Saturday 23 January 2021

हरिपुरा काँग्रेस १९३८,

 गुजरात मधील सुरत जिल्यातील हरिपुरा येथे काँग्रेस चे १९३८ चे अधिवेशन झाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्व देशव्यापी होण्यासाठी महत्वाचे ठरलेले हे अधिवेशन होते. हे अधिवेशन १९ ते २२ फेब्रुवारी १९३८ या कालावधीत घडले, हे काँग्रेस चे ५३ वे अधिवेशन होते आणि याचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस होते. हा काळ असा होता जेव्हा काँग्रेस मध्ये सुभाष बाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रसिद्धीत होते, विशेष करून सुभाष बाबू तरुणाचे आवडते व प्रिय देशव्यापी नेतृत्व बनत होते. हाच काळ होता जेव्हा गांधींची काँग्रेस पासून वेगळे होण्याचा किवां निवृत्त होण्याचं विचार करता होते व "हरिजन" उद्धाराचे कार्य करत होते. सुभाष बाबू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मैत्री तर होतीच पण काही साम्य सुद्धा होते, दोघे ही उच्च विद्याविभूषित, तरुण, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोघं वरती असलेला साम्यवादाचा प्रभाव यामुळे ते बरोबरीचे व तुल्यबळ काँग्रेस मधील नेतृत्व होते. तरुणांना आकर्षित करणारे वक्तृत्व सुभाष बाबुंचे होते, काँग्रेस या काळात दोन विचारधारेत विभागलेली दिसते पुराणमतवादी (conservative) आणि मूलगामी (radical) या पार्श्वभूमी वरती नेताजी सुभाषचंद्र बोस हरिपुरा काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवडून आले.


या काँग्रेस अधिवेशनात सुभाष बाबू आणि गांधीजी यांच्यातील मतभेद स्पष्टपणे लोकांच्या समोर आहे, भारताला द्वितीय महायुद्धात ओढण्याच्या ब्रिटिश सरकारच्या धोरणाच्या विरोधात सुभाष बाबू होते, त्यानं ब्रिटिश सरकारच्या राजकीय अस्थिरतेची पूर्ण कल्पना होती व त्याचा भारतीय स्वातंत्र्य करता उपयोग कसा करता येईल याचा विचार ते करता होते. अर्थात गांधीजींचा याला विरोध होता. याच अधिवेशनात सुभाष बाबूंच्या नेतृत्वाखाली ठराव संम्मत करण्यात आला ज्यात गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांना बगल देत, ब्रिटीश सरकारला निर्वाणीचा इशारा देत ६ महिन्यात भारत सोडण्यास सांगण्यात आले. या मुळे गांधीजी व्यथित झाले व त्यांच्यात आणि सुभाष बाबूत दारी निर्माण झाली. National Planning Committee हे सुद्धा गांधीजी आणि सुभाष बाबूंच्या वाद होण्याचे कारण होते, याच अधिवेशनात सुभाष बाबूंनी या समितीची स्थपणा केली, हि समिती औद्योगिकीकरनाच्या आधारे भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणार होती पण या समितीचे उद्दिष्टे गांधीजींच्या "चरखा" धोरणाशी  होते त्यामुळे सुद्धा गांधीजी सुभाष बाबूंशी नाराज होते. १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेस मध्ये सुभाष बाबू स्पष्ट बहुमताने निवडून आले त्यांनी यावेळी गांधीजी समर्थक डॉ पट्टाअभी सीतारामय्या यांचा पराभव केला,  परंतु गांधीजींच्या विरोधा मुळे सुभाष बाबूंना त्रिपुरी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. या नंतर सुभाष बाबू काँग्रेस पासून कायमचे दुरावले, त्यांनी स्वतःचा स्वतंत्र मार्ग स्विकारला भारताच्या स्वातंत्र्यासाठी.... 


 

 

 

 

https://www.gktoday.in/gk/subahsh-chandra-bose-and-congress-haripura-session-1938/



धन्यवाद
#Thread #थ्रेड #मराठी

लेखा बद्दल जरूर शेअर करावा
viraj.devdikar@gmail.com

No comments:

Post a Comment