Wednesday 27 May 2020

स्वा. सावरकर, सामाजिक सुधारणांचे मार्ग


स्वा. सावरकर यांच्या चरित्राचे मुखत्वे दोन भाग पडतात एक क्रांतिकारक सावरकर आणि दुसरे समाज क्रांतिकारक सावरकर. मागील एका  वर्षा पासून समाज क्रांतिकारक सावरकर या चरित्राचा अभ्यास करायला सुरवात केली, व हा प्रयत्न चालू केला की स्वा. सावरकरांच्या समाजक्रांतीचे स्वरूप सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावे, त्यांना त्याविषयी समजावे, त्यांनी जाणून घ्यावे या करिता आपल्या अकलना प्रमाणे त्याचे स्वरूप मांडायला सुरवात केली. या वर्षी स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथी दिवशी पहिला लेख प्रकाशित केला,  "पतितपावन मंदिर आणि स्वा. सावरकरांची भूमिका" या ब्लॉग द्वारे पतितपावन मंदिर आणि त्यामागील स्वा. सावरकरांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला (त्याची लिंक सोबत  जोडली आहे). आज सावरकर जयंती दिनी दुसरा लेख(ब्लॉग) सादर करत आहे, "स्वा. सावरकर, सामाजिक सुधारणांचे मार्ग"  या विषयाचा अभ्यास करताना प्रा. शेषराव मोरे यांचे पुस्तक "सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग" ची खूप मदत झाली. या पुस्तकातून सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचे स्वरूप स्पष्ट होते. 
Photo by Sw. Savarkar Rashtriy Smarak Samiti, Mumbai
सावरकरांना समाज सुधारणेचे तीन मार्ग मान्य होते, १) मन:परिवर्तन २) कायद्याचा मार्ग ३) संघर्ष किंवा सत्याग्रहाचा मार्ग. समाज सुधारकांनी यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा वापर करून समाज सुधारणेचे कार्य केले पाहिजे असे त्यांचे मत होत. स्वतः सावरकरांनी रत्नागिरी येथील कार्यकाळात पहिल्या दोन मार्गांचा वापर आपल्याला केलेला दिसतो. मात्र त्यांनी सत्याग्रह किंवा संघर्ष या तिसऱ्या प्रकारचा वापर फारसा केलेला दिसत नाही. या बाबतीती प्रा. नरहरी कुरुंदकरांनी या विषयी दिलेला अभिप्राय विचारात घेतला पाहिजे, "अस्पृशांना सार्वजनिक पाणवठे व देवळे मोकळी करावीत, हे तर त्यांचे मत होतेच; पण त्यांच्या सहभोजना पासून बेटीबंदी तोडण्या पर्यंत च्या सर्व कार्यक्रमांना पाठिंबा असे... लिखाणात क्रांतिकारी भूमिका घेणारे सावरकर व्यवहारात सौम्यात्म सत्याग्रहाचा मार्ग आचरत होते, यावर वाद घालण्याचे कारण नाही. त्यांचा स्वतःचा कार्यक्रम सौम्यतम असेल; पण इतर कोणी जहाल कार्यक्रम घेतल्यास त्याला त्यांचा पाठींबा असे. फाटे फोडून विरोध करण्याची त्यांची पद्धत नसे"  प्रा. कुरुंदकरांच्या विधाना वरून आपल्याला हे जाणवते सावरकरांचे समाज सुधारणेचे धोरण किती स्पष्ट व खंबीर होते. या करीत जे वेगवेगळे जातीउच्छेदन व अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यावेळी सत्याग्रह होत होते त्याला स्वा. सावरकरांनी  पाठिंबा दिला. उदाहरण घ्यायचे झाले तर, "पर्वती मंदिर सत्याग्रह" च्या समर्थनात सावरकरांनी लिहलेला 'पुण्यातील तीन हजार मंबाजीबुवा' हा लेख. या सत्याग्रहात सनातन्यानी पूर्वास्पृश्यां वरती लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला  त्याची घोर निदा/टीका सावरकरांनी या लेखात केली आहे. नाशिक येथील "काळाराम मंदिर प्रवेशा" करिता नाशिककरानी पाठिंबा देण्याबाबत विनंती करणारे पत्र सावरकरांनी १३ मार्च १९३१ रोजी लिहले, या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला त्यांनी पाठिंबा देताना म्हटले, "पूर्वास्पृश्याची मंदिर प्रवेशाची मागणी अत्यंत धर्म्य, न्याय्य आहे आणि ते ज्या सत्याग्रहाच्या निकरावर आलेले आहेत, तो सत्याग्रह आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या दुराग्रहाचाच केवळ एक अपरिहार्य पडसाद आहे ! साठ-सत्तर पिढ्या त्यांनी वाट पहिली. आणखी वाट ती त्यांनी किती पाहावयाची? आता आपणच टी वाट मोकळी करून देणे एवढेच बाकी उरले आहे." हे लिहताना सावरकर म्हणतात पूर्वास्पृश्याचे मंदिरात हात जोडून उत्कट प्रेमाने स्वागत करावे आणि क्षमायाचना करावी, १९३१ ला "मुंबई इलाखा अस्पृश्यतानिवारक परिषदेच्या" अध्यक्ष पदावरून रत्नागिरी येथे भाषण करताना ते म्हणाले, " मी मोकळा असतो तर नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात स्वतः झुंजलो असतो" (११४) डॉ नारायणराव सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मंदिर प्रवेशाच्या दृष्टीने वातावरण तयार करणायचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस चा व महात्मा गांधींचा १९३१च्या मंदिर प्रवेश सत्याग्रहास विरोध होता. त्यांच्या दृष्टीने मंदिर प्रवेशाची चळवळ अन्याय कारक होती. 
फक्त मंदिर प्रवेश सत्याग्रहा ना सावरकरांनी पाठिंबा दिला असे नाही, महाड सत्याग्रहास सुद्धा पाठिंबा दिला. स्वा. सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार श्री धनंजय कीर म्हणतात," या लढ्याला निर्भय व मनःपूर्वक पाठिंबा जर कोणी पुढाऱ्याने दिला असेल तो एकट्या सावरकरांनीच !" महाड येथील आंदोलन डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर १९२७ ला सुरु होणार होते, त्या पूर्वी १/०९/१९२७ ला स्वा. सावरकरांनी या सत्याग्रहा संबंधी सविस्तर लेख लिहून डॉ आंबेडकरणाच्या चळवळीस पाठिंबा दिला. सत्याग्रह नंतर म्हणजे डिसेंबर १९२७ नंतर महाड येथे काही अस्पृश्यास तळ्याचे पाणी पिण्यास रोखले गेले, मारहाण झाली, तळ्यात गोमूत्र टाकून शुद्धी कारणाचा प्रयत्न केला गेला या सनातन्यांच्या कृतीवर सावरकर कठोर टीका करताना म्हणतात," महाडास जाऊन त्या तळ्यावर सामसत्याग्रहाने अस्पृश्यांस पाणी पिऊ देण्याचा प्रयत्न करणे हे अस्पृश्यांचेच नव्हे तर सर्व हिंदूमात्राचे कर्तव्य आहे. जर त्यात काही अतिरेक होत असेल तर तो डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रह -मंडळाकडून नसून तो महाडच्या धर्मविमूढ स्पृश्यांकडूनच होय !" सावरकर पक्षाने एवढ्यावरच न थांबता या सत्याग्रहा नंतर सनातन्यांन द्वारे चालेल्या तळ्याच्या शुद्धी कारणाच्या प्रयत्नांना हाणून पडले. १ मार्च १९३१ च्या "जनता" ने याची दाखल घेतली व त्या विषयी लिहले.(११३) 
नाशिक येथे १९२४ ला "स्वातंत्र्य" या पत्रास मुलाखत देताना सावरकरानी समाज सुधारणे साठी सत्याग्रह मार्गाचे जोरदार समर्थन केले. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरणे, देवळात जाऊन देव दर्शन घेण्याचा अस्पृश्यांना अधिकार असला पाहिजे, त्याकरिता सत्याग्रहाचा मार्ग अस्पृश्यानी स्वीकारला पाहिजे असे ठाम मत सावरकरांनी प्रगट केले. विशेष म्हणजे हेच सावरकर इंग्रजा विरुद्ध गांधीजींच्या सत्याग्रहा चे विरोधक होते(१११). पण वेळ, काळ, परिस्थिती, सुधारणेचे स्वरूप, सुधारकपक्षाचे सामर्थ्य आणि कायद्याचा पाठिंबा या गोष्टी विचारात घेऊन सुधारणेचा मार्ग निवडण्याचे धोरण सावरकरांनी स्वीकारले होते.
सुधारणे साठी कायद्याच्या वापराबद्दल सुद्धा स्वा. सावरकर आग्रही होते असे आपल्याला  दिसते, १९२३ ला "सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांचा नागरी हक्क मान्य करणारा ठराव मुंबई विधिमंडळाने मंजूर केला. याच ठरावाचा उपयोग करून १९२४ साली महाड नगर पालिकेने चवदार तळे अस्पृस्यांसाठी खुले केले. तसेच १९२३ साली रत्नागिरी जिल्हा बोर्डाने  त्यांच्या सर्व शाळांत अस्पृश्यता पाळता कामा नये असा आदेश काढला. पण हा ठराव दप्तरी पडून होता. सावरकरांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वर्ष आंदोलन केले.
"जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख" हा त्यांचा अभ्यासनीय लेख आहे. कायद्यासमोर सर्वजण सामान आहोत या तत्वावर आधारलेल्या आणि जन्मजात जातिभेदाला मूठमाती देणाऱ्या यात तरतुदी आहे. 'Slavery is abolished' या घोषणे पेक्षा "Untouchability is abolished" ही घोषणा अधिक महान आहे असे त्यांना वाटे. जातीउच्छेदन आणि अस्पृश्यता निवारण या विषयी मूलभूत कार्य स्वा. सावरकरांनी त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात केले. सार्वजनिक अस्पृश्यता निवारण ज्यात सभा समारंभात एकत्र बसने असेल, शाळा महाविद्यालयात एकत्र बसने असेल, नंतर मंदिर प्रवेश असेल, रोटीबंदी मोडणे व बेटीबंदी मोडणे या कार्याची वाटचाल राहिली.

वंदे मातरम


विराज विजयकुमार देवडीकर
(viraj.devdikar@gmail.com)

लेख जरूर शेअर करावा

"पतितपावन मंदिर आणि स्वा. सावरकरांची भूमिका" Link https://virajdevdikar.blogspot.com/2020/02/blog-post.html


Thursday 21 May 2020

मोडक्या जागतिक संघटना



कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमी वर जागतिक संघटना व त्यांची भूमिका पाहणे नक्की जरुरीचे झाले आहे. दुसऱ्या महायुद्ध नंतर जागतिक राजकारण हे या सर्व संघटनांच्या भोवती फिरताना आपल्याला दिसत होते,  सुरवाती पासून या सर्व आंतरराष्ट्रीय संघटनांचे वागणे संशयास्पदच होते, आता तर करोनाच्या संकटात ते गडधपणे दिसून येत आहे. जागतिक राजकारणाचा आखाडा म्हणजे या आंतरराष्ट्रीय संघटना झाल्या आहेत. एक अभ्यास म्हणून जर का बघितलं तर लक्षात येईल कि कशा प्रकारे या संघटना वेगवेळ्या देशांच्या हातातले बाहुले झाल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर खऱ्या अर्थाने या आंतराष्ट्रीय संघटनांचा जागतिक राजकारणात प्रवेश झाला. संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या माध्यमातून वेगवेळ्या विषयातील छोट्या छोट्या संघटना तर अस्तित्वात आल्याचं पण स्वतःचे आंतराष्ट्रीय राजकारणातील स्थान निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी एकत्र यायला सुरवात झाली व त्यातून काही संघटना निर्माण झाल्या,  NAM, G8, G20, ओपेक, राष्ट्रकुल, OIC, SAARC, ASEAN, One belt one road (OBON), BRICS, WTO, World Bank अनेक नवे आहेत यात. भारताच्या जन्मापासून किंवा त्या पूर्वी पासून अनेक अशा संघटना आहेत ज्याचा भारत सदस्य आहे. भौगोलिक विस्तारवादाच्या अंता नंतर म्हणजे १९५० नंतर जागतिक राजकारण या संघटनांच्या आजूबाजूला फिरत राहिले. त्याचे मुख्य कारण होते या संघटनां वरती ज्या राष्ट्र्राची पकड, त्या राष्ट्राचा आंतराष्ट्रीय राजकारणावरती दबदबा असे चित्र एकूण जागतिक राजकारणाचे आपल्याला दिसून येते. साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या नीतींचा उपयोग करून या संघटना काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जातात.

UN म्हणजे संयुक्त राष्ट्र ही सर्व राष्ट्रांची शिखर संघटना या संघटनेंत अनेक उप संघटना निर्माण आहेत ज्या जागतिक स्थरावरील वेग-वेगळे विषय हाताळतात जसे की व्यापार, विज्ञान, गरिबी आणि कुपोषित, आरोग्य, महिला कल्याण, हवामान बदल इत्यादी अनेक विषय आहेत त्याच्या अनेक संघटना आहेत त्यांचे अनेक सदस्य देश आहेत. ते सदस्य देश ठराविक कालावधी नंतर एकत्र भेटता व त्यांच्या समोर असलेल्या समस्यांचे एकत्रित उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करता. संघटना करणे व त्या माध्यमातून एकत्रित समस्यांची उकलन करण्यात काहीच गैर नाही, पण ज्या वेळी याच संघटना राजकारणाचे आखाडे बनतात तेव्हा करोना सारख्या वैश्विक महामारीचे सुद्धा राजकारण व्हायला लागते.

करोना च्या उद्रेक मागे WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटने ने लपवलेली आकडेवारी कारणीभूत आहे असे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका म्हणत आहे. WHO चे सध्याचे चेअरमन Dr.Tedros Adhanom Ghebreyesus हे इथोपिया चे नागरिक असून २०१७ पासून कार्यरत आहेत. ते चीनच्या मदतीने जागतिक आरोग्य संघटनेचे चेअरमन म्हणून निवडले गेले. त्यांनी चीनच्या ऋणातून उतराई होण्यासाठी करोनाच्या काळात चीन सरकारला मदत केली असा थेट आरोप अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष Donald Trump यांनी केला आहे. मागील दोन दिवसं (१८-१९ मे २०२०) पासून जागतिक आरोग्य संघटनेची बैठक सुरु आहे व अमेरिकेने आता थेट या संघटनेतून बाहेर पडण्याची धमकीच दिली आहे. हे नक्की आहे की WHO ने करोना संदर्भात अनेक महत्वपूर्ण माहिती व संख्या इतर राष्ट्रां पासून लपवून ठेवल्या, त्याचा परिणाम ३लाखा पेक्षा जास्त लोक या महामारीमुळे मृत्यू मुखी पडली आहेत. मोठ्या प्रमाणावर व भयानक स्वरूपाचे आर्थिक संकट जगासमोर उभे आहे, असंख्य सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत व या सर्वां करिता ज्याप्रमाणे चीन जवाबदार आहे त्याच प्रमाणे व तेवढेच जागतिक आरोग्य संघटना जवाबदार आहे असे जागतिक राजकारणाचे स्वरूप झाले आहे. बहुतांश जागतिक संघटनांना अमेरिकेकडून किंवा युरोपियन देशांकडून आर्थिक रसद मिळत असते, सोव्हियेत रशियाच्या पडावा नंतर (१९९०) फक्त अमेरिकाच होती ज्याच्या आर्थिक मदतीवरती या संघटनांचे कार्यक्रम चालायचे, त्या बदल्यात या संघटना अमेरिकेची जागतिक एकाधिकार शाही चालू देत होती. पण चीन आणि रशिया कडे असलेले UNSC (united nations security council) सदस्यत्व व नकाराधिकार यामुळे अमेरिकेच्या योजनांवरती पाणी फिरवले जात होते, चीन व रशिया हे दरवेळी सत्याच्याच बाजूने उभे राहत असत असे नाही, हे दोन्ही देश त्यांच्या राजकीय व आर्थिक गरज भागवण्यासाठी या UNSC सदस्यत्वाचा फायदा उचलत आहेत. पाकिस्तानला व इस्लामिक दहशदवादाला उघड उघड मदत चीन करत आला आहे. भौगोलिक विस्तारवादाचे चीन चे धोरणाला जोड मिळाली ती भांडवलशाही विस्ताराची त्या करिता दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण करणे असेल, दक्षिण चीन समुद्रात क्षेपणास्त्र चाचण्या असतील, तैवान बाळकवण्याचा प्रयत्न, नॉर्थ कोरियाच्या हुकूमशहा ची मैत्री असेल. या प्रत्येक ठिकाणी चीनचे उपद्रवी मूल्य आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते. मालदीवज मधील हुकूमशाला मदत किंवा श्रीलंकेत तामिळ विरोधी गटांना निवडून आणणे, कालच नेपाळने त्यांचा राजकीय नकाशा बदलून  Lipulekh, Kalapani, Limpiyadhura या भारतीय भूभागावर हक्क सांगितलं आहे हे सर्व चीनच्याच मदतीने होत आहे. हे फक्त चीनच नाही तर अनेक देश आहेत ज्यांनी त्यांच्या राजकीय व आर्थिक गरजांची पोळी या संघटनांन वरती भाजून घेतली.
करोना नंतर WHO या संघटनेचे भविष्य जसे ठरणार आहे तसेच इतर मोडकळीस आलेल्या संघटनांना जग कशा प्रकारे बघते ते उत्सुकतेचे ठरेल.

धन्यवाद

विराज देवडीकर
viraj.devdikar@gmail.com

लेख पटल्यास जरून शेअर करावा

Friday 15 May 2020

आत्मनिर्भर भारत


"आत्मनिर्भर" हा शब्द सध्या भारतात प्रचंड प्रमाणात चाललात आहे, तीन दिवसा खाली ज्यावेळी मा. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना "आत्मनिर्भर भारत योजना" जाहीर केली त्या दिवसा पासून हा शब्द प्रचंड प्रमाणात वापरला गेला. गुगल ट्रेंड्स चा अभ्यास केला तर त्या दिवसा पासून हा शब्द मोठया प्रमाणावर सर्च केला गेला आहे. इंग्रजीत किंवा इतर भाषेत त्याचे भाषांतर किंवा त्याचा अर्थ शोधला गेला. समाज माध्यमांना तर चावायला विषयच पाहिजे असतो त्यामुळे या शब्दा बद्दल वेगळे काही नाही अर्थ काढण्या पेक्षा विपरीत अर्थ जास्त शोधला गेला. समाज माध्यमं विषयी जास्त बोलणे चुकीचेच आहे.
आत्मनिर्भर बना याचा पूर्ण चुकीचा अर्थ सध्या काढला जात आहे, एखादी कमोडिटी इंपोर्टेड आहे का एक्सपोर्टेड आहे यावर आत्मनिर्भर असणे पूर्ण पणे चुकीचे आहे. मुळात कोलगेट ला बबूल किंवा पेप्सोडेन्ट ला डाबर हा काही आत्मनिर्भर असण्याकरिता पर्याय नाही. नक्कीच कोलगेट आणि पेप्सोडेन्ट भारता बाहेरील कंपन्या आहेत तर बबूल आणि डाबर भारतीय कंपन्या आहेत. फक्त भारतीय उत्पादने वापरणे म्हणजे आत्मनिर्भर बनणे हे सत्य होईल असे नाही, आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की सर्व उत्पादने व सेवा यांचे उत्पादन जगात सर्वत्र होतेच असे नाही भौगोलिक व सामाजिक गरज सुद्धा उत्पादने व सेवा यांच्या करिता जवाबदार असतात, त्यामुळे प्रथम स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे गरजेचेच आहे पण जे स्थानिक ठिकाणी उत्पादित होत नाहीत त्यांच्या आयात-निर्यात मध्ये समतोल कसा राहील हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. त्याच बरोबर टेकनॉलॉजि एक्सचेंज या सुद्धा महत्वाचा विषय आत्मनिर्भर बनण्यावर अवलंबून असणार आहे. बाहेरील तंत्रज्ञान शिकणे हा स्वाभाविक गुणविशेष झाला आहे पण ते शिकलेले तंत्रज्ञान आपल्या देशात आणणे व त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशी बनावटीची स्थानिक स्थरावर उत्पादने/सेवा निर्माण करणे हे सुद्धा आत्मनिर्भर बनण्यासाठी जरुरीचे आहे. उत्पादनाची गुणवत्ता (Quality) हा फार महत्वाचं विषय व्यापाराच्या दृष्टिकोनातून असतो. चायनीज उत्पादने आणि खराब गुणवत्ता हे जसे समीकरण आहे त्यामुळेच गुणवत्तेवरच व्यापाराचा स्थर ठरवला जातो. जागतिक व्यापारात गुणवत्ता फार महत्वाचा फॅक्टर आहे. आपल्याला सुद्धा गुणवत्ता पूर्ण उत्पादनां करिता प्रयत्न करावा लागेल. त्याकरिता शिक्षण प्रणालीत बदल करावा लागेल, गुणवत्ता आणि स्वतःचे तंत्रज्ञान हे आत्मनिर्भर होण्या करीत जरुरीचे असते. त्याच बरोबर अजून एक फॅक्टर लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे innovation, नवीन नवीन उत्पादने व सेवा त्यांचे प्रकार जोपर्यंत आपण मार्केट मध्ये आणत नाही तोपर्यंत त्याची गरज निर्माण होणार नाही. एखादे उत्पादन किंवा सेवा याची गरज निर्माण होण्यासाठी त्याचे नावीन्य लोकांपर्यंत पोहचावे लागते. 

आयात-निर्यात समतोल हा जागतिक व्यापाराचा फार महत्वाचा भाग आहे, Covid१९ च्या काळातील एक उदाहरण पाहिल्यास आपल्याला लक्षत येईल, Hydroxychloroquine या भारतीय बनावटींच्या औषधांची मागणी अमेरिकेने Covid१९ च्या विस्फोटा नंतर भारता कडे केली, मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने त्या औषधांचा पुरवठा अमेरिकेला व जगातील इतर देशांना शुद्ध केला पण त्या बदल्यात भारताने अनेक दिवसा पासून प्रलंबित असणारी defense equipment डील केली (anti-ship missiles and air-launched torpedoes). सेवा क्षेत्रात याच काळात फेसबुक आणि जिओ यांच्यात एक डील झाली दोन्ही कंपन्या डेटा वर अवलंबून आहेत. डेटा(विदा) ची देवाण-घेवाण यामधून होणार आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात भारतीय माल/उत्पादने/सेवा यांची जागतिक स्थरावर  देवाण-घेवाण होणेच आत्मनिर्भर असणार आहे. एका रात्रीत भारत हा आत्मनिर्भर नक्कीच होणार नाही पण त्याकरिताचे सातत्य आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. या नेतृत्वाने प्रयत्न सुरु केले आहेत.

टीप:- लेख पाहिजे तेथे शेअर करावा

विराज देवडीकर
#AtmanirbharBharatAabhiyan #AtmanirbharYojana #MakeinIndia #Business