Sunday 8 November 2015

Bihar Verdict

Bihar Verdict, Its Victory of "MahaGatabandhan", there is no single party Verdict; Mandate of People of Bihar is for all alliances parties. It's alliance victory; no single party can able to form government on its own. Also again People of Bihar show trust on #state_parties, last year Delhi this year Bihar got clear mandate for state parties. But my opinion India shouldn’t  have future with state parties. It's true the #NitishKumar ji given good government, but it doesn’t mean its victory of RJD & Congress, also NitishKumar ji depend on weak reliable partner. Most important Bihar will run by the alliance government and both the major parties have same strength in assembly & hence both parties have same influence on government. Congress will be in miner role as well as Congress doesn’t create much impact on government coz rest two in comfortable majority in assembly. There is one unanswered questions, How NitishKumar ji fulfill the dream  of Bihar, development of Bihar with equal strength partner. Again it shows people of Bihar have weak trust on National parties. This verdict set new benchmark in National Politics & it may create huge impact on coming election of five states and President Election. This is willing result for all state parties in India.
Congratulation NitishKumar ji, Lalu ji


Vande Mataram                                           Viraj                                              


Sunday 9 August 2015

विश्व साहित्य संमेलन कशाला हवे????

एकाच वर्षात दोन-दोन साहित्य संमेलनाचा घाट कशासाठी? काय निकड आहे दोन साहित्य संमेलनाची? आखिल भारतीय व विश्व साहित्य संमेलन म्हणजे काय? या साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या विकासासाठी व प्रचार साठी काय फायदा होणार आहे? तुम्हला वाटेल मी लेखाच्य सुरवातीला इतके प्रश्न का विचारात आहे. पण माझ्या सामान्य मनाला सारस्वताच्या मेळाव्य बदल पडलेले हे प्रश्न आहेत. पण मी एक गोष्टी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो की मला मराठी भाषेचा आदर आहे व मी मराठी भाषेचा गर्व बाळगतो, माझे शिक्षण मराठी भाषेत झाले असून, मला मराठी साहित्यात विशेस रुची आहे.
पण हे हि तेवढेच खरे की, मराठी साहित्य मंडळाच्या ये कारभाराची कीव येते. याच वर्षाच्या सुरुवातीस मार्च महिन्यात घुमान (पंजाब) येथे आखिल भारतीय साहित्य संमेलन झाले, संत नामदेव महाराजाच्य कर्मभूमीत साहित्याचा मेळावा लागला, पंजाबी सर्व सामान्य माणसाना मराठी भाषेची व संस्कृतीची ओळख झाली, मराठी भूमी पासून हजारो मैल अंतरावर यशस्वी झाला, मराठी भाषा व मराठी साहित्याचा प्रसार होण्याकरिता त्याचा उपयोग झाला. आशा प्रकारच्या उपक्रमाचे स्वागतच झाले पाहिजे, भारत भूमीच्या वेगवेगळ्या प्रदेशात हे संमेलना व्हावेत व त्याद्वारे मराठी भाषेची गोडावी सर्व श्रुत व्हावी. पण लगेचच दोन महिन्यात मला वाचायला मिळाले ते विश्व साहित्य संमेलना बदल, मला आश्चर्यचा धक्का बसला. विश्व साहित्य संमेलन आणि अंदमान-निकोबर बेटावर, मला हे लक्षातच येत नाही की अंदमान-निकोबर या भारताच्या भागावर “विश्व” या नावाने साहित्य संमेलन कसे काय होऊ शकते????? माझा प्राप्त ज्ञाना प्रमाणे ते केंद्रशासीत प्रदेश आहे, व सध्या तरी भारताच्या नकाशावर आहे, आणि मुळातच विश्व साहित्य संमेलन कशाला हवे????
मराठी साहित्याचा प्रचार व्हावा आणि नवीन लेखकाला प्रोत्साहन मिळावे हे जरी खरे असले तरी खरच मराठी साहित्य संमेलनातून हा हेतू साध्य होतो का?? आणि होत असेल तर त्याचा परिणाम काय??? ओस पडणाऱ्या मराठी शाळ !!! की फक्त साहित्य संमेलने म्हणजे सरकारच्या पैसा वर साहित्याकांची सहल ??? व ती सुद्धा वर्षातून दोनदा. आज मराठी शाळांची स्थीती काय आहे, मराठी शाळेत जाणारे विद्याथी किती, मराठी विषय घेऊन शिकणारे किती ??? या गोष्टीचा आभ्यास मराठी साहित्य मंडळाने केल पाहिजे. आज या साहित्य संमेलनाच्या खर्चतून मराठी शाळांना देणगी दिल्यास मराठी शाळांची परीस्थिती सुधारू शकते. महाराष्टातील ग्रामीण भागात आसे साहित्य संमेलन भरलयास मराठीचा प्रचार तर होईलच पण नवीन लेखकाला ही प्रोत्साहन मिळेल. आर्थत यातून मन- सन्मान आणि प्रसिद्धी मिळणार नाही, पण मराठी भाषे साठी काम केल्याचे समाधान मिळेल. आज महाराष्टातील ग्रामीण भागात वाचनालय नाहीत, वचन संस्कृती नाही, ग्रामीण भागातील साहित्य संमेलनामुळे वचन संस्कृती रुजवली जाऊ शकते, व या करिता मराठी भाषा साहित्य मंडळाचे व साहित्यिकाचे ऋणी राहील.
स्व. विनायक दामोदर सावरकरंच्या नावाने पोर्टब्लेरअर येथे हे विश्व साहित्य संमेलन होत आहे, त्या शब्दप्रभू सावरकरांना आदरांजली म्हणजे, त्याचे साहित्य व त्यांनी दिलेले मराठी शब्द रोजच्या चलनात आणणे व सामान्य मराठी वाचका पर्यंत पोहचवणे. हीच खरी आदरांजली आसू शकते. मराठी साहित्य अमर आहे व ते चिरंतर आहे पण त्याचा खोटा देखावा नको आसे मला वाटते. मराठी साहित्य मंडळ पुणे यांनी याचा विचार करावा.
धन्यवाद

वंदेमातरम्                                                    विराज     

Friday 15 May 2015

जागतिक राजकारण...भारत आणि चीन

भारताचे मा. पंतप्रधान सध्या चीन दौरयावर आहेत व अपेक्षेप्रमाणे या दौरयाची सुध्या चर्चा होताना दिसत आहे, चर्चा फक्त भारतात किंवा चीन मध्ये फक्त नसून जागतिक स्तरावर होताना दिसत आहे, जागतिक मीडिया मा. पंतप्रधानाच्या प्रत्येक दौरयाला महत्व देतच आसते पण या दौरयाचे महत्व आलागच आहे आसे मला वाटते.

एक अविश्वासाचे व अस्थिरतेचे वातावरण दोन्ही देशात आहे, व दोन्ही देश एकमेकांन विरुद्ध शंकेचे वातावरण निर्माण व्हावे आहे बरेच काही घडत असते व घडले आहे. पण एक जागतिक राजकारणाचा रेटा म्हणा किंवा बदलत्या आर्थिक घडामोडीची गरज म्हणा पण या दोन बलाढ्य व सर्वात जुन्या संस्कृतीच्या देशांना एकत्र येण्यास भाग पडत आहे हे विशेष.

मा. पंतप्रधानाच्या या दौरयाची अजून एक पार्श्वभूमी आशी की, मागील महिन्यात चीनने केलेले कोट्यावधीची पाकिस्तानातील गुंतवणूक. आज इस्लामीक व कट्टरपंथीया साठी चीन एक मदतनीसाची भूमिका बजावताना दिसत आहे. या करिता इतिहासापासूनची चीनची असलेली आक्रमक वृत्ती जवाबदार असावी. चीनची विस्तार वादाची भूमिका जागतिक इतिहासाला महागात पसलेली आहेच. १९९० च्या दशकात ज्या प्रमाणे सोवियेत युनियन किंवा आताच्या रशियाने जागतिक राजकारणावर आपला ठसा उमटावन्या साठी कट्टरपंथीयाना मदत करत होता, त्याच प्रमाणे मला वाटते चीन हा सुध्याआज पाकिस्तान व त्याचा भावंडाना मदत करत आहे. या मदती मागे निश्चित भारतच्या बुऱ्याचा विचार आसू शकतो, पण जागतिक राजकारणात भारताची नव्याने निर्माण होणारी प्रतिमा व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे सबंध लक्षात घेता चीन किती धारिष्ट्य करेल हे पहावयास हवे.
आज पुन्हा एकदा जग दोन ध्रुवात विभागले जात आहे आसे दिसते, एकजेकी कट्टरपंथीयाचे समर्थक व दुसरे कट्टरपंथीयांचे विरोधक. आता भारत व चीन या दोनी राष्ट्रंना ठरवायचे आहे की हे कुठल्या पंक्तीत बसणार, पण एक मात्र निश्चित की हे दोन्ही राष्ट्रं एकमेकांच्या विरोधात बसतील आसे दिसते.

वंदेमातरम्                                              विराज