Showing posts with label Indian freedom fighter. Show all posts
Showing posts with label Indian freedom fighter. Show all posts

Tuesday, 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर

 

Saturday, 2 October 2021

गांधीजी

 #वर्षाचा_दिवस_२७५वा

परवा गांधी जयंती निमित्याने मुलीला भाषण लिहून देत होतो, तेव्हा माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी शाळेत असताना गांधीजी म्हटलं कि अनेक टवाळखोर पोर "म्हतारा, टाकल्या, दात पडका" म्हणून संबोधायची, ते बालबोध दिवस होते पण जस जसा मोठा झालो तस तस बोध व्हायला सुरवात झाली आणि गांधी या चरित्राची ओळख झाली. ऍग्रीकल्चर ला बीड ला आल्यावर गांधी जींचं आत्मचरित्र "माझे सत्याचे प्रयोग" हे पुस्तक वाचले आणि गांधी जी शी नव्याने ओळख झाली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वचा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामान्य पण होते, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे जाणवते. गांधीजी याच सामान्य पणा मुळे असामान्य व्यक्तिमत्व बनले असे म्हणता येऊ शकते. हा सामान्य पणा त्यांच्या लहानपणा पासून त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनां मध्ये दिसून येतो. बालपण, शिक्षण, लग्न, उच्च शिक्षण या मध्ये हा सामान्य पणा स्पष्टपणे जाणवतो. गांधीजींनी वैयक्तिक आयुष्यातील अनेक चुका स्वीकारल्या आणि स्वतःच्या आत्मचरित्रात मांडल्या सुद्धा, त्यांचे आत्मचरित्र वाचताना आपल्याला हे विशेष जाणवत राहते.  या सामान्यपणातूनच त्यांच्यात तत्वनिष्टता निर्माण झाली असे म्हणता येऊ शकते, गांधीजी प्रचंड तत्वनिष्ठ होते आणि त्यांनी वैयक्तिक व राजकीय आयुष्यात ती तत्वे तेवढ्याच निष्ठेने पाळली. 


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य भारतीयांना जोडण्याचे काम गांधीजींनी केले, स्वातंत्र्य लढ्यातील अनेक प्रसंग असे आहेत ज्यामुळे सामान्य भारतीय या लढ्याशी जोडला गेला, ज्यात असहकार आंदोलन असेल, मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चले जावं चळवळ असले. सामान्य भारतीय या प्रकारच्या लढ्यातून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकला. उपोषण, मौन, असहकार, स्वदेशी या सामान्य आंदोलना मुळे सामान्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर उरलाच पण स्वातंत्र्य लढ्याची चेतना भारत भर पोहंचवण्यास मदत झाली, या सर्व आंदोलनाची व्याप्ती भारत भर झाली आणि ते त्यांचे असणारे सामान्य स्वरूप आणि सर्व सामान्य लोकांचा सहभाग. १९१६ साली चंपारण्यातील निळं उत्पादक शेतकऱ्यांचा लढा गांधीजींच्या नेतृत्वा खाली लढला गेला व यशस्वी झाला, हा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह ज्यामुळे सामान्य भारतीय लोकांना गांधीजींची ओळख झाली. गांधीजींचं नेतृत्व असामान्य होत हे निर्वीवादीत सत्य आहे. गांधीजींनी भारतीय सामान्य जणांना व्यवस्थित जाणलं होते, सामान्य भारतीयांना जोडल्याशिवाय भारताचे स्वतंत्र शक्य नाही याची जाण गांधीजींना नक्कीच होती. सामान्य लोकांच्या मध्ये रमणारे नेतृत्व गांधीजींचे होते.गांधीजींच्या नेतृत्वाची भुरळ आज सुद्धा असंख्य भारतीयांच्या मनावर आहे. अनेक सामान्य घटनांतून गांधीजींनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. टिळकांच्या निधना नंतर नेतृत्वहीन झालेला भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गांधीजींनी नेतृत्व तर दिलेच पण स्वरूप सुद्धा दिले. सामान्य भारतीय मनाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडण्यासाठी गांधीजींनी अर्ध नग्न असणाऱ्या सामान्य लोकं प्रमाणेच गांधीजींनी स्वतःचा वेष केला व तो आयुष्यभर जपला. 


गांधीजींची हिंदू धर्मा वरती निष्ठा होती आणि हिंदू संस्कृतीवर त्यांचा दृढ़ विश्वास होता. गांधीजींच्या दैंनंदिन आयुष्यातील अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे त्यांची हिंदू धर्मा वरील श्रद्धा स्पष्ट होते. या द्वारे सुद्धा गांधीजींनी स्वतःला सामान्य भारतीयांशी जोडले होते व त्याचा उपयोग भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी करून घेतला.

गांधीजींच्या राजकीय विचारांशी आक्षेप असू शकतात, सक्षम लोकशाही पद्धतीत ते स्वीकारले पाहिजेत. माझ्या सहित अनेक जण त्यांच्या राजकीय मतांशी सहमत नसतील पण जगातील अनेक विचारवंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकारते, उद्योग व इतर क्षेत्रातील प्रतिभावंत आज सुद्धा गांधीजींना प्रेरक मानतात ते त्यांच्या सामान्यपणा मधून निर्माण झालेल्या सर्व व्यापी नेतृत्वाला.

आज गांधीजींच्या १५२ व्या जयंती निमित्याने त्यांना विनम्र अभिवादन

 

विराज विजयकुमार देवडीकर

Monday, 21 June 2021

Dr. Hedgewar…Sangh founder

 

Today is the Death Anniversary of founder Rashtriy Swayamsevk Sangh (RSS) Dr. Keshv Baliram Hedgewar, widely known as “Doctorji”. Doctor ji was born at Nagpur, he studied in Nagpur, Yavatmal & Pune before going to Calcutta in 1910 for medicine. There he came in to contact with revolutionary leaders & become a member of Anushilan Samiti, a well know group of freedom fighters. He was highly influenced by firebrand nationalism of Lokmanya Tilak. Doctor ji was participated in the freedom struggle of Nation and he was Jail on several occasion.


The greatness of Doctor ji lies, “In his vision of raising the level of national consciousness of common man through the mechanism of daily ‘Shakha’ of RSS. A battery of such nationally conscious people is able to achieve the goal of social transformation” said by Dattopant Thengdi. Today RSS has grown into a huge tree whose innumerable branches have spread in the various level of national & social life of India. They are trying to raise the National consciousness level common citizen of India to much higher level. Over 90 years Sangh has produced many men of great caliber, competence, superior quality but made all of them of faceless. No image building exercise in RSS. Doctor ji initiated a process to create people of great quality & capabilities sans.


The freedom of mother land always be on top priority for Doctor ji as well as Sangh but he believed that alone could not rid our society of all the problem. Dr Hedgewar said often, “Even if the British leave unless the Hindus are organized as a powerful nation, where is the guarantee that we shall be able to protect the freedom.” His life mission: To organize the Hindu society and to take this Hindu Rashtra at the pinnacle of glory making it the “VishawGuru” or world leader. After carefully study he realized that the lack of national consciousness was major reason for the ills that plagued making it submissive and defeatist resulting in the slavery of hundreds of years. That the reason he founded Rashtriy Swayamsevk Sangh (RSS) on 27th Sept 1925. It was a time when people were scared & ashamed of calling them self “Hindu, call me anything even a donkey but don’t call me Hindu” was the general attitude of Hindu society. In such time Doctor ji stood alone like a solid rock proclaiming loudly, “ This is the land of Hindus ‘HinduRashtra’ and will remain so, as long as there lived even one Hindu”

A day before he left mortal Doctor ji said he was immensely pleased to see the ‘miniature of Hindu Rashtra’ in front him as Swayamsevak from all major province had gathered at the Third year Sangh Shiksha Varg. There are many anti National element supported from international agencies that encourage & support the forceful conversion of poor people, encourage Naxalism and confuse people through influencing them. In such situation the philosophy & ideology of Dr. Hedgewar that provided sound & unshakable foundation to Sangh can save nation from these forces.

My Humble tribute to the great son of India

 

Vande Mataram

 

Viraj V Devdikar

Tuesday, 13 April 2021

आद्य सरसंघचालक प्रणाम

 

संघ निर्माते : डॉ केशव बळीराम हेडगेवार

आज परम पूज्य आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती, त्यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी नागपूर ला झाला. हिंदू तिथी नुसार त्यांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी झाला. त्यांनी हिंदूंचे विश्वव्यापी संघटन निर्माण केले व मागील ९७ वर्ष हे संघटन अविरत व्यक्ती निर्माणचे कार्य करत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरला झाले तेथेच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे व समाजकार्याचे संस्कार झाले. त्यांच्या जीवनावर त्यांचे थोरले बंधू महादेव शास्त्री यांचा प्रचंड प्रभाव होता. व त्यांच्याच माध्यमातून क्रांतिकार्याची ओळख डॉक्टरांना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रचंड प्रभाव डॉक्टरांवरती होता, त्यातूनच स्वातंत्र्य प्राप्ती करता सशस्त्र लढ्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बालपणी मित्रांसोबत नागपुरातील सीताबर्डी किल्ल्या वरचा "युनियन जॅक" काढून त्याठिकाणी भगवा ध्वज त्यांनी लावला.


पुढे कलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये MBBS करिता त्यांनी ऍडमिशन घेतले आणि तेथेच ते बंगाल मधील क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. ते अनुशीलन समितीचे सदस्य बनले. त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून त्यांच्यावर हिंदू महासभेच्या बंगाल प्रांताच्या उपाध्यक्ष म्हणून जवाबदारी देण्यात आली. पुढे MBBS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर स्वगृही नागपूरला परत आल्यावर त्यांनी सरकारी नोकरी न करिता क्रांतिकार्य सुरु ठेवले. याच काळात ते काँग्रेस च्या संपर्कात आले व काँग्रेस चे सदस्य झाले. १९२० ला काँग्रेस चे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर ला झाले त्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्याच बरोबर त्यांनी "पूर्ण स्वातंत्र्याचा" ठराव या अधिवेशनात मांडला पण तो पास होऊ शकला नाही. डॉक्टर काँग्रेस च्या जहाल गटाचे सदस्य होते, त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता टिळकांच्या अकाली निधना मुळे काँग्रेस मधील जहाल गट कमकुवत झाला होता. १९२१ मध्ये त्यांनी असहकार आंदोलनात सत्याग्रह केला व एक वर्ष कारावास सुद्धा भोगला होता. पण त्याच बरोबर त्यांनी गांधीजींच्या खिलाफत आंदोलनाला तीव्र विरोध केला. तुर्कीस्तानच्या राजा करिता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वापर करणे त्यांना मान्य नव्हते.


सक्षम राष्ट्रा करिता सक्षम समाज निर्माण होणे गरजेचे आहे. हिंदू समाजाला संघटित, अनुशासित आणि बलशाली होणे अत्यंत आवश्यक आहे. व ते कार्य संघ शाखेत केले जाते या उद्देशातून १९२५ च्या विजयादशमी च्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ स्थापने वेळी त्यांचे वाक्य होते,  ‘’मैं आज संघ (संगठन) की स्थापना की घोषणा करता हूं‘’ एक वर्षांनी या संघटनेचे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हे नमःकारण करण्यात आले. संघ स्थापने पासून पुढे १५ वर्ष त्यांनी संघाचे सरसंघचालक म्हणून जवाबदारी स्वीकारली. या काळात त्यांनी संघ भारत भर नेला, त्याकरिता अखंड प्रवास, भारत भ्रमण, अनेक व्यक्तीना भेटणे व त्यांना संघाशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले. स्वकृतीतून त्यांनी अनेकदा स्वयंसेवकांना शिस्तीचे धडे दिले. १९४० पर्यंत संघ भारत भर पोहंचला होता, १९४० च्या तृतीय वर्षां वर्गाच्या स्वयंसेवकांसमोर आपल्या शेवटच्या बौद्धिकात बोलताना त्यांनी म्हटले होते, " मी हिंदुराष्ट्राचे छोटे रूप तुम्हा सर्वात पाहत आहे"

 

संघे शक्ति: इति ज्ञात्वा लोककल्याणकारक:| येन संघ कृतस्तस्मै केशवाय नमो नमः ||

 

अर्थात “संघटनेमध्ये सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला, अशा त्या केशवांना पुनः पुनः नमस्कार असो.”

 

आद्य सरसंघचालक प्रणाम

Sunday, 7 February 2021

चौरी-चौरा के हुतात्मा

 

मागील आठवड्यात कृषी आंदोलनाच्या आरोप-प्रत्यारोपात एका ऐतिहासिक आणि भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महत्वाच्या घटनेचे शताब्दी वर्ष सूर झाले, या घटनेमुळे ब्रिटिश सरकारला जाणीव झाली की, स्वातंत्र्याची आग भारताच्या खेड्या-पाड्यां पर्यंत, वाड्या-वस्त्यां पर्यंत पोहचली आहे. सर्व सामान्य व्यक्ती/जनाना स्वातंत्र्याची गरज निर्माण झाली आहे हे ब्रिटिशांच्या ध्यानी आले. ४ सप्टेंबर १९२० ला महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची हाक दिली व संपूर्ण देशाने ब्रिटिश सरकार वर बहिष्कार टाकला, शाळा-कॉलेज, सरकारी कचेऱ्या ओस पडल्या, लोकांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारचा निषेध करायला सुरवात केली. जालियनवाला बाग हत्याकांड व रॉल्ट ऍक्ट(Rowlatt Act) यांच्या मुळे लोकांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड क्रोध होता. हे आंदोलन भारताच्या लहान-लहान खेड्यापर्यंत पोहंचले होते, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्यातील चौरी-चौरा या गावी सुद्धा या आंदोलनाला सुरवात झाली व पुढे याच ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला कलाटणी देणारी घटना घडली. 


चौरी-चौरा या घटनेचे दोन मुख्य भागात विभाजन करीता येईल, त्याची सुरवात २ फेब्रुवारी १९२२ ला झाली, मुंडेरा बाजार या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणि दारू विक्री विरुद्ध एक आंदोलन सुरु होते, या आंदोलनात भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व हे आंदोलन असहकार चळवळीचा भाग आल्यामुळे या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली व मारहाण केली. हे आंदोलन निवृत्त सैनिक भगवान अहिर यांच्या नेतृत्वात सुरु होते व त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. ब्रिटिश पोलिसांच्या मनमानी कारभार विरोधात चौरी-चौरा आणि पंचक्रोशीतील लोकांनी ४ फेब्रुवारी १९२२ ला आंदोलन सुरु केले, आसपासच्या खेड्यातील मिळून २ ते ३ हजार लोकांचा जनसमुदाय चौरी-चौरा येथील मुंडेरा बाजार समोर गोळा झाला व त्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा देण्यास सुरवात केली. ब्रिटिश पोलीस व ब्रिटिश सरकारच्या विरोधातील घोषणाबाजी मुळे व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुवातील हवेत गोळीबार केला व जमाव पांगात नसल्याचे पाहून प्रत्यक्ष आंदोलकांवर गोळीबार केला गेला. या गोळीबारात ३ सामान्य लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे जमाव शांत होण्या ऐवजी अधिकच प्रक्षुब्ध झाला व त्यांनी एकत्र येऊन पोलीस चौकीवर हल्ला केला. या वेळी चौकीत कामावर असणारे पोलीस कर्मचारी जमावाने केलेल्या हल्ल्या मुळे बचावा साठी चौकीत लपून बसले. प्रक्षुब्ध जमावाने चौकीत लपलेल्या पोलीसां सहित चौकीला आग लावली व या अग्नीकांडात २३ पोलीस मरण पावले.

या अग्निकांडा मुळे ब्रिटिश सरकार पुरते हादरले व १८५७ प्रमाणे देशात परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लागेचच ब्रिटिश सरकारने चौरी-चौरा परिसरात Martial Law लागू केला, त्या अंतर्गत अनेक निष्पाप लोकांना अटक करण्यात आली, अनेक सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करण्यात आहे, या अग्निकांडात सहभागी झाल्याबद्दल २२८ आंदोलकांना अटक करण्यात आली, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू पोलीस चौकशीत झाला तर जिल्हा-सत्र न्यायाल्याने १७२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. पुढे २० एप्रिल १९२३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायाल्याने हा निकाल रद्द करून १९ जणांना फाशी व ११० जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली. चौरी-चौरा कडांतील १९ आंदोलकांना एकत्रित फाशी देण्याची भारताच्या स्वातंत्र्य युद्धातील पहिली घटना असेल. या घटने नंतर १२ फेब्रुवारीला महात्मा गांधींनी ऐन भरात असलेले असहकार आंदोलन स्थिगिती केले. या निर्णयमुळे क्रांतिकारकांचा एक मोठा वर्ग दुखावला गेला. १६ फेब्रुवारी १९२२ ला "चौरी-चौरा का अपराध" या शीर्षका खाली गांधीजींनी लेख लिहला ज्यात त्यांनी या अग्निकांडा करिता ब्रिटिश पोलिसांसोबत आंदोलकांना सुद्धा जवाबदार ठरवले. मार्च १९२२ ला गांधीजींना राजद्रोह खाली अटक करण्यात आली व पुढे दोन वर्षांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुक्त केले गेले. 



या अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे आठवण ठेवण्यासाठी १९७३ ला स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन "चौरी-चौरा शहीद स्मारक समिती" स्थापन केली व स्मारका साठी १३५०० रुपयांचा निधी उभा केला व त्या पैश्या मधून स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाची निर्मिती केली गेली. या वर्षी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते चौरी-चौरा घटनेच्या शताब्दी समारोहाचे उदघाट्न केले.

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते काही शीर्ष नेतृत्वा मुळे का छोट्या-छोट्या स्वातंत्र्य लढ्यामुळे हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित आहे पण त्यामुळे या छोट्या-छोट्या लढ्यात शहीद झालेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे महत्व व त्यांचे बलिदान त्यामुळे कमी होणार नाही.

वंदे मातरम                                                                                          विराज देवडीकर

#मराठी_थ्रेड   

संदर्भ:-

https://www.bbc.com/hindi/india-55921031

https://en.wikipedia.org/wiki/Chauri_Chaura_incident

https://www.newsnationtv.com/specials/news/know-what-is-the-chauri-chaura-ancident-because-of-which-mahatma-gandhi-had-to-withdraw-the-non-cooperation-movement-176305.html

 

Saturday, 30 January 2021

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी

 ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी दिल्ली येथील बिर्लाभवन मध्ये प्रार्थनेच्या अगोदर एका माथेफिरू तरुणाने महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या केली, नथुराम गोडसे असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव, त्याच्या सोबत नारायण आपटे आणि उर्वरित पाच जणांना या हत्येच्या कटात शिक्षा झाली. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी मागील अनेक दशकांपासून सुरु आहे. या हत्येचा अभियोग दिल्ली येथील लाल किल्ल्यात स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात चालला, न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना निर्दोष ठरवून मुक्त केले होते,  त्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या) निर्णया विरोधात पंजाब उच्च न्यायालयात अपील सुद्धा शासना तर्फे करण्यात आलेले नाही. तरीही मागील अनेक वर्षा पासून स्वा. सावरकरांना या हत्येत गोवण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही घटकां तर्फे करण्यात येत आहे. "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या प्रा. शेषराव मोरे यांच्या पुस्तकात या पूर्ण खटलया विषयी आणि स्वा. सावरकर यांच्या बदनामी विषयी विस्तृत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे सबळ पुरावे व योग्य संदर्भ या पुस्तकात दिले आहेत.


न्यायपत्रात स्वा. सावरकरांच्या विषयीचा निकाल पुढील प्रमाणे आहे, " त्यांच्यावर (वि. दा. सावरकर) आरोपपत्रात ज्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या संबंधात ते दोषी आढळले नाहीत ( He is found 'not guilty') आणि त्यांना त्यातून निर्दोष ठरविण्यात येत आहे (acquitted thereunder). २०४ पृष्ठाच्या  निकालाच्या टंकलिखितात पृ. १७७ वर न्यायालय लिहिते, " वर सांगितल्याप्रमाणे विनायक दा. सावरकरां विरुद्ध फिर्यादी पक्षाची बाजू केवळ माफीचा साक्षीदार व  केवळ त्याच्या साक्षीवर आधारलेली आहे. वर हेही सांगितले आहे की, केवळ माफीदाराच्या साक्षीवर आधारून विनायक दा सावरकरां विरुद्ध काही निष्कर्ष काढणे धोकादायक ठरेल." याच टंकलिखितात न्यायालय २०/०१/१९४८ च्या बॉम्ब स्फोटात व ३०/०१/१९४८ च्या प्रत्यक्ष हत्येत स्वा. सावरकरांचा हात होता असे गृहीत धरण्याचे कोणतेही कारण नाही. तेव्हा न्यायालयाने स्वा. सावरकरांना निर्दोष ठरवताना 'पुरावा नसणे' ही जी मूलभूत कसोटी लागते, त्या आधारे निर्दोष ठरविले होते, संशयाचा फायदा घेऊन मुक्त केले नव्हते.

विरोधक ज्या कपूर आयोगाचा स्वा. सावरकर यांच्या बदनामी करिता विशेष उल्लेख करतात त्याविषयी थोडे, या आयोगाची नियुक्ती करण्यामागचे करणं म्हणजे, १९६४ रोजी या हत्येतील सहभागी व ज्यांनी जन्मठेपेची शिक्षा झाली होती असे गोपाळ गोडसे, विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा त्यांची शिक्षा भोगून सुटका झाल्यावर दि १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे त्यांच्या चाहत्यांनी सत्कारासाठी सार्वजनिक पूजेचे आयोजन केले होते. या सत्कार व पूजेस केसरीचे माजी संपादक व तरुण भारत चे तेव्हाचे संपादक गजानन विश्वास केतकर अध्यक्ष होते त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले की, गांधीजंच्या हत्येचा विचार चालू असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती. त्याकरिता ते नथुराम गोडसे यांच्या शिवाजी मंदिर पुणे येथील जुलै १९४७ च्या सभेची आठवण करून देतात, त्यात " गांधीजी म्हणतात की, मी १२५ वर्ष जगणार आहे, होय पण त्यांना कोणी जगू दिले तर ना!" या वाक्याची आठवण करून देतात. या सभेस काँग्रेस चे कार्यकर्ते बाळू काका कानिटकर उपस्थित होते व यांच्या मार्फत त्यावेळेच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर यांना पत्रा द्वारे कळवली होती. या वक्तव्य नंतर विधानसभेत व लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला व या प्रकरणाची अधिक चौकशी मागणी करण्यात आली, या कारण्यासाठी २२ मार्च १९६५ रोजी कपूर आयोगाची नेमणूक झाली. द कमिशन्स ऑफ इन्क्वायरी ऍक्ट १९५२ नुसार कामकाज करणे अपेक्षित होते, न की स्वा. सावरकरांच्या निर्दोषत्वा वर टिपण्णी करणे. कोणत्याही आयोगाची निर्मिती एखाद्या विशिष्ट् प्रकरणाची चौकशी साठी नेमला जातो, त्याला उच्चस्थरीय चौकशी करण्याचे अधिकार आहेत पण न्यायालय देतात तसे  देण्याचा अधिकार कोणत्याही आयोगाला नसतो. या आयोगाने सावरकरांना गांधी हत्येसाठी दोषी ठरवले, जे कि या आयोगाच्या कार्यक्षेत्रात नव्हते. आयोगाने स्वा. सावरकरांवर दोष ठेवला, या खटल्यातील एकमेव माफीचा साक्षीदार असलेल्या दिगंबर बडगे यांची चौकशी या आयोगाने केली नाही, आयोगाच्या कार्यकाळात दिगंबर बडगे ह्यात होते व ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस चाळीत राहायला होते. अशा महत्वाच्या व्यक्तीची चौकशी आयोगाने केली नाही.

गांधी हत्या व कोणतीही हिंसा याचे समर्थन मला करायचे नाही, पण स्वा. सावरकरांना या हत्येमध्ये गोवण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला होता असे नक्की जाणवते.

 

धन्यवाद                                                                              विराज वि देवडीकर

 

 

(या लेख करिता चे संदर्भ "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या पुस्तकातील आहेत)

Saturday, 23 January 2021

हरिपुरा काँग्रेस १९३८,

 गुजरात मधील सुरत जिल्यातील हरिपुरा येथे काँग्रेस चे १९३८ चे अधिवेशन झाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्व देशव्यापी होण्यासाठी महत्वाचे ठरलेले हे अधिवेशन होते. हे अधिवेशन १९ ते २२ फेब्रुवारी १९३८ या कालावधीत घडले, हे काँग्रेस चे ५३ वे अधिवेशन होते आणि याचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस होते. हा काळ असा होता जेव्हा काँग्रेस मध्ये सुभाष बाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रसिद्धीत होते, विशेष करून सुभाष बाबू तरुणाचे आवडते व प्रिय देशव्यापी नेतृत्व बनत होते. हाच काळ होता जेव्हा गांधींची काँग्रेस पासून वेगळे होण्याचा किवां निवृत्त होण्याचं विचार करता होते व "हरिजन" उद्धाराचे कार्य करत होते. सुभाष बाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मैत्री तर होतीच पण काही साम्य सुद्धा होते, दोघे ही उच्च विद्याविभूषित, तरुण, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोघं वरती असलेला साम्यवादाचा प्रभाव यामुळे ते बरोबरीचे व तुल्यबळ काँग्रेस मधील नेतृत्व होते. तरुणांना आकर्षित करणारे वक्तृत्व सुभाष बाबुंचे होते, काँग्रेस या काळात दोन विचारधारेत विभागलेली दिसते पुराणमतवादी (conservative) आणि मूलगामी (radical) या पार्श्वभूमी वरती नेताजी सुभाषचंद्र बोस हरिपुरा काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवडून आले.


या काँग्रेस अधिवेशनात सुभाष बाबू आणि गांधीजी यांच्यातील मतभेद स्पष्टपणे लोकांच्या समोर आहे, भारताला द्वितीय महायुद्धात ओढण्याच्या ब्रिटिश सरकारच्या धोरणाच्या विरोधात सुभाष बाबू होते, त्यानं ब्रिटिश सरकारच्या राजकीय अस्थिरतेची पूर्ण कल्पना होती व त्याचा भारतीय स्वातंत्र्य करता उपयोग कसा करता येईल याचा विचार ते करता होते. अर्थात गांधीजींचा याला विरोध होता. याच अधिवेशनात सुभाष बाबूंच्या नेतृत्वाखाली ठराव संम्मत करण्यात आला ज्यात गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांना बगल देत, ब्रिटीश सरकारला निर्वाणीचा इशारा देत ६ महिन्यात भारत सोडण्यास सांगण्यात आले. या मुळे गांधीजी व्यथित झाले व त्यांच्यात आणि सुभाष बाबूत दारी निर्माण झाली. National Planning Committee हे सुद्धा गांधीजी आणि सुभाष बाबूंच्या वाद होण्याचे कारण होते, याच अधिवेशनात सुभाष बाबूंनी या समितीची स्थपणा केली, हि समिती औद्योगिकीकरनाच्या आधारे भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणार होती पण या समितीचे उद्दिष्टे गांधीजींच्या "चरखा" धोरणाशी  होते त्यामुळे सुद्धा गांधीजी सुभाष बाबूंशी नाराज होते. १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेस मध्ये सुभाष बाबू स्पष्ट बहुमताने निवडून आले त्यांनी यावेळी गांधीजी समर्थक डॉ पट्टाअभी सीतारामय्या यांचा पराभव केला,  परंतु गांधीजींच्या विरोधा मुळे सुभाष बाबूंना त्रिपुरी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. या नंतर सुभाष बाबू काँग्रेस पासून कायमचे दुरावले, त्यांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग स्विकारला भारताच्या स्वातंत्र्यासाठी.... 


 

 

 

 

https://www.gktoday.in/gk/subahsh-chandra-bose-and-congress-haripura-session-1938/



धन्यवाद
#Thread #थ्रेड #मराठी

लेखा बद्दल जरूर शेअर करावा
viraj.devdikar@gmail.com