Showing posts with label India. Show all posts
Showing posts with label India. Show all posts

Friday, 11 November 2022

भारत जोडो यात्रा

 “इंडिया दॅट इज भारत इज युनियन ऑफ स्टेटस”  राज्यघटना कलम एक चा संदर्भ असलेले हे वाक्य केम्ब्रिज विद्यापीठातील एका कार्यक्रमात काँग्रेस च्या नेतृत्वाने तीन वेळा उल्लेख केला, त्यावर तेथे उपस्थित असलेल्या एका भारतीय तरुणाने त्यांना भारतीय संविधानाच्या सुरवातीला असलेल्या Preamble मधील Nation या शब्दाची आठवण करून दिली, व संविधानकर्त्यांना भारत हे एक राष्ट्र असल्याचे अभिप्रेत होते सांगितले. भारत जोडो यात्रेची मांडणी करताना वरील विचार फार महत्वाचे ठरतात.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आता चार दिवस झाले आहेत, महाराष्ट्रातील सीमावर्ती नांदेड जिल्यामधून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करती झाली. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न निश्चित करत आहे. मुळात हेच उद्दिष्ट या यात्रेचे आहे, गलितगात्र झालेल्या काँग्रेस मध्ये या यात्रे मुळे राजकीय प्राण फुंकण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या करिता काँग्रेस चे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

या यात्रेची सुरवात ७ सप्टेंबर रोजी केरळ राज्यातून झाली, ६० दिवसाच्या वर या यात्रेत राहुल गांधी चालत आहेत आणि दक्षिणेतील राज्य संपून आता ते मध्य भारतातील राज्यात येत आहेत. दक्षिणेतील राज्य त्यामानाने या यात्रे करिता अनुकूल आणि येथील राजकीय परिस्थिती सुद्धा काँग्रेस करता अनुकूल अशी आहे, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा येथे भाजप विरोधी राज्य सरकार आहेत तर आंध्र मध्ये प्रादेशिक पक्ष YSR काँग्रेस सत्तेत आहे, YSR काँग्रेस भाजप करिता सहयोगी आहे.  फक्त कर्नाटक राज्य भाजप शासित आहे. त्यामुळे दक्षिण भारतात यात्रे करताचा प्रवास सुखकर होता. यात्रेची खरी परीक्षा आता सुरु होत आहे, महाराष्ट्रातून ही यात्रा हिंदी बेल्ट मध्ये प्रवेश करेल. हिंदी बेल्ट मधील बहुतांश राज्य भाजप शासित आहेत व हीच राज्य देशाचा पंतप्रधान ठरवतात, विशेष करून उत्तर प्रदेश. त्यामुळे या राज्यात ही यात्रा किती प्रभावशाली ठरेल हे पाहणे जरुरीचे आहे. 


या वर्षाच्या सुरवातीला राजनीती विश्लेषक प्रशांत किशोर यांनी काँग्रेस च्या सर्वोच्च नेतृत्वा समोर काही तथ्याची मांडणी केली व काही बदल अपेक्षित केले,  त्यातील महत्वाचे बदल म्हणजे लोकशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक आणि काँग्रेस अंतर्गत निवडणूका, त्यासोबत प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांची काँग्रेस करिता जोडणी हे दोन प्रमुख बदल काँग्रेस नेतृत्वा समोर ठेवले गेले असण्याची शक्यता आहे. त्यातील काँग्रेस अंतर्गत निवडणुका आणि मल्लीकार्जून खरगे यांची काँग्रेस अध्यक्ष पदी दोन दशका नंतर निवड झाली तर भारत जोडो यात्रेच्या निमित्याने पदयात्रा काढून राहुल गांधी यांचे नेतृत्व सर्वसामान्य लोकं पर्यंत नेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. या पूर्वी सुद्धा ९० च्या दशकात व त्यांनतर २००४ च्या निवडणुकी पूर्वी लाला कृष्ण आडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती आणि त्याचा प्रचंड प्रभाव जन सामन्यात निर्माण झाला होता. देशाचं राजकारण ढवळून निघाले होते व भाजप देशाच्या राजकारणात सत्ता केंद्रित पक्ष झाला होता. देशातील सर्व माध्यम समूहांनी त्यावेळी रथ यात्राचे स्पेशल कव्हरेज केले होते. लाला कृष्ण अडवाणी यांची रथ यात्रा सर्व सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय झाली होती. या रथ यात्रे द्वारे निवडणुकीचे मुद्दे भाजपा ने योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहंचवले होते. त्या मुद्द्यांचा प्रभाव लोकांमध्ये दिसत होता व त्याचे रूपांतर नंतर मतदानात झाले. लाला कृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेचा वाढता प्रभाव पाहून बिहार मधील लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने ती रथ यात्रा अडवली आणि अडवाणी यांना अटक केली.

२०२४ ची तयारी म्हणून या यात्रे कड़े नक्कीच पाहावे लागेल, हि यात्रा १५० दिवसांनी फेब्रुवारी २०२३ ला काश्मीरमध्ये संपेल तेव्हा  देशातील सार्वत्रिक निवडणुकीला फक्त सव्वा वर्ष राहिलेले असेल, अर्थात भाजपने सुद्धा २०२४ च्या निवडणुकीची तयारी नक्कीच सुरु केली आहे. २०१२ च्या हिवाळ्यात अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकाचे आंदोलन दिल्लीत सुरु झाले. अण्णांच्या या आंदोलनाचा फायदा नंतरच्या काळात भाजपाला झाला. ते आंदोलन सर्व व्यापी झाले, भ्रष्टाचार हा विषय लोकांनी लावून धरला आणि तत्कालीन केंद्र सरकार विरुद्ध देश व्यापी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात समाजातील सर्व स्थरातील लोक सहभागी झाले आणि अण्णा हजारे यांच्या उपोषणाला समर्थन दिले. हे आंदोलन यशस्वी होण्यामध्ये त्यावेळेस माध्यमांनी विशेष भूमिका बजावली. त्या प्रमाणेच काँग्रेस या भारत जोडो यात्रेच्या निमित्याने केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. देशभर या यात्रेच्या माध्यमातून चळवळ उभी करणायचा प्रयत्न सुरु आहे. मात्र या यात्रेस अजून सुद्धा म्हणावे तसे जन आंदोलनाचे स्वरूप आलेले नाही आणि अजून सुद्धा सर्वसामान्य भारतीय या यात्रेत जोडले गेलेले नाहीत.

या यात्रेच्या निमित्याने वातावरण निर्मितीचा काँग्रेस चा प्रयत्न आहे पण अजून तरी या यात्रेचा प्रभाव सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर झालेला दिसत नाही. या यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्व सहभागी झालेले दिसतात ज्यात प्रादेशिक पक्षांचे नेते, अभिनेते, कलाकार, लेखक, धर्मगुरू, समाज सेवक आणि समाजात प्रभाव निर्माण करणारे लोक उपस्थित आहेत पण सामान्य भारतीय अजून सुद्धा या यात्रे पासून काही अंतर राखून आहे असे दिसते. देशातील प्रमुख माध्यमे सुद्धा या यात्रे बद्दल फार चर्चा करताना दिसत नाहीत. सोशल मीडिया सारखे प्रभावी माध्यम असताना सुद्धा काही मोजकेच पत्रकार या यात्रे बद्दल लिहताना दिसत आहेत तर काही मोजकीच व्यक्तिमत्व या यात्रेत सहभागी होत आहेत.

या यात्रेचे अनेक फायदे काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात होऊ शकतात, त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे राहुल गांधी यांचे देशव्यापी नेतृत  प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याच बरोबर काँग्रेस तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व स्वीकारणार नाही हे या यात्रेतून काँग्रेस ने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेस च करेल हे ठामपणे काँग्रेस ने सांगितले आहे. या यात्रे च्या निमित्याने राहुल गांधी यांना देशातील सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येईल. आपले विचार सर्व सामान्य भारतीयां पर्यंत पोहंचता येतील. या यात्रे मध्ये राहुल गांधी यांनी स्वतःचा लुक सुद्धा बदलेल दिसत आहे.

हि यात्रा सुरु असतानाच गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यात निवडणूक होत आहेत. हि दोन्ही राज्य भाजप शासित आहेत, निवडणुकीचा निकाल ही यात्रा संपण्याच्या आत येणार आहे. ही यात्रा गुजरात मध्ये प्रवेश करत असताना तेथील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहंचला असेल. या यात्रेचा परिणाम निवडणूक निकालावरती काय होतो आणि ही यात्रा काँग्रेस करिता किती मतदान मिळवण्यास मदत करते हे पाहणे गरजेचे आहे. 


वंदे मातरम 

विराज वि देवडीकर 

 


Tuesday, 10 May 2022

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी

 

#चष्म्यातून_इतिहास, #१८५७चे_स्वातंत्र्यसमर, #वीर_सावरकर

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी आजच्या दिवशी, १० मे १८५७ साली पडली,

 

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध भारतीय जवानांनी पुकारलेल्या लढ्याला आज १६५ वर्ष पूर्ण झाली. "शिपायांचे बंड" म्हणून ब्रिटिश व डाव्या विचारसरणीने  हिणवले गेलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला सणसणीत चपराक म्हणून वीर सावरकरांनी हे `बंड' नव्हे, तर भारताचे पहिले `स्वातंत्र्ययुद्ध' होते, हे ऐतिहासिक पुराव्यांसह सप्रमाण सिद्ध केले. हुतात्मा मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, तात्या टेपे या सारख्या असंख्य वीरांनी कंपनी सरकारला सशस्त्र विरोध केला होता. त्यावेळेसच्या भारताच्या वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रदेशात युद्धाचा भडका उडाला, मेरठ येथील लष्कराच्या छावणीत भारतीय सैनिकांनी बंड केले. मेरठ छावणी उत्तर भारतातील सर्वात महत्वाची आणि मोठी छावणी होती, या छावणीत देशी शिपाई व गोरे सैनिक जवळपास समप्रमाणात होते. 


कंपनीने आणलेल्या नव्या हातबॉम्बची प्रात्यक्षिके ९ मे १८५७ रोजी दाखवण्यात आली.  असे हातबॉम्ब हाताळण्यास बहुतांश हिंदी शिपायांनी असहमती दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या गोऱ्या सार्जंटने त्यांची वर्दी उतरवली व त्यांची अपमानासपद धिंड काढली. त्यांचे तातडीने कोर्टमार्शल करण्यात आले व त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली. दुसऱ्या दिवशी, १० मे रोजी रविवार होता. अनेक गोरे अधिकारी कुटुंबियांसहीत चर्चमध्ये वा बाजारहाटीला गेले होते. तीच वेळ साधून हिंदी शिपायांनी उठाव केला व छावणीतील गोऱ्या सैनिकांवर हल्ला करुन तुरुंगात डांबलेल्या अनेक शिपायांना मुक्त केले. नंतर त्यांनी बाजाराकडे कूच करुन तिथेही गोऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह चोप दिला.

हा उठाव पाहून नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहाद्दुरशहा जाफर, राणी लक्ष्मीबाई या व अशा वीरांनी अनेक ठिकाणी कंपनी सरकार विरुद्ध युद्ध पुकारले. हा लढा पुढे वर्ष भर वेगवेळ्या लढयातून सुरु राहिला पण यशस्वी होऊ शकला नाही. या उठावा मुळे कंपनी सरकारचा कारभार जाऊन भारतातात ब्रिटनच्या राणीचे साम्राज्य आले. या उठावा मुळे ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय समाजा बद्दल व समाज व्यवस्थेबद्दल अधिक जगरुक झाले. हाच उठाव त्यानंतरच्या भारतीय स्वातंत्र्या करिताच्या अनेक लढायांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यातून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर या सारख्या प्रमुख नेत्याबरोबरच चापेकर बंधू, भगत सिंह, सुखराम, राजगुरू, कान्हेरे खुदिराम बोस असे क्रांतिकारक पुढे आले व ९० वर्षांच्या लढ्यानंतर भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला.


या लढ्यात महाराष्ट्रातील औंध संस्थानाने सहभाग घेतला व कंपनी सरकार विरुद्ध लढा दिला, दक्षिण भारतात इतरत्र हा उठाव झालेला दिसत नाही, बंगाल या उठावा पासून अलिप्त राहिले तर पंजाब कंपनी सरकारच्या समर्थनात उतरले. त्यामुळे लोकमान्यांनी या उठावाचे वर्णन करताना "हिंदुस्थानी वेगवेगळे लढले म्हणून हरले" अशा प्रकारे केले आहे. 

विराज वि देवडीकर

 

Sunday, 13 March 2022

काश्मीर फाइल्स

 

कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू प्रकाशात असतांना दुसरी बाजू अंधारात असते, पण काश्मीर पंडितां वरील अन्याया बाबत मात्र कायम एकच बाजू उद्दिष्टपूर्वक आपल्या समोर ठेवलेली होती. काश्मीर फाईल्स आपल्या समोर ती अप्रकाशी बाजू आणतो. ज्यांनी विवेक अग्निहोत्री यांचा या पूर्वीचा ताशकंद फाइल्स पहिला असेल त्यानं एकूण या चित्रपटाची रचना आणि मांडणी लक्षत येईल. ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना (काश्मिरी हिंदूंना) अंगावरील  कपड्यानिशी काश्मीर खोऱ्यातून हाकलून देण्यात आले व एकूणच काश्मीर खोरे भारताचा अविभाज्य भाग कसा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु झाला.



जानेवारी १९९० च्या त्या दोन दिवसात "इस्लाम स्विकारा, कश्मीर सोडा अथवा मरा" असा फतवा खोऱ्यातील जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रेंट ने दिला आणि काफिर अर्थात काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड सुरु झाले. काश्मीर खोऱ्यातील हिंदूंची राहती घरे, दुकाने, वस्त्या, शेती, उद्योग-व्यवसाय यांना आग लावण्यात आली. हिंदू स्त्रिया वरती अत्याचार करण्यात आले. हे होत असताना व्यवस्था (सरकार) षंढ बनून बसले होती. १९-२० जानेवारी १९९० या दोन दिवसात काश्मीर खोऱ्यातील असंख्य हिंदूंचा संहार करण्यात आला. पण परंपरागत माध्यमांनी आणि प्रस्थपित राज्य व्यवस्थेने हा सर्व संहार उर्वरित भारतीय समाजा पासून लपवून ठेवला. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा व तो सरकारी व्यवस्थेतून दाबून टाकण्याचा प्रयत्न मागील ३२ वर्ष चालू होता, मात्र काश्मीर फाईल्सच्या रूपाने पुन्हा एकदा तो रक्तरंजित इतिहास भारतीय सर्वसामान्याच्या  समोर आला आहे. फुटीरतावादी (वामपंथीय) विचारवंतांच्या इकॉसिस्टम ने काश्मीर व काश्मिरी हिंदू कशा प्रकारे अखंड भारताचा भाग नव्हते याच्या सुरस कहाण्या तर तयार केल्याचं पण या दोन दिवसातील हत्याकांडला स्वातंत्र्य युद्धाचे व क्रांतीचे नाव दिले. हा चित्रपट पाहताना हे जाणवून जात की "फ्री काश्मीर", "आझादी" या प्रकारच्या घोषणा देणारे फुटीरतावादी जाणीव पूर्वक काश्मीर खोऱ्यात अशांतता कायम स्वरूपी राहावी या करिता प्रयत्न करताना दिसतात. कथा-कथित पुरोगामी माध्यमांचा अशांत काश्मीर खोरे निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका या चित्रपटातून समोर येते. हा चित्रपट १९९०नंतर जन्माला आलेल्या सर्व प्रकारच्या माध्यमां च्या भूमिके विषयी बोलताना दिसतो. एकूणच प्रिंट व त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमातून काश्मीर मध्ये निर्माण करण्यात येणारे अशांतेचे वातावरण व त्या द्वारे काश्मिरी युवकांची माथे भडकवण्याचे काम फुटीरतावादी करत असतात असे हा चित्रपटात सांगतो. भारतीय सैन्याचे खच्चीकरण करणारी शासन व्यवस्था व त्यांना मदत करणारे लुटीयन मीडिया यांनी कश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडला आणि विस्थापनाला उर्वरित जगा पासून दडपून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली हे चित्रपट बघताना जाणवते. या काळातील कश्मिरी हिंदू वर होणारे अत्याचार पडद्यावर पाहताना अंगाचा थरकाप उडतो व तळपायाची आग मस्तका जाते.

या चित्रपटात वास्तवाचं दर्शन दिसत, काश्मिरी हिंदू हे काश्मिरी संस्कृतीचे व भाषेचा भाग होते तरी सुद्धा त्यांचावरती अन्याय झाला, त्यानां काश्मीर मधून विस्थापित व्हावे लागले हे सत्य हा चित्रपट अधिरेखीत करतो.
विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाची मांडणी अगदी उत्तम केली आहे. एखादी घटना, त्याचे स्वरूप, त्या घटनेचे काश्मिरी समाजावर होणारे परिणाम, शासन व्यवस्थेचे त्या घटनेचे आकलन याची संदर्भ सहित मांडणी या चित्रपटात केली आहे. या जोडीला योग्य प्रकारे निवडलेले कलाकार व त्यांची भूमिका खूप प्रभाव टाकून जाते. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि मृन्मय जोशी यांनी त्यांच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. चित्रपटातील भाषेची मांडणी ही काल सांगत आहे व त्याद्वारे सुद्धा खूप प्रभाव निर्माण केला आहे. एकूणच हा चित्रपट वास्तवाचे दर्शन करणार आहे त्यामुळे जरूर पहावा. पण त्यापेक्षा सुद्धा काश्मिरी हिंदू वर झालेल्या अन्यायाच्या वास्तवा करिता पहावा. 

धन्यवाद

 

विराज व देवडीकर

Saturday, 11 September 2021

#वर्षांचा_दिवस_२५४वा ९/११ आणि तालिबान

 आज /११, दहशतवाद असा काही शब्द नसतो आणि दहशतवादी नसतात असे म्हणणाऱ्या अमेरिकेच्या कानाखाली वाजवत अमेरिकेच्याच भूमीवर येऊन हल्ला केला. अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क शहरातील ट्वीन टॉवर वर प्रत्येक्ष विमान घुसवून त्या दोन्ही इमारती पडल्या. १५०० पेक्षा जास्त निरपराध अमेरिकी नगरिकांचा बळी या हल्ल्यात गेला. त्यासोबतच याच वेळी याच दिवशी वेगवेगळ्या पाच ठिकाणी हल्ला झाला, अमेरिकेचे सैन्य मुख्यालय असलेल्या पेंटागॉन वर सुद्धा नागरी विमान पाडण्यात आले. हे सर्व हल्ले नागरी विमानाचे अपहरण करून करण्यात आले. अनेक निरपराध अमेरिकी नागरिकांचा यांत अंत झालं. हा हल्ला इतका मोठा होता कि अमेरिका मुळा पासून हादरली आणि एक विशिष्ठ समाजाचे धर्माच्या नावावर चालणारे हत्याकांड दहशतवाद असतो आणि ते करणे दहशदवादी असतात हे अमेरिकेला मान्य करावे लागले.



भारतासारखे राष्ट्राला त्या अगोदरच्या दशकभरात या सारख्या असंख्य हल्ल्याना सामोरे जावे लागले होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशदवाद भारतात १९८९ नंतर सुरु झाला तो पूर्ण भारत भर पसरला. या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत अनेक विस्थापित झाले, अनेकांना घरेदारे सोडून जावे लागले. भारत या दहशतवादी कृत्याचा पहिला बळी ठरला होता. रशियाचे १९८९ ला विभाजन होणे, त्यामुळे अफगाणिस्तानातून रशियाने वापस जाणे आणि पाकिस्तानी ISI च्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानच्या सत्ता केंद्रात येणे. या सर्वा मध्ये अमेरिका ही महासत्ता कायम दिसली /११ नंतर मात्र याच तालिबान ने अमेरिकेवर हल्ला केला त्या हल्ल्याचे कारण देत अमेरिकेने पहिल्यांदा इराण नंतर अफगाणिस्तान बेचिराख केले. अफगाणिस्तानातील तालिबान ला संपवण्यासाठी मागील २० वर्ष अफगाणिस्तानात अमेरिकेच्या फौजा होत्या, तालिबान तर संपला नाहीच पण अमेरिकेने अफगाणिस्तान सोडायच्या आत पुन्हा एकदा तालिबान ने अफगाणिस्तानचा ताबा मिळवला, मागील महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तान सोडले आणि ते देश पुन्हा एकदा तालिबानी राजवटी खाली गेला.



याच तालिबान ने शीत युद्धात रशियाचे हस्तक म्हणून काम केले, नंतर ते पाकिस्तान च्या मदतीने अमेरिकेचे पाळीव झाले आणि आता कदाचित त्यांचा वापर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या (ISI) मदतीने चीन करू पाहत आहे. दक्षिण मध्य आशियातील अस्थिरता चीन ची गरज आहे. अमेरिकेचे अफगानिस्थान मधून जाणे चीन च्या उपयोगी पडणार आहे. आता सध्या निर्माण झालेल्या तालिबान सरकार मध्ये (त्याला सरकार म्हणणे हा विनोद) अनेक मंत्री हे कुख्यात दहशतवादी तर आहेतच त्यांच्यावर संयुक्त राष्ट्राने पकडून देणाऱ्यास (जिवंत/मृत) कोट्यवधींचे इनाम ठेवले आहे. असे सर्व या सरकार मधील मंत्री पाकिस्तानच्या ISI च्या मार्गदर्शना खाली काम करत आहेत चीन या सर्वा साठी पाहिजे ती मदत करत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये सोडून दिलेली युद्ध सामग्री आणि ISI ची मदत याचा वापर करून पुन्हा एकदा तालिबान भारता साठी डोके दुखी ठरणार आहे. मागील काही वर्षा पासून आर्थिक अडचणीत सापडलेला पाकिस्तानला सुद्धा या मुळे जागतिक पातळीवर महत्व निर्माण हेणार आहे पाकिस्थान त्याचा वापर भारत विरोधी करणार हे निश्चित आहे.

/११ च्या २१ व्या स्मृतिदिनी तालिबान पुन्हा एकदा सक्षम स्थितीत जाऊन बसला आहे. त्याचा मालक बदलला असला तरी ते पाकिस्तान ISI च्या नेतृत्वात काम करणार हे निश्चित....

 

 

विराज वि देवडीकर