Monday 10 September 2018

योद्धा-संन्यासी...शिकागो सर्व धर्म परिषद


१२५ वर्ष, शिकागोतील धर्म परिषदेला आज १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदानी शिकागो धर्म परिषदेच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सत्रात शेवटचे भाषण केले. साधारण ते . मिनिटाचे किंवा ४०० ते ५०० शब्दांचे हे भाषण हिंदू धर्माची पुरेपूर योग्य ओळख करून देण्यास उपयुक्त झाले. त्यांनी नुसती ओळखच नाही तर आजच्या जागतिक परीक्षेपात सुद्धा हिंदू हिंदुस्थान त्याच मापदंडावर कसा खरा उतरत आहे हे आपल्याला दिसून येते. फार मोजक्या शब्दात पण नेमके पणे हिंदू धर्माची व्याख्याच स्वामी विवेकानंदानी त्या दिवशी धर्म परिषदेत मांडली असे म्हणता येईल. या परिषदेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांची दोन वेगवेगळी रूपे जगा समोर आली, एक रूप होते "संन्यासाचे" (MONK) तर दुसरे रूप "योध्या" चे त्यामुळे त्यांना "योद्धा-संन्यासी" हे विशेषण लागू पडते.

स्वामी जींच्या एका वेगळ्या प्रतिमेची त्याकाळी जगाला भुरळ पडली. हिंदू धर्माचे ते प्रचारक तर होतेच पण त्याच बरोबर सकल मानवतेचे सहिष्णुतेचे सुद्धा प्रचारक ते या परिषदेच्या माध्यमातून झाले असे म्हणता येईल. एक साधे तत्वज्ञान जे की वेदांमधून प्रगत झाले, श्रीकृष्णाने रणभूमी वरती गीतेतून सांगितले, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या परंपरेतून सर्वसामान्य पर्यन्त पोहचले ते म्हणजे "सहिष्णुता" (Tolerance) आणि "सर्वसमावेशकता" (Universal Acceptance) हे दोन तत्वे हिंदू धर्मानेच जगाला शिकवली असे म्हणता येईल. ज्या ज्या वेळी जगात हिंसाचार, कट्टरता, कर्मठता दिसली त्या त्या वेळी याच मूल्यांनी पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवली. ज्या वेळी विश्व युद्धाच्या छायेत जात होते त्या त्या वेळी भारताने बुद्ध दिले, /११ नेच जगाला नरसंहाराचा पाठ दिला धर्मांध कट्टरतेची भयानकता दाखवली. आज हीच मूल्यांची मानव जातीस वाचवू शकतात असे म्हणता येईल. एका बाजूने काही कट्टरतावादी धर्म प्रचाराच्या निमित्याने कत्तली करत असताना हिंदू धर्माची हीच तत्वे जगतीक शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, "We believe not only universal toleration, but we accept all religions as true” हे वाक्य हिंदू विचारधारेतील सहिष्णुतेचे खूप मोठे प्रतीक आहे, आजच्या जागतिक स्थितीत कोणताही धर्म इतर धर्मा बद्दल या प्रकारचे विचार ठेवत असेल असे वाटत नाही. हे सर्व सांगताना स्वामी जींनी काही ठळक महत्वपूर्ण संदर्भ दिले आहेत, रोमन हल्लेखोरा पासून वाचण्या करीत इस्राईल लोकांनी भारतातच आश्रय घेतला किंवा पारशी धर्माच्या लोकांना भारत भूमी आपली वाटणे, आपली पालन पोषण करणारी वाटणे या भूमीत त्यांना सुरक्षित वाटणे हेच हिंदू धर्माच्या सर्वसमावेशकतेचे उदाहरण आहे.
ज्या प्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला मिळतात, त्या प्रमाणे धर्म, संस्कृती, विचार, प्रार्थना पद्धत, भाषा, वंश अशा विविध मार्गाने जरी आपण आपले आयुष्य मार्गक्रमित असलो तरी शेवटी ते सर्व मार्ग हे एकाच भगवंता पर्यंत जातात. पसायदानाचा दोन पंक्तीनी हिंदू धर्माच्या सहिष्णुतेची सर्वसामावश्यकतेची व्याख्या केलेली दिसते,
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे पडो मैत्र जिवाचे ।।
दुरितांचे तिमीर जावो विश्व् स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणी जात ।।

हा संदेशच स्वामी विवेकानंदानी सर्व धर्म परिषदे मध्ये ११ सप्टेंबर १८९३ रोजी मांडली, त्या घटनेला आज १२५ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ही एक शब्दांजली...

वंदे मातरम                                                                               विराज