Wednesday 24 April 2013

सचिन झाला चाळीशीचा..!!!!!




मला माहित नाही मी कधी क्रिकेट खेळायला शिकलो, किंवा मला कधी क्रिकेट कळायाला लागल. मात्र ते जेव्हा कळायाला लागल ते एका नावामुळे आणि ते म्हणजे “सचिन तेंडुलकर”. माझा सारख्या असंख्य सामान्य क्रिकेट चाहत्याकरता तो क्रिकेटचा देव बनला आहे. तो खरच क्रिकेटचा स्वामी आहे. त्याची प्रत्येक गोष्ट ही फक्त आणि फक्त क्रिकेट साठीच बनली आहे असे वाटते. त्याची बॅटवरची पकड, त्याचा तो square cut, त्याचा straight drive, त्याचा pull, त्याचा hook इ, जणू काही फक्त त्याचासाठीच बनला आहे असे वाटते. तो ज्या पद्धतीने हे सर्व shot खेळतो ते पाहणे हे एक स्वगीय सुख आहे. त्याने सर्वात जास्त रन केल्या, शतक केली, तो शतकातील सर्वोत्तम खेळाडू बनला. याहून अजून मोठे काय असणार. त्याची कुठलीही खेळी घेतली तरी एकाच गोष्ट दिसते ती म्हणजे तो फक्त खेळतो, “फक्त खेळतो”. 


मी जेव्हा जेव्हा त्याचा खेळ पाहतो किंवा त्याला पाहतो तेव्हा मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, त्याचा चेहरया वरचा निरागस भाव, मग तो शतक केल्यावरच असो किंवा शून्यावर बाद झाल्यावरचा असो. मला वाटत की हा निरागस भाव त्याच्या फक्त क्रिकेट वरील प्रेमा मुळे असेल, आणि हे त्याचे क्रिकेट वरील प्रेमच त्याला शतकातील सर्वोत्तम खेळाडू बनवतो. सचिनबदल मला आदर वाटतो कारण की इतका मोठा होऊन सुध्या त्याच्या वागण्यात कुटलाही अहंकार नाही किंवा गर्व नाही. व हे शक्या आहे त्याच्या सध्या व सरळ स्वभावामुळे आणि क्रिकेट वरील असीम प्रेमामुळे. एक सध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून एका स्वप्नाच्या जोरावर मोठा झालेला हा सामान्य माणुसच. सचिनकडे पाहिल्यावर हे जाणवते कि सामान्य माणसाच्या स्वप्नात किती शक्ती असते. व मला सचिनची आवडणारी गोष्ट म्हणजे, तो स्वःच्या स्वप्नाकरता खेळतो आणि ते स्वप्न राष्ट्रास अर्पण करतो. व त्याच मुळे कदाचीत तो क्रिकेटचा स्वामी बनला असेल.   

माझ्या सारख्या सामान्य मराठी माणसा करता ही गोष्ट खूप मोठी आहे कि सचिन, लतादीदी, सुनील गावस्कर, नाना पाटेकर, आशाताई, पु. ल. ही सर्व मंडळी मराठी असून त्यांनी स्वःच्या स्वप्नाकारता जगताना त्याचे सर्व सामान्य मराठीपण सोडले नाही आणि म्हणूच ते आमच्यातले वाटतात.

आशा या आमचा सचिन आज चाळीशीचा झाला, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या. त्याने असेच क्रिकेट खेळत राहावे आणि आम्ही ते असेच पहावे हेच ईश्वर चरणी मागणे.  

वंदे मातरम्                                                      विराज
   


Sunday 21 April 2013

IPL IS GRATE COURSE OF EVENT MANAGEMENT…..




I was closely observed last six season of IPL, and every time I found this is a great course of Event Management. I found all moves in IPL are designed as a mega event. Most of celebrities, leading entrepreneur, business man & corporate houses are found on the ground. It is quite interesting to see all them on one stage.
There are many act in IPL are contradict with the basic principle of Cricket, but it is made easy with the help of event management. I found many changes or innovative ideas in the recent season of IPL. Many innovative ideas which help to promote or endorsement of product. Even the many angles of camera are set to catch the product endorsement or person endorsement, it is quite interesting. Also the player’s jerseys are full of product endorsement and it is new lesson for “DRESS DESIGNING”.  The way players has to be selected or I said not selected it is purchased on the bases of their brand value & no. of advertisement. It is totally draft as an EVENT. 


All the participating teams in IPL have one or more corporate house as father, and many celebrities as supporters. All teams have their own home ground & the ground is full of product promotion or advertisement.
It is really a great course or lesson for me a student of management. This kind of mega event provides employment for small scale entrepreneur. The local level arties got a chance to perform their art on such event. Many more things which will help to generate the employment on local level. It will help to boost the economy.
Most important is the new format of Cricket. The basic cricket is totally changed and it converted into a small 2 to 3 hour format. Duration is specifically considered while making changes in the cricket. Also more excitement and thrill are to be seen during a match.
Over all is, while looking towards the viewer ship of Cricket, organizer has create a fully entertaining package of Cricket, where you enjoy the excitement, thrill, celebrities touch, personal involvement and many more things. I know there is hardly a cricket but also I look towards it as a great course of learning. It will help me to understand “HOW TO CREATE AN EVENT”.
Thank you

VANDE MATARAM                                 
                                                                                                                        VIRAJ   

Wednesday 3 April 2013

महाराष्ट्रातील IPL सामन्याचा विरोध चुकीचा आहे.......

मला खरच वाटत कि महाराष्ट्रातील IPL सामन्याचा विरोध चुकीचा आहे. IPL हि एक खरच चांगली व नव युवकांना प्रोत्साहन देणारी कल्पना आहे. क्रिकेट मधील नवीत तरुणांना प्रोत्साहन मिळने गरजेचे आहे आणि IPL हे काम चांगल्या प्रकारे करत आहेत. BCCI ने हि एक उत्तम योजना नव युवकांना प्रोत्साहन देण्याची आखली आहे व मी त्याचे स्वागतच करतो. मला अभिमान आहे कि महाराष्ट्रात आज IPL सामने खेळवले जात आहेत. IPL मुळे महाराष्ट्रातील स्थानीक युवकाला क्रिकेट खेळण्यासाठी नवी संधी मिळत आहे, व नव युवक त्यात भाग घेत आहेत. IPL सामन्याच्या वेळेस नव युवक रात्रीचा दिवस करून त्याकरता कष्ट घेत आहेत. निश्चितच त्याच्या कष्टाला योग्य फळ मिळतील. IPL सामन्यामुळे महाराष्ट्राचा आथिंक विकास होईल, नवीन उद्योग येतील, नवीन धंदे वाढतील, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्रतील मध्यमवगीर्य उच्च मध्यमवगीर्य होतील. महाराष्ट्राची प्रगती होईल विकास होईल. सर्वत्रा सुकाळ येईल.
मग एका IPL सामन्यामुळे सुख, समृद्धी, विकास, प्रगती, येणार असेल तर त्या IPL सामन्याना विरोध का????? काय वाईट आहे त्यात???? उगा एक चार-पाच जिल्यात पाउस कमी पडला म्हणून काय झाला, उग शे-पाचशे तालुक्यात पिण्यासाठी पाणी नाही म्हणून काय झाला, उग हजार-बाराशे गावांना टॅकरणे पाणी पुरवावे लागते म्हणून काय झाले, उग हजारो एकर शेती पाण्यावाचून जळाली म्हणून काय झाला, पिण्याच्या पाण्यासाठी पायी वणवण फिरावे लागते म्हणून काय झाले, हजारो जनावराचा अन्न पाण्यावाचून जीव गेला म्हणून काय झाला. IPL सामन्याचा विरोध चुकीचा आहे. महाराष्ट्राची प्रगती IPL सामन्यामुळे होते. मराठवाड्यातल्या सात जिल्यामुळे नाही.
मी माझा या लेखाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो कि IPL सामन्याला कितीही विरोध झाला तरी सामने महाराष्ट्रातच भरवावेत, सामन्याकरता कितीही पाणी लागले तरी द्यावे कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सामने भारावल्यास महाराष्ट्राची भरभरठ होणार आहे. IPL सामन्याना विरोध करणारे हे महाराष्ट्राचे विरोधाक आहेत त्यामुळे त्याचा विचार सरकारने करू नये.
त्यामुळे हे सर्वजन चुकीचे वागत आहेत जे IPL सामन्याचा विरोध करत आहे. मी प्रगतीशील आणि पुरोगमी महाराष्ट्राचा नव युवक आहे.    
(टीप:- लेख रोधात्मक व उपरोधात्मक घ्यावा)
वन्दे मातरम्