Friday 11 November 2022

भारत जोडो यात्रा

 “इंडिया दॅट इज भारत इज युनियन ऑफ स्टेटस”  राज्यघटना कलम एक चा संदर्भ असलेले हे वाक्य केम्ब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात काँग्रेस च्या नेतृत्वाने तीन वेळा उल्लेख केला, त्यावर तेथे उपस्थित असलेल्या एका भारतीय तरुणाने त्यांना भारतीय संविधानाच्या सुरवातीला असलेल्या Preamble मधील Nation या शब्दाची आठवण करून दिली, व संविधानकर्त्यांना भारत हे एक राष्ट्र असल्याचे अभिप्रेत होते सांगितले. भारत जोडो यात्रेची मांडणी करताना वरील विचार फार महत्वाचे ठरतात.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता चार दिवस झाले आहेत, महाराष्ट्रातील सीमावर्ती नांदेड जिल्यामधून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करती झाली. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न निश्चित करत आहे. मुळात हेच उद्दिष्ट या यात्रेचे आहे, गलितगात्र झालेल्या काँग्रेस मध्ये या यात्रे मुळे राजकीय प्राण फुंकण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या करिता काँग्रेस चे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

या यात्रेची सुरवात ७ सप्टेंबर रोजी केरळ राज्यातून झाली, ६० दिवसाच्या वर या यात्रेत राहुल गांधी चालत आहेत आणि दक्षिणेतील राज्य संपून आता ते मध्य भारतातील राज्यात येत आहेत. दक्षिणेतील राज्य त्यामानाने या यात्रे करिता अनुकूल आणि येथील राजकीय परिस्थिती सुद्धा काँग्रेस करता अनुकूल अशी आहे, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा येथे भाजप विरोधी राज्य सरकार आहेत तर आंध्र मध्ये प्रादेशिक पक्ष YSR काँग्रेस सत्तेत आहे, YSR काँग्रेस भाजप करिता सहयोगी आहे.  फक्त कर्नाटक राज्य भाजप शासित आहे. त्यामुळे दक्षिण भारतात यात्रे करताचा प्रवास सुखकर होता. यात्रेची खरी परीक्षा आता सुरु होत आहे, महाराष्ट्रातून ही यात्रा हिंदी बेल्ट मध्ये प्रवेश करेल. हिंदी बेल्ट मधील बहुतांश राज्य भाजप शासित आहेत व हीच राज्य देशाचा पंतप्रधान ठरवतात, विशेष करून उत्तर प्रदेश. त्यामुळे या राज्यात ही यात्रा किती प्रभावशाली ठरेल हे पाहणे जरुरीचे आहे. 


या वर्षाच्या सुरवातीला राजनीती विश्लेषक प्रशांत किशोर यांनी काँग्रेस च्या सर्वोच्च नेतृत्वा समोर काही तथ्याची मांडणी केली व काही बदल अपेक्षित केले,  त्यातील महत्वाचे बदल म्हणजे लोकशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक आणि काँग्रेस अंतर्गत निवडणूका, त्यासोबत प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांची काँग्रेस करिता जोडणी हे दोन प्रमुख बदल काँग्रेस नेतृत्वा समोर ठेवले गेले असण्याची शक्यता आहे. त्यातील काँग्रेस अंतर्गत निवडणुका आणि मल्लीकार्जून खरगे यांची काँग्रेस अध्यक्ष पदी दोन दशका नंतर निवड झाली तर भारत जोडो यात्रेच्या निमित्याने पदयात्रा काढून राहुल गांधी यांचे नेतृत्व सर्वसामान्य लोकं पर्यंत नेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. या पूर्वी सुद्धा ९० च्या दशकात व त्यांनतर २००४ च्या निवडणुकी पूर्वी लाला कृष्ण आडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती आणि त्याचा प्रचंड प्रभाव जन सामन्यात निर्माण झाला होता. देशाचं राजकारण ढवळून निघाले होते व भाजप देशाच्या राजकारणात सत्ता केंद्रित पक्ष झाला होता. देशातील सर्व माध्यम समूहांनी त्यावेळी रथ यात्राचे स्पेशल कव्हरेज केले होते. लाला कृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा सर्व सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय झाली होती. या रथ यात्रे द्वारे निवडणुकीचे मुद्दे भाजपा ने योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहंचवले होते. त्या मुद्द्यांचा प्रभाव लोकांमध्ये दिसत होता व त्याचे रूपांतर नंतर मतदानात झाले. लाला कृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेचा वाढता प्रभाव पाहून बिहार मधील लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने ती रथ यात्रा अडवली आणि अडवाणी यांना अटक केली.

२०२४ ची तयारी म्हणून या यात्रे कड़े नक्कीच पाहावे लागेल, हि यात्रा १५० दिवसांनी फेब्रुवारी २०२३ ला काश्मीरमध्ये संपेल तेव्हा  देशातील सार्वत्रिक निवडणुकीला फक्त सव्वा वर्ष राहिलेले असेल, अर्थात भाजपने सुद्धा २०२४ च्या निवडणुकीची तयारी नक्कीच सुरु केली आहे. २०१२ च्या हिवाळ्यात अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकाचे आंदोलन दिल्लीत सुरु झाले. अण्णांच्या या आंदोलनाचा फायदा नंतरच्या काळात भाजपाला झाला. ते आंदोलन सर्व व्यापी झाले, भ्रष्टाचार हा विषय लोकांनी लावून धरला आणि तत्कालीन केंद्र सरकार विरुद्ध देश व्यापी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात समाजातील सर्व स्थरातील लोक सहभागी झाले आणि अण्णा हजारे यांच्या उपोषणाला समर्थन दिले. हे आंदोलन यशस्वी होण्यामध्ये त्यावेळेस माध्यमांनी विशेष भूमिका बजावली. त्या प्रमाणेच काँग्रेस या भारत जोडो यात्रेच्या निमित्याने केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभर या यात्रेच्या माध्यमातून चळवळ उभी करणायचा प्रयत्न सुरु आहे. मात्र या यात्रेस अजून सुद्धा म्हणावे तसे जन आंदोलनाचे स्वरूप आलेले नाही आणि अजून सुद्धा सर्वसामान्य भारतीय या यात्रेत जोडले गेलेले नाहीत.

या यात्रेच्या निमित्याने वातावरण निर्मितीचा काँग्रेस चा प्रयत्न आहे पण अजून तरी या यात्रेचा प्रभाव सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर झालेला दिसत नाही. या यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्व सहभागी झालेले दिसतात ज्यात प्रादेशिक पक्षांचे नेते, अभिनेते, कलाकार, लेखक, धर्मगुरू, समाज सेवक आणि समाजात प्रभाव निर्माण करणारे लोक उपस्थित आहेत पण सामान्य भारतीय अजून सुद्धा या यात्रे पासून काही अंतर राखून आहे असे दिसते. देशातील प्रमुख माध्यमे सुद्धा या यात्रे बद्दल फार चर्चा करताना दिसत नाहीत. सोशल मीडिया सारखे प्रभावी माध्यम असताना सुद्धा काही मोजकेच पत्रकार या यात्रे बद्दल लिहताना दिसत आहेत तर काही मोजकीच व्यक्तिमत्व या यात्रेत सहभागी होत आहेत.

या यात्रेचे अनेक फायदे काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात होऊ शकतात, त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे राहुल गांधी यांचे देशव्यापी नेतृत  प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याच बरोबर काँग्रेस तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व स्वीकारणार नाही हे या यात्रेतून काँग्रेस ने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेस च करेल हे ठामपणे काँग्रेस ने सांगितले आहे. या यात्रे च्या निमित्याने राहुल गांधी यांना देशातील सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येईल. आपले विचार सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येतील. या यात्रे मध्ये राहुल गांधी यांनी स्वतःचा लुक सुद्धा बदलेल दिसत आहे.

हि यात्रा सुरु असतानाच गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यात निवडणूक होत आहेत. हि दोन्ही राज्य भाजप शासित आहेत, निवडणुकीचा निकाल ही यात्रा संपण्याच्या आत येणार आहे. ही यात्रा गुजरात मध्ये प्रवेश करत असताना तेथील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहंचला असेल. या यात्रेचा परिणाम निवडणूक निकालावरती काय होतो आणि ही यात्रा काँग्रेस करिता किती मतदान मिळवण्यास मदत करते हे पाहणे गरजेचे आहे. 


वंदे मातरम 

विराज वि देवडीकर 

 


Sunday 14 August 2022

आझादी अभी अधुरी है


तीन दिवसांच्या सुट्ट्या म्हणून आता पुणे सोडत आहे,  पुण्याचे हे टोक ते टोक स्वतःच्या गाडी ने जाताना काही लक्षात येत नाही पण रिक्षा किंवा बस खूप वेगळे जाणवते. मागचे दोन-अडीच तास दक्षिण पुणे ते उत्तर पुणे असा प्रवास केला. रोज च दिसणारे पुणे वेगळे भासले. स्वातंत्राचा अमृत मोहत्सव साजरा करताना पुणे तीन रंगात जणू रंगून गेले आहे. केशरी, सफेत आणी हिरवा रंगांच्या तीन पण मूलभूत रचना. या तिन्ही रंगात नवं निर्मितीची क्षमता आहे. स्वातंत्र आणी नवीन भारताचे प्रतिक हे तीन रंग आहे. यातील अशोक चक्र भारताच्या पूर्ण पणाचे चित्रानं करते. पण हे पूर्ण स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत  अधिकार आहे. आपले सौभाग्या आपण परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाचा स्वीकार केला आहे. संविधान आपण स्वीकारले आहे पण "खंडित भारत" आपण स्वीकारला आहे का?



" आझादी अभी अधुरी है" या अटल जीं ची कविता आहे, खरंच हे स्वतंत्र्य अजून अपूर्ण आहे, पूर्ण भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. अखंड भारत अजून होने बाकी आहे. हिमालया पासून हिंद सागरा पर्यंत पसरलेला भारत अजून सुद्धा अपूर्ण आहे. हो आहे की..! स्वतंत्र्याच्या पूर्व संध्येला पाकिस्तान विलग झाला, गंगेच्या आणी यमुनेच्या खोऱ्यात वाढलेली संस्कृती विभक्त झाली. रावी, झेलम, सतलाज, चिनाब, सिंधू आमच्या पासून विलग झाल्या, या स्वातंत्र्यचा आम्ही स्वीकार केला पण आमच्याच हिंदूंची आहुती देऊन. सप्त नद्या आणी तीन सागरांनी चरण स्पर्श होणारी आमची माता आज 14 ऑगस्टला व्याकुळ आहे. स्वतंत्र पाकिस्तानचे अस्तित्व हे अखंड भारता चा शेवटचा तुकडा आहे. विद्येच आद्य दैवत माता सरस्वती च ज्ञानपीठीत पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे तर आदी महादेव हिमालच्या पर्वत रंगा मध्ये स्थित आहेत. एक न अनेक संस्कृतिक आणी भावनिक खुणा पाकिस्थान मध्ये आहेत ज्यात सामान्य भारतीय गुंतला आहेत. भगवान श्रीरामाचे "लव" यांनी वसवलेले लाहोर, पेशावर आणी कराची या सर्व शहरात भारतीय संस्कृतीच्या खुणा सापडतात. भारतीय म्हणून जात, धर्म, पंथ, वंश, भाषा आणी लिंग हे मान्य होणारच नाही पण पण खंड भारत स्वीकारणे हे येणाऱ्या पिढ्यान सोबत अन्यायकारक ठरणार आहे. संस्कृती म्हणून भारत अफगाणिस्थान पासून जावा - सुमात्रा, इंडोनेशिया पर्यंत एकच आहे. महाभारतात ल्या माता गांधारी पासून ते बामिया मधील भगवान बुद्धांच्या मूर्ती  पर्यंत  अफगाणिस्तान भारताच्या मुख्य भुभागाशी जोडला आहे तर हिंद महासागरात श्रीलंका ते इंडोनेशिया हे आज सुद्धा भारतीय असलेल्याचे प्रमाण देत आहेत. राजकीय दृष्ट्या हे विभक्त देश आहेत पण भावनिक व संस्कृतीक दृष्ट्या "भारत" या भू भागात सुद्धा नंदात आहे. आक्रमक सीमवाद आणी सीमांचे विस्तारिकारण अनेक देशांचे मुख्य धोरण आहे. One China Policy चीन ची आक्रमकता दाखवते. आपल्या नाकरत्या नेतृत्वा मुळे तिबेट त्यांनी कधीच घेतले आहे, आता अरुणाचलं प्रदेशावर हक्क सांगत आहे, तैवान आणी दक्षिण चिन समुद्र गिळायला ते बसले आहेत. प्रशांत महासागरात  जपान पर्यंत चीन चा ड्रॅगन आग ओकात आहे. मंगोलियन वंशाचे कारण देत आहेत. रशिया युक्रेन वर हक्क सांगत आहे, पुढे जाऊन सोव्हेत रशियाचे विखूरलेले तुकडे एकत्र करण्याचे स्वप्न रशिया पाहिलं. इस्लामिक देशात यापूर्वीच इस्लामच्या नावा खाली एक होण्याचा संकल्प OIC मध्ये केला आहे. युरोपा मध्ये सीमा विस्ताराचा तर इतिहासच आहे. मात्र अखंड भारत मात्र कथित बुद्धीवाद्यांना मान्य नाही. पाकिस्तानच्या स्वरूपात भारताचा शेवट चा तुकडा पडला व अखंड भारताची सुरवात सुद्धा या पासून व्हावी. 


"बस इसीलिए तो कहता हूँ आज़ादी अभी अधूरी है 
कैसे उल्लास मनाऊँ मैं? थोड़े दिन की मजबूरी है॥ 
दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे 
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥"


©विराज देवडीकर 

Wednesday 22 June 2022

राजकीय सर्वे: महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?

 

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या नंतर झालेल्या राजकीय घडामोडीवर काल पासून आम्ही ट्विटर वर एक सर्वे केला होता. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात नेमके काय दडले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक असलेल्या ट्विटर वरील ट्विटर हॅण्डल ने या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे (प्रश्न व पर्याय मराठीत असल्यामुळे). हा सर्वे कोणत्याही राजकीय पक्षा करिता अथवा त्या राजकीय पक्षाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन केलेला नाही. यात नोंदवलेली मते ही वेगवेगळ्या ट्विटर हॅन्डल ची आहेत आमची नाही.

प्रश्न १. भाजपचे पाच ही उमेदवार विजयी, आघाडीत बिघाडी झाली आहे का?

हा प्रश्न विधान परिषद निवडणुकीच्या निकाल नंतर लगेच विचारला गेला होता. या प्रश्नाचे उत्तर ९२.३% वाचकांनी "हो" असे दिले आहे तर "नाही" ७.७% वाचक म्हणत आहेत. माध्यमा मधून शिवसेने मधील   श्री एकनाथ शिंदे यांचा बंड तो पर्यंत समोर आलेला नव्हता. मात्र महा विकास आघाडीची मते फुटली आहेत हे विधान परिषद निवडणुकीच्या निकाला वरून दिसत होते. 
 

प्रश्न २. महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?


हा प्रश्न दि २१ जून २०२२ रोजी सकाळी वाचकांना विचारला, विधान परिषदेच्या निकाला नंतर शिवसेनेत जो श्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला व काही आमदारांच्या गटा सोबत सुरत गाठले, त्याच्या बातम्या माध्यमात फिरत असताना विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर ६६.७ % वाचकांना "हो" असे वाटते तर २६.३% वाचक "नाही" म्हणत आहेत. "माहित नाही" म्हणणारे ७% वाचक आहेत. येणाऱ्या काळात विधान सभेची त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आणि कोणत्याही पक्षाने अथवा गटाने सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होऊ शकते.

प्रश्न ३. आज समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास कोणता पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल?

या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी खूप स्पष्टपणे दिलेले दिसते, या प्रश्ना करिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पर्याय दिलेले होते. या प्रश्नाच्या उत्तरात ८०.१% वाचक भाजपच्या बाजूने कौल देत आहेत तर शिवसेना ७%, राष्ट्रवादी काँग्रेस ८.८% आणि काँग्रेस ४.१% वाचक पसंती देत आहेत. या प्रश्नातील वाचकांना स्पष्टपणे वाटते कि भाजप महाराष्ट्रात स्थिर सरकार देईल. या उत्तरातील अजून एक वैशिष्ट्य असे कि उर्वरित तीन पक्ष आणि भाजप यांच्यातील मत टक्केवारीची तफावत प्रचंड आहे. उर्वरित तिन्ही पक्षांची टक्केवारी एक केल्यास फक्त १९.९% इतकीच भरते. याचा अर्थ आता मध्यावधी निवडणूक झाल्यास भाजप ला ८०.१% मतदार पसंती देतील.

प्रश्न ४. समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंत कोण असेल?


या प्रश्नाच्या उत्तरात पर्याय होते श्री उद्धव ठाकरे, श्री देवेंद्र फडणवीस, श्री शरद पवार, श्री अजित पवार. या प्रश्नात काँग्रेस पक्षतील कोणताही नेत्याचे नाव नव्हते. मात्र श्री शरद पवार हे सर्व सहमतीचे नाव यात घेतले आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा वाचकांनी स्पष्टपणे दिले आहे, ७७.५% वाचकांना श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदा करिता पसंतीचे उमेदवार वाटतात. तर श्री उद्धव ठाकरे १३.४% वाचकांना पसंतीचे उमेदवार वाटतात. वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या सर्वे मध्ये सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदा करिता पहिली पसंती दिसून आली आहे.

प्रश्न ५. मविअ सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीला तुम्ही १ ते १० मध्ये किती गुण द्याल?(१ सर्वात कमी  तर १० सर्वेत्तम) 

या प्रश्नाच्या उत्तरा करिता गुणांचे चार गट केले आहेत, १) १ ते ३ गुण  २) ४ ते ६ गुण  ३) ७ ते ९ गुण आणि ४) १० गुण, वाचकांनी मविअ ला १ ते १० मध्ये गुण दिले आहेत यात १ हे सर्वात खराब व १० हे सर्वात उत्तम या प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. ६७.५% वाचक १ ते ३ गुण मविअ च्या अडीच वर्षाच्या कामगिरीला देतात तर १५.१% वाचक १० पैकी १० गुण देतात. ११.४% वाचक ७ ते ९ गुण मविअ ला देताना दिसत आहे. ४ ते ६ गुण फक्त ६% वाचक देत आहेत. या प्रश्ना द्वारे मविअ च्या अडीच वर्षाच्या कारभाराची जनतेच्या मनातील प्रतिमा दिसते. गट क्र ३ व ४ ची वाचकांची टक्केवारी एकत्र केल्यास २६.५% वाचक समाधानी आहेत असे दिसते.

प्रश्न ६. श्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर भाजपने सत्ता स्थापने साठी कोणती भूमिका घ्यावी असे तुम्हला वाटते?

या प्रश्नाच्या उत्तरा करिता पर्याय होते, १) सेना भाजप एकत्र २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र ४) मध्यावधी निवडणूक, या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा वाचकांचे वेग वेगळे मते दिसून येतात. १) सेना भाजप एकत्र  हा पर्याय भाजपाने निवडावा असे २५% वाचकांना तर २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत घ्यावे असे ३८.२% वाचकांना वाटते, ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र यावे असे फक्त ६.६ % वाचकांना वाटते तर मध्यावधी निवडणूक होतील असे ३०.३% वाचकांना वाटते. पर्याय क्रमांक १ व २ एकत्र केल्यास ६३.८% वाचकांना सेना भाजप ने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे असे वाटते.

 

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजप शिवसेना यांच्या युतीला मतदारांनी स्वीकारले होते व या युतीच्या बाजूने मतदान केले होते. येणाऱ्या काळात मविअ चे भवितव्य काय असेल हे  निश्चित होईल. तो पर्यंत धन्यवाद

 

(टीप; हा सर्वे ट्विटर वर घेतला आहे, याचा कालावधी मागील ३६ तास आहे. हा सर्वे एकूण ५२६५ वाचकांना पर्यंत पोहंचला आहे तर प्रत्यक्ष ६७८ वाचकांनी या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे.)

 

विराज वि देवडीकर 

Tuesday 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर

 

Thursday 14 April 2022

जय भीम

 

आज परम पूज्य डॉ भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेबांची १३१ वी जयंती, त्यांच्या पवित्र स्मृतीस विनंम्र अभिवादन.

"जय भीम ही फक्त आरोळी नाही, ती सुरवात आहे प्रत्येक अन्याया विरुद्ध लढण्याची...!!!"

 


या वर्षी "जय भीम" नावाचा चित्रपट पाहिला, या चित्रपटात कोठेही जय भीम नावाची घोषणा किंवा आरोळी दिली नव्हती पण हा चित्रपट एका कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी सांगत होता. बाबासाहेबांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र दिली. यातील संघर्ष हा अंतिम टप्पा जरी असला तरी याची सुरवात शिक्षणातून होते हे महत्वाचे, बाबासाहेबांचे चरित्र वाचतांना/आभ्यासतांना याची जणिव होत राहते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती बाबासाहेबांना अशाच संघर्षाला तोंड द्यावे लागले. लहान असताना शिक्षणा साठीचा संघर्ष, तरूणपणी अस्पृश्ते विरुद्धचा संघर्ष, समाजात स्वतःला प्रस्थपित करण्याचा संघर्ष, राजकीय संघर्ष, आणि स्वतःच्या समाजाला देशाच्या मूळप्रवाहात आण्यासाठीचा संघर्ष या सर्व काळात ज्ञान आणि शिक्षण बाबासाहेबांच्या सोबत होते. स्वतः शिकत राहणे, त्या शिकण्यातून/ज्ञानातून समाजाचे व देशाचे आध्यायन करणे आणि स्वतःचा एक विचार निर्माण करणे, त्या विचाराकरिता झगडणे/संघर्ष करणे व वंचितना न्याय मिळवून देणे बाबासाहेबांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेबांना बुद्धिनिष्ठ समाजाची अपेक्षा होती, असा समाज फक्त शिक्षणामुळे निर्माण होतो. शिक्षणामुळे अन्यायाची जाणीव निर्माण होते, अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची सुरवात संघटित होण्यातून होते  आणि संघर्षा मुळे न्याय मिळतो हे बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकायला मिळते. चवदार तळ्याचा संघर्ष फक्त पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता तर मूलभूत आधिकारां साठी होता, एकच पाणवठा सारख्या अनेक मूलभूत अधिकारा पासून वंचित असलेल्या समाजाला न्याय देण्याची सुरवात चवदार तळ्याच्या संघर्षातून बाबासाहेबांनी मिळवून दिला.



मागील वर्षी जेव्हा धनंजय कीर लिखित बाबासाहेबांचे चरित्र वाचायला घेतले तेव्हा त्यांच्या आयुष्याचे अनेक नवे पैलू समजायला सुरवात झाली. पुस्तकांबद्दल बाबासाहेबांना विशेष आकर्षण होते, मुंबईतील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी खूप मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात देश-विदेशातून त्यांनी आणलेली अनेक पुस्तके आहेत. न्यूयार्क मधील आठवण धनंजय कीर यांनी लिहून ठेवली आहे, बाबासाहेबांनी एकदा २००० जुनी पुस्तके न्यूयॉर्क मधून विकत घेतली व भारतात पाठवली होती. लंडन असेल किंवा न्यूयॉर्क असेल तेथील वास्तव्यात अनेक पुस्तके बाबासाहेबांच्या सोबत होती व नंतर ती मुंबईत संग्रहित करण्यात आली.

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर