Saturday, 10 July 2021

Mandela #Movie_Review

 

Mandela, Tamil socio-political drama and a story of an underprivileged hair dresser. The movie was release right before the GE in Tamilnadu this year in April. The movie run around local body election of village and the cast politics. The movie talk about how “Cast” rooted in the politics & how it creates impact on the mind of voters. An underprivileged hair dresser become a game changer in the local body election in village. an anonymous person who was struggling to create his own identity, who was finding his name, his background for two-time meal, one fine morning system create his identity, named him “Mandela”, make him citizen of Nation, bring him in a process of democracy. He turns to be a voter who does not have tradition & background of Cast. Mandela comes ahead, stand confidently against the element who want to break the democracy by the Cast weapon.   


  

The Director throws light on what happens when voter fail to grasp the importance & full power of their right to vote & get seduced by freebies. Film set of remote villages where the eligible voters is less then 700 and they are divided by cast lines. The decent & honest man of village played by Sangili Murugan is the head of the village have two son who are the half brother Rathanam & Mathi, belonging from different cast have led the respected Cast group. Rathanam & Mathi are political rivals and contesting election to lead the village when their father falls sick.  Both boosted by greed and inflated egos stop at nothing to win the election. And deeply divided village by “Cast” make their job easy. Yogi Babu charter arise as a challenge who is nobody in the village.



The Yogi Babu’s charters a man who is mistreated & exploited by the villagers. He even forgets his own name as people call him using various insults. It all changes when he meets a good-natured postwoman who create his identity & make him “Nelson Mandela”. Mandelas life change in a night as he become important voter. The village engaged to use corrupt way to lure Mandela & get his vote. At certain point in the film Mandela understand the importance of his vote & ask leaders to act according to his wish, he initiates and ask to change the picture of village. He builds way of growth & development for villagers. A less educated man understand the power of single vote & put a new picture Infront of villagers, which stimulate the inner voice of villager.  

Every village in India need one “Mandela” who initiate the change above the “Cast hierarchy”.

Thank You

 

Viraj V Devdikar


Monday, 21 June 2021

Dr. Hedgewar…Sangh founder

 

Today is the Death Anniversary of founder Rashtriy Swayamsevk Sangh (RSS) Dr. Keshv Baliram Hedgewar, widely known as “Doctorji”. Doctor ji was born at Nagpur, he studied in Nagpur, Yavatmal & Pune before going to Calcutta in 1910 for medicine. There he came in to contact with revolutionary leaders & become a member of Anushilan Samiti, a well know group of freedom fighters. He was highly influenced by firebrand nationalism of Lokmanya Tilak. Doctor ji was participated in the freedom struggle of Nation and he was Jail on several occasion.


The greatness of Doctor ji lies, “In his vision of raising the level of national consciousness of common man through the mechanism of daily ‘Shakha’ of RSS. A battery of such nationally conscious people is able to achieve the goal of social transformation” said by Dattopant Thengdi. Today RSS has grown into a huge tree whose innumerable branches have spread in the various level of national & social life of India. They are trying to raise the National consciousness level common citizen of India to much higher level. Over 90 years Sangh has produced many men of great caliber, competence, superior quality but made all of them of faceless. No image building exercise in RSS. Doctor ji initiated a process to create people of great quality & capabilities sans.


The freedom of mother land always be on top priority for Doctor ji as well as Sangh but he believed that alone could not rid our society of all the problem. Dr Hedgewar said often, “Even if the British leave unless the Hindus are organized as a powerful nation, where is the guarantee that we shall be able to protect the freedom.” His life mission: To organize the Hindu society and to take this Hindu Rashtra at the pinnacle of glory making it the “VishawGuru” or world leader. After carefully study he realized that the lack of national consciousness was major reason for the ills that plagued making it submissive and defeatist resulting in the slavery of hundreds of years. That the reason he founded Rashtriy Swayamsevk Sangh (RSS) on 27th Sept 1925. It was a time when people were scared & ashamed of calling them self “Hindu, call me anything even a donkey but don’t call me Hindu” was the general attitude of Hindu society. In such time Doctor ji stood alone like a solid rock proclaiming loudly, “ This is the land of Hindus ‘HinduRashtra’ and will remain so, as long as there lived even one Hindu”

A day before he left mortal Doctor ji said he was immensely pleased to see the ‘miniature of Hindu Rashtra’ in front him as Swayamsevak from all major province had gathered at the Third year Sangh Shiksha Varg. There are many anti National element supported from international agencies that encourage & support the forceful conversion of poor people, encourage Naxalism and confuse people through influencing them. In such situation the philosophy & ideology of Dr. Hedgewar that provided sound & unshakable foundation to Sangh can save nation from these forces.

My Humble tribute to the great son of India

 

Vande Mataram

 

Viraj V Devdikar

Saturday, 19 June 2021

Karnan

 

Story start with tragic plot when a young girl suffering from fits lying helpless in the middle of the road, vehicles continue to ply from both side of her but no one stop to help her. She dies on the road without medical help. In a village a little donkey hops on the road, its fronts legs tied with a rope. No one has notice, they assume legs tied to prevent little donkey from running, going where its heart it.  The director frequently shows the human legs in the film, it has indicator of restriction or oppression by the society. It is unfair to measure film on story & logic of narration, it is experience emotionally & visually. It is revoked against unspeakable atrocities & cast hierarchy.



Director use Kite & donkey a two element of society which represent oppressor and victim. The general perception is that the donkey, known to be a beast of burden and closely associated with the working class, is a stupid creature. Where as kite show inflated pride of people in power who snatch the human rights of people. The “Bus Stop” symbolism the human rights & right to live for people in Society. Ride of an elephant & horse show mentality of society, The villagers are economical backward, surrounded by unhealthy environment, illiteracy & superstition all are shown in different-different symbol. 

Vandalism by villagers is the reaction of heavily persecuted community, Karnan is symbol of their anger. He was fearless & he hit back when needed to inflated pride of people in power. What Karnan wants? Karnan wants right full place in the society, he wants self-respect, he wants identity, he want humanity, he wants right to Live. But oppression can be insidious & how bureaucracy & system stand by side of oppressor & even take a part of oppression. System sponsor violence is the post-independence oppression. Karnan fights against it for his & his people self-respect.



The film is corelated with the “MahaBharta” at some places like Names of characters, “Karnan, Draupadi, Kannabiran(another name of Lord Krishna), Duryodhana”, also the tradition like chopping fish into two pieces. Karnan chop fish & win the village sword. It make him hero of the village & leader of new generation. The dilemma of Karnan was same as of Arjuna in Mahabharta, where Kranan has to choose the state or his people. He initially allows himself to be persuaded to leave, but returns to avenge his people. He is not only committed to the village but to a greater cause. As Karnan draws to an end, Kaatu Pechi ( The child who dies at the begging came back as goddess) celebrates. It is that stark image that we are left with, a child who turned into a goddess because of injustice meted out to her, and remains amidst them & within them.   

Viraj Devdikar

Thursday, 13 May 2021

ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम यांचे नाते संबंध

 

सध्या पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यात युद्ध सुरु आहे, आणि दोन्ही बाजूने एकमेकांवरती बॉम्ब गोळे फेकणायचे काम चालू आहे. प्रचंड तणावाचे वातावरण या देशांच्या सीमेवर आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात १९४३ पासून या वादाची सुरवात झालेली दिसते. जेव्हा दुसऱ्या महायुद्धात विस्थपित झालेल्या ज्यू समाजाला युनायटेड नेशन्स आणि ब्रिटिश राज्यकरत्यांनी पॅलीस्टाईनला विभाजित करत एक भाग ज्यू समुदायाला दिला व दुसरा भाग मुस्लिम समुदायाला दिला. इस्राईल चा जन्म आणि ब्रिटिशांची कूटनीती यामुळे या वादाला सुरवात झाली. पण वादाचा मुद्दा दोन हजार वर्षा पूर्वीचा आहे व त्या करिता या तिन्ही समुदायाचे नाते संबंध बघणे गरजेचे आहे. हे तिन्ही समुदाय एकमेकांशी जसे वर्षानुवर्षे भांडत आहेत तसेच ते एकमेकांत गुंतलेले सुद्धा आहेत. स्वतःचे वर्चस्व व मोठेपण टिकवण्यासाठी यांची चाललेली हि धडपड म्हणावी लागेल. या तिन्ही समुदायाच्या नाते संबंधाना बद्दल माहिती सर्वत्र उपलब्ध आहे, व त्याविषयी वाद असण्याचे काही कारण नाही.

हे तिन्ही समुदायांना एकत्रित पणे अब्राहमीक रिलिजन (Abrahamic religion) असे म्हणतात. ढोबळ मानाने हे तिन्ही समुदाय एकाच धार्मिक परंपरेतून निर्माण झालं आहेत, यातील ज्यू धर्माची निर्मिती इ.. पूर्व ६व्या शतकात,  ख्रिश्चन .. च्या १ ल्या शतकात तर इस्लाम ची निर्मिती इ.स. च्या ७ व्या शतकात झाली असे म्हणता येईल. या तिन्ही समुदाया सोबत " Baháʼí Faith आणि Druzism" हे सुद्धा धर्म निर्माण झालेले आपल्याला दिसतात पण या तिन्ही समुदायाच्या तुलनेत ते नवीन व लहान आहेत. ख्रिश्चन धर्माचा प्रचार रोम साम्राज्य मार्फत झाला, जेव्हा ४ थ्या शतकात रोम ने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तर इस्लाम चा प्रचार उमय्याद साम्राज्यात झाला (म्हणजे आताचे अरब देश, पूर्व आफ्रिका इत्यादी भाग). अब्राहाम यांच्या पहिल्या दोन मुलापासून ज्यू- ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माचा उगम  झालेला दिसतो. Isaac यांच्या पासून ज्यू- ख्रिश्चन धर्माचा उगम होतो असे म्हणतात तर इस्लाम धर्माचा उगम यांचा मोठा भाऊ Ishmael (इस्माईल) यांच्या पासून झालेला दिसतो.



या पैकी इस्लाम व ज्यू धर्मीयांसाठी महत्वाचे ठिकाण म्हणजे "जेरुसलेम" हे शहर, या शहराला प्रचंड मोठा इतिहास आहे, सदारणपणे ५००० वर्षा पासून या शहराची नोंद इतिहासत सापडते. हे शहर वेगवेगळ्या धर्मसंस्थांच्या व राज्यांच्या अधिपत्याखाली राहिलेले आपल्याला दिसते, त्यात ज्यू त्यांनतर, इस्लाम, रोम (ख्रिश्चन), मध्ययुगीन इतिहासात हे शहर ऑट्टोमन साम्राज्याचा भाग होते त्यानंतर ब्रिटिश व आता इस्राईल त्यावर हक्क सांगत आहे. जुन्या जेरुसलेम मधील टेम्पल माऊंटन हे या तिन्ही धर्माचे पवित्र ठिकाण आहे. ज्यूंच्या धार्मिक मान्यते प्रमाणे याच डोंगरा वरती अब्राहाम (ज्यूंचा संस्थापक) यांना "देवाने दृष्टांत दिला व तेथे वस्ती करण्यास सांगितले" या प्रदेशाला ज्यू समाज “Land of Milk & Honey” म्हणतात. याच डोंगरावर सोलोमन राजाने देऊळ बांधले त्याला "सेनेगॉग" म्हणतात. बॅबिलिओन व रोमन राज्यकर्त्यांनी ही देवळे तोडली, उध्वस्त केली. पुढे राजा हॅडली यांने बांधलेल्या देवळाच्या पश्चिमेकडील भिंतीला वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल म्हणतात व हीच वेस्टर्न वॉल ज्यू धर्मीयांसाठी अतिपवित्र ठिकाण आहे. याच डोंगरावर अल् अक्स म्हणजे अतिदूरची मशीद आहे, याच ठिकाणी  प्रेषित महंमद पैगंबर यांना अल्लाचा साक्षात्कार झाला. इस्लाम धर्माच्या मान्यतेप्रमाणे अल-हरम-अल-शरीफ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र परिसरात दगडी घुमट व अल् अक्स मशीद आहे. दगडी घुमटामध्ये पायाचा दगड आहे जिथून प्रेषित महंमद पैगंबर यांनी स्वर्गात प्रस्थान ठेवले तर ज्यू धर्मियांच्या मते दगडी घुमट हे त्यांचे पवित्र ठिकाण आहे व त्या मध्ये असलेल्या पायाच्या दगडा पासून जगाची निर्मिती झाली अशी मान्यता आहे. हेच ठिकाण यशु ख्रिस्ताशी संबंधित असल्यामुळे या शहराला ख्रिश्चन धर्मीय सुद्धा पवित्र मानतात.

आधुनिक जगाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ वादग्रस्त असलेला हा प्रदेश प्राचीन कळा पासून एकमेकांमध्ये गुंतलेला होता. व त्या गुंतागुंती मधूनच वाद व हिंसाचा होत आहे.

 

 

विराज वि देवडीकर

viraj.devdikar@gmail.com

 


Tuesday, 13 April 2021

आद्य सरसंघचालक प्रणाम

 

संघ निर्माते : डॉ केशव बळीराम हेडगेवार

आज परम पूज्य आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती, त्यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी नागपूर ला झाला. हिंदू तिथी नुसार त्यांचा जन्मदिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी झाला. त्यांनी हिंदूंचे विश्वव्यापी संघटन निर्माण केले व मागील ९७ वर्ष हे संघटन अविरत व्यक्ती निर्माणचे कार्य करत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरला झाले तेथेच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे व समाजकार्याचे संस्कार झाले. त्यांच्या जीवनावर त्यांचे थोरले बंधू महादेव शास्त्री यांचा प्रचंड प्रभाव होता. व त्यांच्याच माध्यमातून क्रांतिकार्याची ओळख डॉक्टरांना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रचंड प्रभाव डॉक्टरांवरती होता, त्यातूनच स्वातंत्र्य प्राप्ती करता सशस्त्र लढ्याची प्रेरणा त्यांना मिळाली. बालपणी मित्रांसोबत नागपुरातील सीताबर्डी किल्ल्या वरचा "युनियन जॅक" काढून त्याठिकाणी भगवा ध्वज त्यांनी लावला.


पुढे कलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये MBBS करिता त्यांनी ऍडमिशन घेतले आणि तेथेच ते बंगाल मधील क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. ते अनुशीलन समितीचे सदस्य बनले. त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून त्यांच्यावर हिंदू महासभेच्या बंगाल प्रांताच्या उपाध्यक्ष म्हणून जवाबदारी देण्यात आली. पुढे MBBS प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर स्वगृही नागपूरला परत आल्यावर त्यांनी सरकारी नोकरी न करिता क्रांतिकार्य सुरु ठेवले. याच काळात ते काँग्रेस च्या संपर्कात आले व काँग्रेस चे सदस्य झाले. १९२० ला काँग्रेस चे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर ला झाले त्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्याच बरोबर त्यांनी "पूर्ण स्वातंत्र्याचा" ठराव या अधिवेशनात मांडला पण तो पास होऊ शकला नाही. डॉक्टर काँग्रेस च्या जहाल गटाचे सदस्य होते, त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता टिळकांच्या अकाली निधना मुळे काँग्रेस मधील जहाल गट कमकुवत झाला होता. १९२१ मध्ये त्यांनी असहकार आंदोलनात सत्याग्रह केला व एक वर्ष कारावास सुद्धा भोगला होता. पण त्याच बरोबर त्यांनी गांधीजींच्या खिलाफत आंदोलनाला तीव्र विरोध केला. तुर्कीस्तानच्या राजा करिता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वापर करणे त्यांना मान्य नव्हते.


सक्षम राष्ट्रा करिता सक्षम समाज निर्माण होणे गरजेचे आहे. हिंदू समाजाला संघटित, अनुशासित आणि बलशाली होणे अत्यंत आवश्यक आहे. व ते कार्य संघ शाखेत केले जाते या उद्देशातून १९२५ च्या विजयादशमी च्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ स्थापने वेळी त्यांचे वाक्य होते,  ‘’मैं आज संघ (संगठन) की स्थापना की घोषणा करता हूं‘’ एक वर्षांनी या संघटनेचे "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" हे नमःकारण करण्यात आले. संघ स्थापने पासून पुढे १५ वर्ष त्यांनी संघाचे सरसंघचालक म्हणून जवाबदारी स्वीकारली. या काळात त्यांनी संघ भारत भर नेला, त्याकरिता अखंड प्रवास, भारत भ्रमण, अनेक व्यक्तीना भेटणे व त्यांना संघाशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले. स्वकृतीतून त्यांनी अनेकदा स्वयंसेवकांना शिस्तीचे धडे दिले. १९४० पर्यंत संघ भारत भर पोहंचला होता, १९४० च्या तृतीय वर्षां वर्गाच्या स्वयंसेवकांसमोर आपल्या शेवटच्या बौद्धिकात बोलताना त्यांनी म्हटले होते, " मी हिंदुराष्ट्राचे छोटे रूप तुम्हा सर्वात पाहत आहे"

 

संघे शक्ति: इति ज्ञात्वा लोककल्याणकारक:| येन संघ कृतस्तस्मै केशवाय नमो नमः ||

 

अर्थात “संघटनेमध्ये सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला, अशा त्या केशवांना पुनः पुनः नमस्कार असो.”

 

आद्य सरसंघचालक प्रणाम

Sunday, 7 February 2021

चौरी-चौरा के हुतात्मा

 

मागील आठवड्यात कृषी आंदोलनाच्या आरोप-प्रत्यारोपात एका ऐतिहासिक आणि भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महत्वाच्या घटनेचे शताब्दी वर्ष सूर झाले, या घटनेमुळे ब्रिटिश सरकारला जाणीव झाली की, स्वातंत्र्याची आग भारताच्या खेड्या-पाड्यां पर्यंत, वाड्या-वस्त्यां पर्यंत पोहचली आहे. सर्व सामान्य व्यक्ती/जनाना स्वातंत्र्याची गरज निर्माण झाली आहे हे ब्रिटिशांच्या ध्यानी आले. ४ सप्टेंबर १९२० ला महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची हाक दिली व संपूर्ण देशाने ब्रिटिश सरकार वर बहिष्कार टाकला, शाळा-कॉलेज, सरकारी कचेऱ्या ओस पडल्या, लोकांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारचा निषेध करायला सुरवात केली. जालियनवाला बाग हत्याकांड व रॉल्ट ऍक्ट(Rowlatt Act) यांच्या मुळे लोकांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड क्रोध होता. हे आंदोलन भारताच्या लहान-लहान खेड्यापर्यंत पोहंचले होते, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्यातील चौरी-चौरा या गावी सुद्धा या आंदोलनाला सुरवात झाली व पुढे याच ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य युद्धाला कलाटणी देणारी घटना घडली. 


चौरी-चौरा या घटनेचे दोन मुख्य भागात विभाजन करीता येईल, त्याची सुरवात २ फेब्रुवारी १९२२ ला झाली, मुंडेरा बाजार या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणि दारू विक्री विरुद्ध एक आंदोलन सुरु होते, या आंदोलनात भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व हे आंदोलन असहकार चळवळीचा भाग आल्यामुळे या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली व मारहाण केली. हे आंदोलन निवृत्त सैनिक भगवान अहिर यांच्या नेतृत्वात सुरु होते व त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. ब्रिटिश पोलिसांच्या मनमानी कारभार विरोधात चौरी-चौरा आणि पंचक्रोशीतील लोकांनी ४ फेब्रुवारी १९२२ ला आंदोलन सुरु केले, आसपासच्या खेड्यातील मिळून २ ते ३ हजार लोकांचा जनसमुदाय चौरी-चौरा येथील मुंडेरा बाजार समोर गोळा झाला व त्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा देण्यास सुरवात केली. ब्रिटिश पोलीस व ब्रिटिश सरकारच्या विरोधातील घोषणाबाजी मुळे व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुवातील हवेत गोळीबार केला व जमाव पांगात नसल्याचे पाहून प्रत्यक्ष आंदोलकांवर गोळीबार केला गेला. या गोळीबारात ३ सामान्य लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे जमाव शांत होण्या ऐवजी अधिकच प्रक्षुब्ध झाला व त्यांनी एकत्र येऊन पोलीस चौकीवर हल्ला केला. या वेळी चौकीत कामावर असणारे पोलीस कर्मचारी जमावाने केलेल्या हल्ल्या मुळे बचावा साठी चौकीत लपून बसले. प्रक्षुब्ध जमावाने चौकीत लपलेल्या पोलीसां सहित चौकीला आग लावली व या अग्नीकांडात २३ पोलीस मरण पावले.

या अग्निकांडा मुळे ब्रिटिश सरकार पुरते हादरले व १८५७ प्रमाणे देशात परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लागेचच ब्रिटिश सरकारने चौरी-चौरा परिसरात Martial Law लागू केला, त्या अंतर्गत अनेक निष्पाप लोकांना अटक करण्यात आली, अनेक सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करण्यात आहे, या अग्निकांडात सहभागी झाल्याबद्दल २२८ आंदोलकांना अटक करण्यात आली, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू पोलीस चौकशीत झाला तर जिल्हा-सत्र न्यायाल्याने १७२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली. पुढे २० एप्रिल १९२३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायाल्याने हा निकाल रद्द करून १९ जणांना फाशी व ११० जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली. चौरी-चौरा कडांतील १९ आंदोलकांना एकत्रित फाशी देण्याची भारताच्या स्वातंत्र्य युद्धातील पहिली घटना असेल. या घटने नंतर १२ फेब्रुवारीला महात्मा गांधींनी ऐन भरात असलेले असहकार आंदोलन स्थिगिती केले. या निर्णयमुळे क्रांतिकारकांचा एक मोठा वर्ग दुखावला गेला. १६ फेब्रुवारी १९२२ ला "चौरी-चौरा का अपराध" या शीर्षका खाली गांधीजींनी लेख लिहला ज्यात त्यांनी या अग्निकांडा करिता ब्रिटिश पोलिसांसोबत आंदोलकांना सुद्धा जवाबदार ठरवले. मार्च १९२२ ला गांधीजींना राजद्रोह खाली अटक करण्यात आली व पुढे दोन वर्षांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुक्त केले गेले. 



या अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे आठवण ठेवण्यासाठी १९७३ ला स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन "चौरी-चौरा शहीद स्मारक समिती" स्थापन केली व स्मारका साठी १३५०० रुपयांचा निधी उभा केला व त्या पैश्या मधून स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाची निर्मिती केली गेली. या वर्षी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते चौरी-चौरा घटनेच्या शताब्दी समारोहाचे उदघाट्न केले.

भारताला स्वातंत्र्य मिळाले ते काही शीर्ष नेतृत्वा मुळे का छोट्या-छोट्या स्वातंत्र्य लढ्यामुळे हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित आहे पण त्यामुळे या छोट्या-छोट्या लढ्यात शहीद झालेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे महत्व व त्यांचे बलिदान त्यामुळे कमी होणार नाही.

वंदे मातरम                                                                                          विराज देवडीकर

#मराठी_थ्रेड   

संदर्भ:-

https://www.bbc.com/hindi/india-55921031

https://en.wikipedia.org/wiki/Chauri_Chaura_incident

https://www.newsnationtv.com/specials/news/know-what-is-the-chauri-chaura-ancident-because-of-which-mahatma-gandhi-had-to-withdraw-the-non-cooperation-movement-176305.html

 

Saturday, 30 January 2021

गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी

 ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी दिल्ली येथील बिर्लाभवन मध्ये प्रार्थनेच्या अगोदर एका माथेफिरू तरुणाने महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या केली, नथुराम गोडसे असे त्या माथेफिरू तरुणाचे नाव, त्याच्या सोबत नारायण आपटे आणि उर्वरित पाच जणांना या हत्येच्या कटात शिक्षा झाली. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी मागील अनेक दशकांपासून सुरु आहे. या हत्येचा अभियोग दिल्ली येथील लाल किल्ल्यात स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात चालला, न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना निर्दोष ठरवून मुक्त केले होते,  त्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या) निर्णया विरोधात पंजाब उच्च न्यायालयात अपील सुद्धा शासना तर्फे करण्यात आलेले नाही. तरीही मागील अनेक वर्षा पासून स्वा. सावरकरांना या हत्येत गोवण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही घटकां तर्फे करण्यात येत आहे. "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या प्रा. शेषराव मोरे यांच्या पुस्तकात या पूर्ण खटलया विषयी आणि स्वा. सावरकर यांच्या बदनामी विषयी विस्तृत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे सबळ पुरावे व योग्य संदर्भ या पुस्तकात दिले आहेत.


न्यायपत्रात स्वा. सावरकरांच्या विषयीचा निकाल पुढील प्रमाणे आहे, " त्यांच्यावर (वि. दा. सावरकर) आरोपपत्रात ज्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या संबंधात ते दोषी आढळले नाहीत ( He is found 'not guilty') आणि त्यांना त्यातून निर्दोष ठरविण्यात येत आहे (acquitted thereunder). २०४ पृष्ठाच्या  निकालाच्या टंकलिखितात पृ. १७७ वर न्यायालय लिहिते, " वर सांगितल्याप्रमाणे विनायक दा. सावरकरां विरुद्ध फिर्यादी पक्षाची बाजू केवळ माफीचा साक्षीदार व  केवळ त्याच्या साक्षीवर आधारलेली आहे. वर हेही सांगितले आहे की, केवळ माफीदाराच्या साक्षीवर आधारून विनायक दा सावरकरां विरुद्ध काही निष्कर्ष काढणे धोकादायक ठरेल." याच टंकलिखितात न्यायालय २०/०१/१९४८ च्या बॉम्ब स्फोटात व ३०/०१/१९४८ च्या प्रत्यक्ष हत्येत स्वा. सावरकरांचा हात होता असे गृहीत धरण्याचे कोणतेही कारण नाही. तेव्हा न्यायालयाने स्वा. सावरकरांना निर्दोष ठरवताना 'पुरावा नसणे' ही जी मूलभूत कसोटी लागते, त्या आधारे निर्दोष ठरविले होते, संशयाचा फायदा घेऊन मुक्त केले नव्हते.

विरोधक ज्या कपूर आयोगाचा स्वा. सावरकर यांच्या बदनामी करिता विशेष उल्लेख करतात त्याविषयी थोडे, या आयोगाची नियुक्ती करण्यामागचे करणं म्हणजे, १९६४ रोजी या हत्येतील सहभागी व ज्यांनी जन्मठेपेची शिक्षा झाली होती असे गोपाळ गोडसे, विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा त्यांची शिक्षा भोगून सुटका झाल्यावर दि १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे त्यांच्या चाहत्यांनी सत्कारासाठी सार्वजनिक पूजेचे आयोजन केले होते. या सत्कार व पूजेस केसरीचे माजी संपादक व तरुण भारत चे तेव्हाचे संपादक गजानन विश्वास केतकर अध्यक्ष होते त्यांनी आपल्या भाषणांत सांगितले की, गांधीजंच्या हत्येचा विचार चालू असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती. त्याकरिता ते नथुराम गोडसे यांच्या शिवाजी मंदिर पुणे येथील जुलै १९४७ च्या सभेची आठवण करून देतात, त्यात " गांधीजी म्हणतात की, मी १२५ वर्ष जगणार आहे, होय पण त्यांना कोणी जगू दिले तर ना!" या वाक्याची आठवण करून देतात. या सभेस काँग्रेस चे कार्यकर्ते बाळू काका कानिटकर उपस्थित होते व यांच्या मार्फत त्यावेळेच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर यांना पत्रा द्वारे कळवली होती. या वक्तव्य नंतर विधानसभेत व लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला व या प्रकरणाची अधिक चौकशी मागणी करण्यात आली, या कारण्यासाठी २२ मार्च १९६५ रोजी कपूर आयोगाची नेमणूक झाली. द कमिशन्स ऑफ इन्क्वायरी ऍक्ट १९५२ नुसार कामकाज करणे अपेक्षित होते, न की स्वा. सावरकरांच्या निर्दोषत्वा वर टिपण्णी करणे. कोणत्याही आयोगाची निर्मिती एखाद्या विशिष्ट् प्रकरणाची चौकशी साठी नेमला जातो, त्याला उच्चस्थरीय चौकशी करण्याचे अधिकार आहेत पण न्यायालय देतात तसे  देण्याचा अधिकार कोणत्याही आयोगाला नसतो. या आयोगाने सावरकरांना गांधी हत्येसाठी दोषी ठरवले, जे कि या आयोगाच्या कार्यक्षेत्रात नव्हते. आयोगाने स्वा. सावरकरांवर दोष ठेवला, या खटल्यातील एकमेव माफीचा साक्षीदार असलेल्या दिगंबर बडगे यांची चौकशी या आयोगाने केली नाही, आयोगाच्या कार्यकाळात दिगंबर बडगे ह्यात होते व ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस चाळीत राहायला होते. अशा महत्वाच्या व्यक्तीची चौकशी आयोगाने केली नाही.

गांधी हत्या व कोणतीही हिंसा याचे समर्थन मला करायचे नाही, पण स्वा. सावरकरांना या हत्येमध्ये गोवण्याचा खूप मोठा प्रयत्न झाला होता असे नक्की जाणवते.

 

धन्यवाद                                                                              विराज वि देवडीकर

 

 

(या लेख करिता चे संदर्भ "गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी" या पुस्तकातील आहेत)

Sunday, 24 January 2021

राष्ट्र मंदिरातील श्रीराम ....

 जय श्रीराम

 

मागील १०-१२ दिवसा पासून वेगळाच दिनक्रम चालू आहे, संध्याकाळ झाली की सहा-साडे सहा पर्यंत ऑफिस चे काम संपवायचे आणि घर गाठायचे, अर्धा तासाची विश्रांती आणि पुन्हा सात वाजता अभियानाची सुरवात, हो श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन अभियानात या काळात काम करण्याचे सौभाग्य मिळाले, दिलेल्या वस्ती मध्ये, नागरी सोसायट्यां मध्ये, कधी बाजारात तर कधी सेवा वस्त्यांमध्ये जाऊन निधी संकलन तर करायचेच पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांना राम मंदिरा बद्दल माहिती करून द्यायची अशी जवाबदारी घेतली आणि कामाला १५ तारखे पासून सुरु झाले. त्यात प्रत्यक्ष लोकं मध्ये जाऊन काम करण्याची संधी/ निधी संकलनाची संधी मिळत आहे. घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधून राम मंदिरा विषयी चर्चा करायची संधी मिळत आहे, त्यांचा मनातील राम जाणून घेण्याची संधी मिळत आहे. 

भारताच्या आणि भारतीयांच्या मनामनात राम आहे, अखंड भारतवर्षाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला जाणवून जाते राम भारताच्या संस्कृती व समाज जीवनाचा भाग बनून गेला आहे, रामगड, रामनगर, रामवाडी, रामटेकडी, श्रीरामपूर असे गावाच्या नावावरून रामाशी नातं सांगणारे अनेक जण आहेत तसेच राम, श्रीराम, राम्म्या,सीताराम, रघुनाथ, राघव असे स्वतःच्या नावाने नाते सांगणारे अनेक जण या भारत भूमीत आपल्याला भेटीला, पण त्याहून ही महत्वाचे म्हणजे राम नाम अनेकांच्या मना मनाला साधणारा सेतू आहे असे आपल्याला जाणवते. या अभियाना निमित्याने काम करताना असे अनेक राम मला भेटायला लागले, प्रत्यक्ष स्वरूपात मूर्त रूपात दिसले. लहान बालकांचा राम वेगळा बाळ गोपाळांत खेळणारा राम भेटला जो वडीलधाऱ्यांचा मान राखतो, त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो, सत्याचे पालन करितो, ज्ञान साधना आणि विज्ञान यावर विश्वास ठेवतो असा बाल राम भेटला. कोदंडधारी राम तरुणांचा राम भेटला ज्याची समाजाप्रती काहीतरी करण्याची भावना आहे, ज्याला आपल्या क्षेत्रांत कार्य करताना राष्ट्र व धर्म सेवा करायची आहे असा तरुण राम भेटला वृद्धांचा पूर्ण पुरषोत्तम राम भेटला, माता भगिनींचा रक्षण करिता राघव भेटला, असे अनेक राम अनेक रूपात भेटले.



प्रत्येकाच्या मनातील राम वेगळं आणि त्याची रामा वरील प्रीती वेगळी, या अभियानात अनेक अनुभव येत आहेत, राम या नावा वरील भक्तीचा प्रत्येय या काळात घेत आहे, निधी संकलना बरोबर लोकांच्या राम भक्तीचे सुद्धा संकलन या वेळी होत आहे असे वाटते, काही ठिकाणी बाल गोपाळांनी आपला खाऊचा वाट मंदिर निर्माणा साठी या अभियानाला देत आहेत तर कुठे वृद्ध माता-पित्यानी आपल्या निवृत्त संचयातील वाट या अभियानास देत आहेत, सेवा कार्य करणाऱ्या सेवेकार्यानी आपले योगदान देत आहेत. उद्योग-धंदे, व्यवसाय, नोकरी करणाऱ्या लोकांनी यथा शक्ती योगदान दिले, शेतकरी कष्टकऱ्यांनी आपला राम जपत खारीचा वाटा उचलला आहे. समाजातील प्रत्येक घटक कोठे न कोठे स्वतःला राम मंदिराशी जोडत आहेत राम कार्याशी नातं सांगत आहेत. अनेक हातानी अनेक मनानी हे राम मंदिर उभे राहणार आहे. निधी-रक्कम यातून मंदिराचे बांधकाम उभे राहिल, पण या असंख्य मनांच्या जोडणीतून श्रीरामाची प्रतिस्थापना होणार आहे.

राम सर्वत्र आहे, चराचरात आहे, राम सर्व मानवात आहे पण मंदिर आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे, प्रेरणेचे केंद्र आहे आणि भविष्यातील पिढी साठी एकात्मतेचे शक्ती पीठ असेल.

 

धन्यवाद                                                                                         विराज देवडीकर

viraj.devdikar@gmail.com