात प्रचार सभा असल्यास, सभेच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या मध्ये "हलगी"(डफली) वाजवली जाते, सभेच्या गावात भोंगे फिरवले जातात, भिंती रंगवणे, प्रत्रक (लीफलेट/पॅम्प्लेट) वाटणे या मुळे सभेची वातावरण निर्मिती होते. "हेलिकॅप्टर" हे सुद्धा प्रभावी प्रचाराचे माध्यम ग्रामीण भागात आहे,  दोन -तीन वेळेस सभेच्या गावात उमेदवाराचे हेलिकॅप्टर फिरवले की चांगली वातावरण निर्मिती होते. लोक सभेच्या ठिकाणी गर्दी करतात. राजकारणाच्या चर्चा आणि निर्णय प्रक्रियेचे (डिसिजन प्रोसेस) ठिकाण म्हणजे गावाची चावडी, मारुती मंदिर किंवा चहाची टपरी असायची. त्यामुळे उमेदवाराची चावडी मीटिंग वर भर असायचा. स्थानिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचा वापर उमेदवार मोठ्या खुबीने करून घेत असे. स्थानिक वृत्तपत्रात आपल्या बद्दल चांगलं कसं लिहून येईल यावर उमेदवाराचा भर असे.  ग्रामीण भागात कोणत्याही दिवशी सभेचे आयोजन केले जाते तर शहरी भागात शनिवार-रविवार हे प्रचाराचे दिवस होते, दिवसा ग्रामीण भागातील सभा आणि संध्याकाळी शहरी भागात सभा आयोजन होत असे. सभेचे रूपांतर इव्हेंट मध्ये करण्याचे श्रेय राज ठाकरे ना जाते, larger than life image या इव्हेंट मधून केला जायचा, बाळा साहेबांच्या सभेचे व्यवस्थापन याच प्रकारचे होते. वक्तृत्व त्यावेळी आणि आज सुद्धा प्रभावी प्रचाराचे माध्यम आहे. एखादा खंबीर वक्ता एका सभेतून निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. तासानं तास श्रोत्यांना खेळवून ठेवणारे वक्ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे.


गर्दीतला प्रचार सध्या हरवलेला आहे, २०१४ आणि २०१९ ची निवडणूक ही पूर्णपणे सोशल मीडिया वर आधारलेली होती. बदलत्या काळा प्रमाणे निवडणूक प्रचाराचे प्रकार आणि साहित्य सुद्धा बदलले. २०१९ च्या निवडणुकीत डिजिटल प्रचारा वरती खूप भर आहे, व्हॉटऍप, फेसबुक, ट्विटर या माध्यमांच्या द्वारे प्रचंड जनसंपर्क करता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑडियन्स रिच या तिन्ही माध्यमातून मोजता येतो. या तिन्ही माध्यमात अनेक प्रकारे उमेदवार टार्गेट ऑडीयन्स ला प्रभावित करू शकतो. सध्या या माध्यमाद्वारे टार्गेट ऑडीयन्स ची डिसिजन मेकिंग होत आहे. ही माध्यमे खूप मोठ्या प्रमाणावर टार्गेट ऑडीयन्स प्रभावित करत आहेत, या माध्यमात येणाऱ्या कॉन्टेन्ट ची सत्यता न पडताळता ऑडीयन्स त्यावर अंध विश्वास ठेवत आहेत. सोशल मीडिया तुन फालतू चर्चा आणि अतिरेकी विचार पुढे येत आहेत. माहितीची प्रचंड प्रमाणात देवाण घेवाण होत आहे व त्याचा लाभ घेऊन काही कंपन्या मतदारांना प्रभावित करत आहेत आणि हे सर्व राजकीय पक्षांच्या फायद्या साठी होत आहे. याचा नक्कीच फायदा उमेदवार आणि राजकीय पक्षाना होणार, मतदारांची दिशाभूल करून सत्तेचा सोपान चढणे त्यांना सोपे झाले आहे.

वंदे मातरम                                                                                                                  विराज

Tuesday 28 May 2019

वीर सावरकर...


आज वीर सावरकरांची जयंती, मुदाम "वीर" शब्द वापरला. मागील महिन्यात राजस्थान मधील काँग्रेस सरकारने शालेय इतिहासाच्या पुस्तकात बदल करून स्वा. सावरकरांच्या नावा समोरील "वीर" पदवी कडून त्यांना गांधी हत्येच्या काटातील प्रमुख सूत्रधार म्हणून उल्लेख केला, या करिताच्या मुहूर्तही सार्वत्रिक निवडणुकीचा साधला व त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने त्यांना त्याची जागा २३ मे ला दाखवूनच दिली. पण स्वा. सावरकर हे सॉफ्ट टार्गेट आहेत व त्यांचा वापरकरून मतदारांची दिशाभूल करता येते व मत मागता येतेय हे काँग्रेस चे जुने सूत्र पुन्हा सिद्ध झाले. स्वा सावरकरांवर चिखल फेक करणे काही लोकांना खूप सोपे वाटते, कारण स्वा. सावरकरांची बाजू मांडणारे, त्याच्या करीत लढणारे  त्यांचे असे कोणतेच संघटन किंवा एकत्रीकारण आज अस्तित्वात नाही. संघ परिवार व भाजपा जरी त्यांच्या करिता लढत असले तरी स्वतः सावरकर कधीही संघ स्वयंसेवक नव्हते किंवा संघाच्या निर्मितीत सावरकरांचे काही योगदान नव्हते. स्वा. सावरकरांनी त्यांच्या हयातीतच त्यांनी निर्माण केलेल्या संघटनेचे विसर्जन केले, "अभिनव भारत" या संघटनेचे विसर्जन सावरकरांनी १०-१२ मे १९५२ रोजी पुणे येथे केले, अभिनव भारत संघटनेचे ध्येय व उद्दिष्ट राष्ट्रास स्वतंत्र मिळवून देणे हे होते व राष्ट्र स्वतंत्र झाल्यावर त्याचे कार्य सिद्ध झाले म्हणून त्याचे विसर्जन स्वा. सावरकरांनी स्वहस्ते केले. राजकीय अभिलाषा न ठेवता ५० वर्षा पेक्षा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या संघटनेचे त्यांनी विसर्जन केले.

स्वा. सावरकरां वर टीका करणारे हे सहज विसरून जातात की, कसलीही अभिलाषा न धरता राष्ट्र साठी सर्वस्व अर्पण करणे कठीण असते. जे टीका करतात ते सोईस्कर विसरून जातात की अंदमान च्या तुरुंगात त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कोलू चालवलेला नसतो किंवा हातवर वळून काथ्या तयार केलेला नसतो. घरातील सगळे करते पुरुष एकाच वेळी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर असतात आणि घरात फक्त लहान मुले आणि स्त्रिया. ज्या माय भूमीच्या स्वातंत्र्या साठी आजन्म यातना सहन केल्या त्याच माय भूमीच्या स्वातंत्र्या नंतर हाती फक्त उपेक्षा आणि हेटाळणी आली, आणि ती मृत्यू नंतर सुद्धा आज तागायत चालू आहे. सावरकरांच्या नावा समोरील पदव्या काढून किंवा खोट्या आरोपात त्यांना गोवल्याने त्यांचे इतिहासातील महत्व कमी होईल असे काही अज्ञानी लोकांना आणि संघटनांना वाटत असते, पण तो त्यांचा भ्रम आहे. आत्मबल या त्यांच्या कवितेतच स्वतःचे अमरत्व त्यांनी सांगितले आहे,
"अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला,
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला",
याच कवितेत ते पुढे म्हणतात
"अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो,
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो"
हा विश्वास स्वा. सावरकरांना त्याच्या कार्या बद्दल होता. एखाद्या सन्मानाने ज्या प्रमाणे स्वा. सावरकरणाचे महानत्व सिद्ध होत नाही त्याच प्रमांणे काही तुच्छ लोकांनी टीका केल्याने त्यांचे स्वतंत्र लढ्यातील योगदान कमी होत नाही.  "तुज सकल चराचर शरण" स्वा. सावरकरांनी या काव्य पंक्ती प्रमाणेच स्वतःचे आयुष्य मातृ भूमीच्या पुण्य भूमीच्या पायी वाहील होत, मी सर्वस्वाने तुला शरण आलो आहे असे मातृ भूमी वरील प्रेम स्वा. सावरकरांना अमर करत आहे. आज त्यांच्या १३६ व्या जयंती निमित्याने विनम्र अभिवादन.


धर्मसुधारणा वादी, विज्ञानवादी, जात्युच्छेदक, राष्ट्रभक्त, क्रांतिकारी, भाषासुधारक, कवी, लेखक, नाट्यकार, अमोघ वक्ता, मृत्युंजय "वीर" विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन #IAmSavarkar

वंदे मातरम























Saturday 11 May 2019

येडशी औरंगाबाद महामार्ग

दर दिवस नवीन काहीतरी अनुभवायचे म्हणून जन्मत असतो, आणि आपण त्यातून शिकत असतो. असाच काहीसा आजचा अनुभव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ येडशी ते औरंगाबाद प्रवासा दरम्यान आला. भौगोलीक दृष्ट्या हा महामार्ग सुरु होतो सोलापूर येथून तर संपतो धुळे येथे, पण सर्वात जास्त अंतर हा महामार्ग मराठवाड्यातून जातो तुळजापूर ते औरंगाबाद असा, साधारण पणे ३०० ते ३२५ किमी चे अंतर हे मराठवाड्यातील आहे, हा महामार्ग मराठवाड्याचे दक्षिण टोक ते उत्तर टोक जोडण्याचा प्रयत्न करतो.
तसा हा महामार्ग जुना महत्वाचा व्यापारी मार्ग आहे कारण सोलापूर वरून हैद्राबाद पर्यंत याच मार्गे जात येते तर धुळे येथुन राष्ट्रीय महामार्ग ला सुद्धा लागत येते. त्यामुळे हा महामार्ग हैद्राबाद ते आग्रा पुढे दिल्ली पर्यंत जोडणारा व्यापारी महामार्ग आहे असे म्हणता येईल.
या महामार्गावर मी काही आज पहिल्यांदा जात नाही, आजन्म प्रवास या महामार्गा वरून झाला आहे पण या महामार्गची काही वर्ष पूर्वीची स्थिती (२०१४ पूर्वी) आताच्या स्थितीत खूप बदल झाला आहे. पोटातले पाणी ही हलता प्रवास करणे म्हणजे काय याचा अनुभव आज मी घेतला, महामार्गाचे झालेले चौपदरीकारण, महामार्गाला लागून असलेले सेवा रस्ते, ओव्हर ब्रिज, शहर गावा बाहेरून काढलेले रस्ते, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केलेली कामे, योग्य पथ दर्शक या मुळे प्रवास सोपा होत जातो आणि हलका सुद्धा, एकेकाळी याच महामार्गा वरून उस्मानाबाद ते औरंगाबाद प्रवासास ते १० तास लागायचे तो प्रवास आता निम्म्या वेळेत म्हणजे ४तासात पूर्ण होत आहे. जुन्या मांजरसुबा घाटाची धोकादायक वळणे आता उरली नाही आणि कुंथलगिरी धार्मिक व्यापारी महत्व लक्षात घेऊन नवीन महामार्गाची निर्मिती झाली आहे. शहागड येथील गोदावरी नदीवरचा पूल किंवा चित्ते पिंपळगाव MIDC करीता रस्त्याची व्यवस्था योग्य पद्धतीने आपल्याला लावलेली दिसून येते. 
या महामार्गाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूर-उस्मानाबाद मार्गा वर उभ्या असलेल्या WindMills पवनचक्या, महामार्गाच्या सुशोभी करणार भर टाकतात. सिमन्स कंपनी भारत सरकारच्या एकत्रित प्रकल्पात ३५ WindMills या मार्गावर उभ्या आहेत. ऊर्जा निर्मिती महामार्ग सुशोभीकरण या एक वेगळा अनुभव या बदललेल्या महामार्गावरून जाताना आपल्याला घेता येईल.

धन्यवाद                                                                                                            ©विराज