६०,००० वर्ष खूप मोठा काळ असतो.

ही बातमी महाराष्ट्र टाइम्स ने दिली आहे, म्हणूनच विश्वस्वनीय वाटते. मुळात ज्या समुदायाची लोकसंख्या ४० ते ५० लोकांच्या आसपास असण्याची शक्यता आहे (२०११ च्या जनगणना), ज्यांच्यात मागील ६०००० वर्षा पासून कसलाच बदल झाला नाही किंबहुना त्यांनी स्वतःत बदल करू घेतला नाही, व भारतीय कायद्या नुसार ते संरक्षित प्रजाती आहेत त्यांना जाहीरपणे Convert करण्याचा प्रयत्न होत होता, तो प्रवासी पर्यटनाच्या नवा खाली ख्रिस्त धर्माचा प्रचार करत होता. त्याकरिता त्याने बेटाची ५ वेळा रेकी केली, ३ वर्षा पासून प्रयत्न करत होता. त्याचा मृत्यू झाला हे दुर्दैवच आणि त्याच्या कुटुंबा बद्दल सहानभूती आहे, पण स्वधर्म वाढवताना दुसऱ्याचे स्वतंत्र हिरावून घेण्याचा कोणी अधिकार दिला याना???
मागील हजारो वर्षा पासून एक समुदाय त्याच युगात राहत आहे त्यांनी आजच्या जगाशी कसलाच संबंध ठेवला नाही आणि ठेवायचं नाही. त्यांना त्यांची स्वतःची संस्कृती आहे, स्वतःची ओळख आहे, स्वतःच्या चाली रीती आहेत, रूढी परंपरा आहेत. त्यांचे स्वतःचे देव आहेत, धर्म ही संकल्पना त्यांना माहित नसेल म्हणून पण एक विशिष्ट पद्धत म्हणजे समाजात वावरायची नियमावली निश्चीत असेल. रूढ अर्थाने असलेला देव मान्य ही नसेल पण निसर्गालाच देव मानत असतील. निसर्ग चक्रावर अवलंबून जीवन असल्यामुळे निसर्ग हीच देवता आणि निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी हेच अर्थजण असेल. ते या सर्व गोष्टी मागचे ६०००० वर्ष पाळत आहेत. का कोणी यांच्या राहणी मानस, यांच्या जीवन पद्धतीस बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार हक्क आहे. असा अधिकार भारतीय संविधानाने तर दिलाच आहे पण निसर्गा नियम सुद्धा तसाच आहे.
निसर्गावर अवलंबून असलेल्या एका जमातीची गोष्ट आहे.
आज अमेरिका त्यांच्याच नागरिका चा मृत्यू झालेला मान्य करत नाही त्याच्या दृष्टीने तो अजून सुद्धा missing म्हणजे लापता किंवा हरवलेला आहे. कारण मृत्यू मान्य करणे म्हणजे त्याचे त्या बेटावर जाणे व त्या मागील उद्दिष्ट मान्य करण्या सारखे होईल.
ऍमेझॉन च्या खोऱ्यात यांनी हे धंदे चालू दिले असते का????
©विराज
No comments:
Post a Comment