Sunday 7 January 2024

लक्षद्विप ला आता लक्ष लक्ष नजरा...

 

नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप चा दौरा केला त्याचे काही फोटो समाज माध्यमातून आणि इतर माध्यमातून प्रसारित झाले आणि अनेकांच्या बुडाला आग लागली. अनेकांना या दौऱ्याचा प्रचंड त्रास झाला. अनेकांना लक्षद्वीप हा भारताचा भाग आहे तेच या दौऱ्यामुळे पहिल्यांदा कळले. अनेकांना लक्षद्वीप भारताच्या नेमके कोणत्या किनाऱ्यावर आहे हेच माहित नव्हते, म्हणजे अरबी समुद्रात आहे कि बंगालच्या उपसागरात येथून सुरवात. तर या लक्षद्विप ची गोष्ट मोठी रंजक आहे.

लक्षद्वीप भारताच्या पश्चिम बाजूस म्हणजे अरबी समुद्रात मलबार कॉस्ट (केरळ) च्या किनाऱ्या पासून २२० किमी अंतरावर ३६ छोट्या छोट्या बेटांचा समूह आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौरस किमी इतके आहे. लक्षद्विप मध्ये एक जिल्हा, १० पंचायत आहेत. एकूण लोकसंख्या २०११ प्रमाणे  ६४४७३ आहे तर बहुतांश मुस्लिम धर्मीय लोक वस्ती येथे आहे. साक्षरतेचे प्रमाण ९१% इतके आहे. लक्षद्वीप भारताच्या केंद्र शासित प्रदेशा पैकी एक आहेत. कवरत्ती हे राजधानीचे ठिकाण आहे. १७व्या लोकसभेत मोहम्मद फैझल हे लक्षद्वीप चे प्रतिनिधी होते. ते महाराष्ट्रतील चार खासदार असलेल्या पक्षाचे सदस्य आहेत व २००९ मधील एका हिंसाचाराच्या खटल्यात जानेवारी २०२३ पासून शिक्षा भोगत आहेत, या शिक्षेमुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे.  भारताच्या नकाशावर लक्षद्वीप मालदीव व भारताच्या मध्ये येते. मालदीव इतकाच किंबहुना त्याहून सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा आणि निसर्ग लक्षद्वीप ला लाभले आहे. पर्यटन करता प्रचंड वाव आणि कमी खर्चात लक्षद्वीप मध्ये शक्य आहे. या पूर्वी सुद्धा भारताचे पंतप्रधान लक्षद्वीप ला गेले होते. १९८७ ला भारताचे त्यावेळेस चे पंतप्रधान स्वा. राजीव गांधी १० दिवसाच्या कौटुंबिक सहली साठी INS विक्रांत वरून लक्षद्वीप ला गेले होते. कवरत्ती येथे पोहांचून छोट्या हेलिकॅप्टर ने ३६किमी अंतरावरील वैयक्तिक बेटावर गेले होते. अर्थात ती कौटुंबिक आणि वैयक्तिक सहल असल्यामुळे माध्यमांना प्रवेश नव्हता आणि तेव्हा समाज माध्यम नव्हती त्यामुळे फक्त त्याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्या. नाही म्हणायला R K LAXMAN यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर भाष्य तेव्हा केले होते. मात्र पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लक्षद्वीप ला भेट दिली तेव्हा पासून भारतातील आणि भारताच्या शेजारील देशातून अनेकांना त्रास सुरु झाला आहे. पंतप्रधानांच्या या भेटीचा राजकीय व पर्यटन दोन स्पष्ट अर्थ निघतात.



मागील वर्षी मालदीव मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीत मोहम्मद मुइझ्झू हे निवडून आले त्यांनी इब्राहिम मोहम्मद सोलीही यांचा पराभव केला. मालदीव च्या अर्थ व्यवस्थेवरती चीनच्या कर्जाचा भार आहे व मोहम्मद मुइझ्झू हे तसे चीन समर्थक उमेदवार सध्या अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सत्तेवर येताच भारताला सदिच्छा भेट दिली. मात्र त्यांच्या भारत विरोधी कारवाया सुरूच आहेत. त्यांच्या या भारत विरोधी कारवायांना चीन चे पाठबळ आहे असा आरोप केला जातो. त्या दृष्टिकोनातून सुद्धा मा पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी कडे पाहिले जात आहे. मालदीव ला चीन आर्मी बेस बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अरब समुद्रात चीनचे नाविक दल कार्यरत होऊ शकेल. व ते भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे.


दुसरे म्हणजे पर्यटन, समुद्र किनारा लाभलेल्या  सर्व देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असते. श्रीलंका किंवा मालदीव यांच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटनाचा मोठा हातभार आहे. या दोन्ही देशांच्या शेजारी भारता सारखा खंडप्राय देश आहे. भारत जगातील प्रभावशाली अर्थव्यवस्था बनत आहेत. अशावेळी भारतातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक या


देशांना भेट देत असतात आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात. पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटी मुळे आणि तेथील समुद्र किनाऱ्या वरील व निसर्गाच्या फोटो मुळे अनेक भारतीय येणाऱ्या काळात मालदीव ला भेट देणार होते त्यांचे लक्ष लक्षद्वीप कडे वळले आहे. आर्थिक दृष्ट्या सुद्धा लक्षद्वीप भेट भारतीयांना परवडणारी आहे. त्यामुळेच आज मालदीव चे मंत्री झाहिद रमीझ यांनी पंतप्रधानाच्या लक्षद्वीप भेटीवर टीका केली आणि "भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आहे." असे म्हटले त्यामुळे त्यांना मालदीव सरकारने  निलंबित केले आहे पण पंतप्रधानाच्या भेटीचा योग्य तो संदेश मालदीव सरकारला मिळाला आहे असे म्हणावे लागले.

तूर्त एवढेच

धन्यवाद

विराज वि देवडीकर

 

https://www.newindianexpress.com/galleries/nation/2019/may/10/from-our-archives-rajiv-gandhis-lakshadweep-holiday-guess-who-else-was-there-102271--4.html