Friday 15 May 2015

जागतिक राजकारण...भारत आणि चीन

भारताचे मा. पंतप्रधान सध्या चीन दौरयावर आहेत व अपेक्षेप्रमाणे या दौरयाची सुध्या चर्चा होताना दिसत आहे, चर्चा फक्त भारतात किंवा चीन मध्ये फक्त नसून जागतिक स्तरावर होताना दिसत आहे, जागतिक मीडिया मा. पंतप्रधानाच्या प्रत्येक दौरयाला महत्व देतच आसते पण या दौरयाचे महत्व आलागच आहे आसे मला वाटते.

एक अविश्वासाचे व अस्थिरतेचे वातावरण दोन्ही देशात आहे, व दोन्ही देश एकमेकांन विरुद्ध शंकेचे वातावरण निर्माण व्हावे आहे बरेच काही घडत असते व घडले आहे. पण एक जागतिक राजकारणाचा रेटा म्हणा किंवा बदलत्या आर्थिक घडामोडीची गरज म्हणा पण या दोन बलाढ्य व सर्वात जुन्या संस्कृतीच्या देशांना एकत्र येण्यास भाग पडत आहे हे विशेष.

मा. पंतप्रधानाच्या या दौरयाची अजून एक पार्श्वभूमी आशी की, मागील महिन्यात चीनने केलेले कोट्यावधीची पाकिस्तानातील गुंतवणूक. आज इस्लामीक व कट्टरपंथीया साठी चीन एक मदतनीसाची भूमिका बजावताना दिसत आहे. या करिता इतिहासापासूनची चीनची असलेली आक्रमक वृत्ती जवाबदार असावी. चीनची विस्तार वादाची भूमिका जागतिक इतिहासाला महागात पसलेली आहेच. १९९० च्या दशकात ज्या प्रमाणे सोवियेत युनियन किंवा आताच्या रशियाने जागतिक राजकारणावर आपला ठसा उमटावन्या साठी कट्टरपंथीयाना मदत करत होता, त्याच प्रमाणे मला वाटते चीन हा सुध्याआज पाकिस्तान व त्याचा भावंडाना मदत करत आहे. या मदती मागे निश्चित भारतच्या बुऱ्याचा विचार आसू शकतो, पण जागतिक राजकारणात भारताची नव्याने निर्माण होणारी प्रतिमा व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे सबंध लक्षात घेता चीन किती धारिष्ट्य करेल हे पहावयास हवे.
आज पुन्हा एकदा जग दोन ध्रुवात विभागले जात आहे आसे दिसते, एकजेकी कट्टरपंथीयाचे समर्थक व दुसरे कट्टरपंथीयांचे विरोधक. आता भारत व चीन या दोनी राष्ट्रंना ठरवायचे आहे की हे कुठल्या पंक्तीत बसणार, पण एक मात्र निश्चित की हे दोन्ही राष्ट्रं एकमेकांच्या विरोधात बसतील आसे दिसते.

वंदेमातरम्                                              विराज