Wednesday 22 June 2022

राजकीय सर्वे: महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?

 

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या नंतर झालेल्या राजकीय घडामोडीवर काल पासून आम्ही ट्विटर वर एक सर्वे केला होता. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात नेमके काय दडले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक असलेल्या ट्विटर वरील ट्विटर हॅण्डल ने या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे (प्रश्न व पर्याय मराठीत असल्यामुळे). हा सर्वे कोणत्याही राजकीय पक्षा करिता अथवा त्या राजकीय पक्षाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन केलेला नाही. यात नोंदवलेली मते ही वेगवेगळ्या ट्विटर हॅन्डल ची आहेत आमची नाही.

प्रश्न १. भाजपचे पाच ही उमेदवार विजयी, आघाडीत बिघाडी झाली आहे का?

हा प्रश्न विधान परिषद निवडणुकीच्या निकाल नंतर लगेच विचारला गेला होता. या प्रश्नाचे उत्तर ९२.३% वाचकांनी "हो" असे दिले आहे तर "नाही" ७.७% वाचक म्हणत आहेत. माध्यमा मधून शिवसेने मधील   श्री एकनाथ शिंदे यांचा बंड तो पर्यंत समोर आलेला नव्हता. मात्र महा विकास आघाडीची मते फुटली आहेत हे विधान परिषद निवडणुकीच्या निकाला वरून दिसत होते. 
 

प्रश्न २. महाराष्ट्राची राजकीय वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने होत आहे का?


हा प्रश्न दि २१ जून २०२२ रोजी सकाळी वाचकांना विचारला, विधान परिषदेच्या निकाला नंतर शिवसेनेत जो श्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला व काही आमदारांच्या गटा सोबत सुरत गाठले, त्याच्या बातम्या माध्यमात फिरत असताना विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर ६६.७ % वाचकांना "हो" असे वाटते तर २६.३% वाचक "नाही" म्हणत आहेत. "माहित नाही" म्हणणारे ७% वाचक आहेत. येणाऱ्या काळात विधान सभेची त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आणि कोणत्याही पक्षाने अथवा गटाने सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होऊ शकते.

प्रश्न ३. आज समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास कोणता पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल?

या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी खूप स्पष्टपणे दिलेले दिसते, या प्रश्ना करिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पर्याय दिलेले होते. या प्रश्नाच्या उत्तरात ८०.१% वाचक भाजपच्या बाजूने कौल देत आहेत तर शिवसेना ७%, राष्ट्रवादी काँग्रेस ८.८% आणि काँग्रेस ४.१% वाचक पसंती देत आहेत. या प्रश्नातील वाचकांना स्पष्टपणे वाटते कि भाजप महाराष्ट्रात स्थिर सरकार देईल. या उत्तरातील अजून एक वैशिष्ट्य असे कि उर्वरित तीन पक्ष आणि भाजप यांच्यातील मत टक्केवारीची तफावत प्रचंड आहे. उर्वरित तिन्ही पक्षांची टक्केवारी एक केल्यास फक्त १९.९% इतकीच भरते. याचा अर्थ आता मध्यावधी निवडणूक झाल्यास भाजप ला ८०.१% मतदार पसंती देतील.

प्रश्न ४. समजा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुक झाल्यास मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंत कोण असेल?


या प्रश्नाच्या उत्तरात पर्याय होते श्री उद्धव ठाकरे, श्री देवेंद्र फडणवीस, श्री शरद पवार, श्री अजित पवार. या प्रश्नात काँग्रेस पक्षतील कोणताही नेत्याचे नाव नव्हते. मात्र श्री शरद पवार हे सर्व सहमतीचे नाव यात घेतले आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा वाचकांनी स्पष्टपणे दिले आहे, ७७.५% वाचकांना श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदा करिता पसंतीचे उमेदवार वाटतात. तर श्री उद्धव ठाकरे १३.४% वाचकांना पसंतीचे उमेदवार वाटतात. वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या सर्वे मध्ये सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदा करिता पहिली पसंती दिसून आली आहे.

प्रश्न ५. मविअ सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीला तुम्ही १ ते १० मध्ये किती गुण द्याल?(१ सर्वात कमी  तर १० सर्वेत्तम) 

या प्रश्नाच्या उत्तरा करिता गुणांचे चार गट केले आहेत, १) १ ते ३ गुण  २) ४ ते ६ गुण  ३) ७ ते ९ गुण आणि ४) १० गुण, वाचकांनी मविअ ला १ ते १० मध्ये गुण दिले आहेत यात १ हे सर्वात खराब व १० हे सर्वात उत्तम या प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. ६७.५% वाचक १ ते ३ गुण मविअ च्या अडीच वर्षाच्या कामगिरीला देतात तर १५.१% वाचक १० पैकी १० गुण देतात. ११.४% वाचक ७ ते ९ गुण मविअ ला देताना दिसत आहे. ४ ते ६ गुण फक्त ६% वाचक देत आहेत. या प्रश्ना द्वारे मविअ च्या अडीच वर्षाच्या कारभाराची जनतेच्या मनातील प्रतिमा दिसते. गट क्र ३ व ४ ची वाचकांची टक्केवारी एकत्र केल्यास २६.५% वाचक समाधानी आहेत असे दिसते.

प्रश्न ६. श्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर भाजपने सत्ता स्थापने साठी कोणती भूमिका घ्यावी असे तुम्हला वाटते?

या प्रश्नाच्या उत्तरा करिता पर्याय होते, १) सेना भाजप एकत्र २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र ४) मध्यावधी निवडणूक, या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा वाचकांचे वेग वेगळे मते दिसून येतात. १) सेना भाजप एकत्र  हा पर्याय भाजपाने निवडावा असे २५% वाचकांना तर २) शिंदेंच्या फुटीर गटा सोबत घ्यावे असे ३८.२% वाचकांना वाटते, ३) राष्ट्रवादी भाजप एकत्र यावे असे फक्त ६.६ % वाचकांना वाटते तर मध्यावधी निवडणूक होतील असे ३०.३% वाचकांना वाटते. पर्याय क्रमांक १ व २ एकत्र केल्यास ६३.८% वाचकांना सेना भाजप ने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे असे वाटते.

 

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजप शिवसेना यांच्या युतीला मतदारांनी स्वीकारले होते व या युतीच्या बाजूने मतदान केले होते. येणाऱ्या काळात मविअ चे भवितव्य काय असेल हे  निश्चित होईल. तो पर्यंत धन्यवाद

 

(टीप; हा सर्वे ट्विटर वर घेतला आहे, याचा कालावधी मागील ३६ तास आहे. हा सर्वे एकूण ५२६५ वाचकांना पर्यंत पोहंचला आहे तर प्रत्यक्ष ६७८ वाचकांनी या सर्वे मध्ये आपले मत नोंदवले आहे.)

 

विराज वि देवडीकर