Showing posts with label स्वराज७५. Show all posts
Showing posts with label स्वराज७५. Show all posts

Sunday, 14 August 2022

आझादी अभी अधुरी है


तीन दिवसांच्या सुट्ट्या म्हणून आता पुणे सोडत आहे,  पुण्याचे हे टोक ते टोक स्वतःच्या गाडी ने जाताना काही लक्षात येत नाही पण रिक्षा किंवा बस खूप वेगळे जाणवते. मागचे दोन-अडीच तास दक्षिण पुणे ते उत्तर पुणे असा प्रवास केला. रोज च दिसणारे पुणे वेगळे भासले. स्वातंत्राचा अमृत मोहत्सव साजरा करताना पुणे तीन रंगात जणू रंगून गेले आहे. केशरी, सफेत आणी हिरवा रंगांच्या तीन पण मूलभूत रचना. या तिन्ही रंगात नवं निर्मितीची क्षमता आहे. स्वातंत्र आणी नवीन भारताचे प्रतिक हे तीन रंग आहे. यातील अशोक चक्र भारताच्या पूर्ण पणाचे चित्रानं करते. पण हे पूर्ण स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत  अधिकार आहे. आपले सौभाग्या आपण परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाचा स्वीकार केला आहे. संविधान आपण स्वीकारले आहे पण "खंडित भारत" आपण स्वीकारला आहे का?



" आझादी अभी अधुरी है" या अटल जीं ची कविता आहे, खरंच हे स्वतंत्र्य अजून अपूर्ण आहे, पूर्ण भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. अखंड भारत अजून होने बाकी आहे. हिमालया पासून हिंद सागरा पर्यंत पसरलेला भारत अजून सुद्धा अपूर्ण आहे. हो आहे की..! स्वतंत्र्याच्या पूर्व संध्येला पाकिस्तान विलग झाला, गंगेच्या आणी यमुनेच्या खोऱ्यात वाढलेली संस्कृती विभक्त झाली. रावी, झेलम, सतलाज, चिनाब, सिंधू आमच्या पासून विलग झाल्या, या स्वातंत्र्यचा आम्ही स्वीकार केला पण आमच्याच हिंदूंची आहुती देऊन. सप्त नद्या आणी तीन सागरांनी चरण स्पर्श होणारी आमची माता आज 14 ऑगस्टला व्याकुळ आहे. स्वतंत्र पाकिस्तानचे अस्तित्व हे अखंड भारता चा शेवटचा तुकडा आहे. विद्येच आद्य दैवत माता सरस्वती च ज्ञानपीठीत पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे तर आदी महादेव हिमालच्या पर्वत रंगा मध्ये स्थित आहेत. एक न अनेक संस्कृतिक आणी भावनिक खुणा पाकिस्थान मध्ये आहेत ज्यात सामान्य भारतीय गुंतला आहेत. भगवान श्रीरामाचे "लव" यांनी वसवलेले लाहोर, पेशावर आणी कराची या सर्व शहरात भारतीय संस्कृतीच्या खुणा सापडतात. भारतीय म्हणून जात, धर्म, पंथ, वंश, भाषा आणी लिंग हे मान्य होणारच नाही पण पण खंड भारत स्वीकारणे हे येणाऱ्या पिढ्यान सोबत अन्यायकारक ठरणार आहे. संस्कृती म्हणून भारत अफगाणिस्थान पासून जावा - सुमात्रा, इंडोनेशिया पर्यंत एकच आहे. महाभारतात ल्या माता गांधारी पासून ते बामिया मधील भगवान बुद्धांच्या मूर्ती  पर्यंत  अफगाणिस्तान भारताच्या मुख्य भुभागाशी जोडला आहे तर हिंद महासागरात श्रीलंका ते इंडोनेशिया हे आज सुद्धा भारतीय असलेल्याचे प्रमाण देत आहेत. राजकीय दृष्ट्या हे विभक्त देश आहेत पण भावनिक व संस्कृतीक दृष्ट्या "भारत" या भू भागात सुद्धा नंदात आहे. आक्रमक सीमवाद आणी सीमांचे विस्तारिकारण अनेक देशांचे मुख्य धोरण आहे. One China Policy चीन ची आक्रमकता दाखवते. आपल्या नाकरत्या नेतृत्वा मुळे तिबेट त्यांनी कधीच घेतले आहे, आता अरुणाचलं प्रदेशावर हक्क सांगत आहे, तैवान आणी दक्षिण चिन समुद्र गिळायला ते बसले आहेत. प्रशांत महासागरात  जपान पर्यंत चीन चा ड्रॅगन आग ओकात आहे. मंगोलियन वंशाचे कारण देत आहेत. रशिया युक्रेन वर हक्क सांगत आहे, पुढे जाऊन सोव्हेत रशियाचे विखूरलेले तुकडे एकत्र करण्याचे स्वप्न रशिया पाहिलं. इस्लामिक देशात यापूर्वीच इस्लामच्या नावा खाली एक होण्याचा संकल्प OIC मध्ये केला आहे. युरोपा मध्ये सीमा विस्ताराचा तर इतिहासच आहे. मात्र अखंड भारत मात्र कथित बुद्धीवाद्यांना मान्य नाही. पाकिस्तानच्या स्वरूपात भारताचा शेवट चा तुकडा पडला व अखंड भारताची सुरवात सुद्धा या पासून व्हावी. 


"बस इसीलिए तो कहता हूँ आज़ादी अभी अधूरी है 
कैसे उल्लास मनाऊँ मैं? थोड़े दिन की मजबूरी है॥ 
दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे 
गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥"


©विराज देवडीकर 

Saturday, 2 October 2021

गांधीजी

 #वर्षाचा_दिवस_२७५वा

परवा गांधी जयंती निमित्याने मुलीला भाषण लिहून देत होतो, तेव्हा माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी शाळेत असताना गांधीजी म्हटलं कि अनेक टवाळखोर पोर "म्हतारा, टाकल्या, दात पडका" म्हणून संबोधायची, ते बालबोध दिवस होते पण जस जसा मोठा झालो तस तस बोध व्हायला सुरवात झाली आणि गांधी या चरित्राची ओळख झाली. ऍग्रीकल्चर ला बीड ला आल्यावर गांधी जींचं आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक वाचले आणि गांधी जी शी नव्याने ओळख झाली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वचा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामान्य पण होते, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे जाणवते. गांधीजी याच सामान्य पणा मुळे असामान्य व्यक्तिमत्व बनले असे म्हणता येऊ शकते. हा सामान्य पणा त्यांच्या लहानपणा पासून त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनां मध्ये दिसून येतो. बालपण, शिक्षण, लग्न, उच्च शिक्षण या मध्ये हा सामान्य पणा स्पष्टपणे जाणवतो. गांधीजींनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक चुका स्वीकारल्या आणि स्वतःच्या आत्मचरित्रात मांडल्या सुद्धा, त्यांचे आत्मचरित्र वाचताना आपल्याला हे विशेष जाणवत राहते.  या सामान्यपणातूनच त्यांच्यात तत्वनिष्टता निर्माण झाली असे म्हणता येऊ शकते, गांधीजी प्रचंड तत्वनिष्ठ होते आणि त्यांनी वैयक्तिक व राजकीय आयुष्यात ती तत्वे तेवढ्याच निष्ठेने पाळली. 


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य भारतीयांना जोडण्याचे काम गांधीजींनी केले, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग असे आहेत ज्यामुळे सामान्य भारतीय या लढ्याशी जोडला गेला, ज्यात असहकार आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चले जावं चळवळ असले. सामान्य भारतीय या प्रकारच्या लढ्यातून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकला. उपोषण, मौन, असहकार, स्वदेशी या सामान्य आंदोलना मुळे सामान्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर उरलाच पण स्वातंत्र्य लढ्याची चेतना भारत भर पोहंचवण्यास मदत झाली, या सर्व आंदोलनाची व्याप्ती भारत भर झाली आणि ते त्यांचे असणारे सामान्य स्वरूप आणि सर्व सामान्य लोकांचा सहभाग. १९१६ साली चंपारण्यातील निळं उत्पादक शेतकऱ्यांचा लढा गांधीजींच्या नेतृत्वा खाली लढला गेला व यशस्वी झाला, हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह ज्यामुळे सामान्य भारतीय लोकांना गांधीजींची ओळख झाली. गांधीजींचं नेतृत्व असामान्य होत हे निर्वीवादीत सत्य आहे. गांधीजींनी भारतीय सामान्य जणांना व्यवस्थित जाणलं होते, सामान्य भारतीयांना जोडल्याशिवाय भारताचे स्वतंत्र शक्य नाही याची जाण गांधीजींना नक्कीच होती. सामान्य लोकांच्या मध्ये रमणारे नेतृत्व गांधीजींचे होते.गांधीजींच्या नेतृत्वाची भुरळ आज सुद्धा असंख्य भारतीयांच्या मनावर आहे. अनेक सामान्य घटनांतून गांधीजींनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. टिळकांच्या निधना नंतर नेतृत्वहीन झालेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गांधीजींनी नेतृत्व तर दिलेच पण स्वरूप सुद्धा दिले. सामान्य भारतीय मनाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडण्यासाठी गांधीजींनी अर्ध नग्न असणाऱ्या सामान्य लोकं प्रमाणेच गांधीजींनी स्वतःचा वेष केला व तो आयुष्यभर जपला. 


गांधीजींची हिंदू धर्मा वरती निष्ठा होती आणि हिंदू संस्कृतीवर त्यांचा दृढ़ विश्वास होता. गांधीजींच्या दैंनंदिन आयुष्यातील अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे त्यांची हिंदू धर्मा वरील श्रद्धा स्पष्ट होते. या द्वारे सुद्धा गांधीजींनी स्वतःला सामान्य भारतीयांशी जोडले होते व त्याचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी करून घेतला.

गांधीजींच्या राजकीय विचारांशी आक्षेप असू शकतात, सक्षम लोकशाही पद्धतीत ते स्वीकारले पाहिजेत. माझ्या सहित अनेक जण त्यांच्या राजकीय मतांशी सहमत नसतील पण जगातील अनेक विचारवंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकारते, उद्योग व इतर क्षेत्रातील प्रतिभावंत आज सुद्धा गांधीजींना प्रेरक मानतात ते त्यांच्या सामान्यपणा मधून निर्माण झालेल्या सर्व व्यापी नेतृत्वाला.

आज गांधीजींच्या १५२ व्या जयंती निमित्याने त्यांना विनम्र अभिवादन

 

विराज विजयकुमार देवडीकर